शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणीसाठ्यात घट, उपसाबंदीचे संकट; पाणी काटकसरीने वापरण्याची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:42 IST

परंतु तरीही मोठ्या पाणीटंचाईसारखी स्थिती सध्या तरी नसल्याचे चित्र

कोल्हापूर : शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील विविध धरणांमधीलपाणीसाठा कमी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी काटकसरीने वापरण्याची गरज असून, शेतीसाठी पाणी सोडल्यानंतरही त्यातील काही दिवस उपसाबंदी करावी लागणार असल्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.एप्रिलपासून मे अखेरपर्यंत कोल्हापूर आणि परिसरातील नदीकाठच्या गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी साडेतीन ते चार टीएमसी पाण्याची गरज असते. अशात सध्या राधानगरी धरणामध्ये ३.३७ टीएमसी पाणी शिल्लक आहे. गैबीमधून एक टीएमसी पाणी उपलब्ध होणारे आहे. तसेच तुळशी, कुंभी आणि कासारी धरणांतून किमान अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आवश्यक तेवढा पाणीसाठा जरी सध्या धरणांमध्ये असला तरी पावसाळा लांबला तर मात्र, पाण्याची फार टंचाई भासू शकते. त्यामुळेच सर्व पातळ्यांवर पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा ठरत आहे.एल निनोमुळे पावसाचे प्रमाण थाेडे कमी राहील, असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याची दखल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेऊन गेल्या पंधरवड्यापासून महापालिकांच्या पाणी वितरणातही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच जर पावसाळा वेळेत सुरू झाला नाही तर मात्र सध्या धरणांमध्ये असलेले पाणी पुरेलच याची खात्री देता येणार नाही. त्याचमुळे येणाऱ्या दीड महिन्यात शेतीसाठीही पाणी सोडताना उपसाबंदीचा पाटबंधारे विभागाला विचार करावा लागणार आहे.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. यापुढच्या काळातही अशाच पद्धतीने अवकाळी नसले तरी वळवाचे मोठे पाऊस जर धरणक्षेत्रात झाले तर ते सिंचनासाठी आणि उपलब्ध पाणीसाठा पुरण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच वळीव किती, कसा आणि कुठे पडणार आहे, एल निनोचा प्रभाव राहणार आहे का आणि पावसाळा वेळेत सुरू होणार का, असे काही प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. परंतु तरीही मोठ्या पाणीटंचाईसारखी स्थिती सध्या तरी नसल्याचे चित्र आहे.

दोन महिन्यांची गरज भागणारपुढील दोन महिन्यांची कोल्हापूर शहराची गरज भागेल एवढा पाणीसाठा राधानगरी व काळम्मावाडी धरणांत आहे. परंतु पावसाळा लांबला तर मात्र पाणीटंचाईचे संकट कोल्हापूर शहरावर येऊ शकते, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे.

सध्या तरी शेतीसाठी आणि पिण्यासाठी आवश्यक पाणीसाठा धरणांमध्ये आहे. तरीही दक्षता म्हणून यानंतरही सिंचनासाठी पाणी सोडताना प्रत्येक आवर्तनामध्ये काही दिवस उपसाबंदी जाहीर करावी लागणार आहे. त्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. -रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर

 

धरण - गतवर्षीचा पाणीसाठा - यंदाचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)राधानगरी - ४.०६ - ३.३७तुळशी - २.११ - १.६४वारणा - १२.१६ - १४.९४दूधगंगा - १२.१२ -  ६.२६कासारी - १.३३ - १.१३कडवी - १.१५ - १.३५कुंभी - १.८० - १.५५पाटगाव - १.९८ - १.५३ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी