शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

Kolhapur News: काळम्मावाडी धरणातील पाणीसाठ्यात घट, पाणी टंचाई भासणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 18:57 IST

धरणातून एकूण १२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

सोळांकुर : काळम्मावाडी (ता. राधानगरी) धरणात आज ३१ जानेवारी अखेर ५६.११ टक्के म्हणजे १४.२४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सहा टीएमसी पाणी कमी असून खऱ्या पावसाळ्यास तब्बल पाच महिन्यांचा कालावधी असल्याने पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे आवश्यक आहे. अशी मागणी जोर धरत आहे.गतवर्षी जानेवारी- २०२२ अखेर धरणातील पाणीसाठा ७९.०७ टक्के म्हणजे २०.०७ टीएमसी इतका पाणीसाठा होता. यावर्षी ऑक्टोबरअखेर काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के (२५.४०) टीएमसीने भरले होते. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने धरणाच्या पाण्याचा साठा ऑक्टोबरमध्ये चांगला असताना केवळ तीन महिन्यात जवळपास १० टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.आज धरणाच्या जलाशयाची पातळी ६३५.५४ मीटर असून धरणाचा पाणीसाठा ४०३.३३ द.ल.घ.मी म्हणजेच ५६..११ टक्के (१४.२४) टीएमसी इतका उपलब्ध आहे. परिणामी दूधगंगा नदी काठावरील गावांना पाणी समस्या भासणार असल्याचे चित्र दिसत आहे.दूधगंगा काठावरील गावाबरोबर या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिकांना पाणी समस्या भासणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाने घ्यावी अशी मागणी शेतकरी व भूमिपुत्र करत आहेत. आज धरणातून विद्युत जनित्रासह दूधगंगा नदीपात्रात २५० क्युसेक्स, उजवा कालवा ४५० क्युसेक्स, तर गैबी ५०० क्युसेक्स असे एकूण १२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उर्वरित पाण्याचे सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी