शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:04 AM

कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकºयांना ३७६ कोटींची कर्जमाफी दिल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्यावतीने कणेरी मठामध्ये आयोजित शेतकरी व बचत गटांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. ...

कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकºयांना ३७६ कोटींची कर्जमाफी दिल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्यावतीने कणेरी मठामध्ये आयोजित शेतकरी व बचत गटांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर बलदेव प्रकाश, संतोषकुमार महापात्रा यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यातील सुमारे ३७ लाख शेतकºयांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा, अशी शासनाची इच्छा आहे. कर्जमाफीच्या कामी स्टेट बँक आॅफ इंडियासह अन्य सर्वच बँकांनी सक्रिय योगदान देऊन शेतकºयांना सहाय्यभूत होण्यासाठी मदत केली आहे. बँकांनी शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.उत्कृष्ट शेतकरी तसेच बचत गटातील महिलांचा सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते केला. स्वागत व प्रास्ताविकात स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर बलदेव प्रकाश यांनी तसेच शेतकरी सदाशिव चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.समारंभास कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने यांच्यासह मान्यवर, बँकेचे व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.बचत गटासाठी मॉलमहिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर लवकरच महिला बचत गटांसाठी मॉल उभारण्याचा संकल्प असून याठिकाणी महिला बचत गटाच्या उत्पादनांना विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातील. जिल्ह्यात सात तालुका विक्री केंद्राच्या उभारणीला गती दिली असून २ विक्री केंद्रे पूर्ण झाल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.