शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

ऊसदरात ‘दत्त’, ‘जवाहर’च भारी

By admin | Updated: June 28, 2014 00:48 IST

यंदा शेतकऱ्यांना दिलासा : ‘एफआरपी’पेक्षा दीडशे रुपये जादा दर

 कोल्हापूर : हुतात्मा साखर कारखान्याने राज्यात उच्चांकी दर दिला असला तरी हा दर ‘एफआरपी’प्रमाणेच दिला आहे. परंतु, दत्त-शिरोळ व जवाहर-हुपरी या कारखान्यांनी ‘एफआरपी’पेक्षा १५० ते २०० रुपये जादा दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. गेल्या गळीत हंगामात साखरेचे घसरलेले दर व ‘एफआरपी’ याचा ताळमेळ घालताना साखर कारखानदारांची पुरती दमछाक झाली होती. कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची ‘एफआरपी’ २२५० ते २५६९ रुपयांपर्यंत होती. पहिल्या उचलीत एवढी रक्कम देणे शक्य होणार नाही, असे कारखानदारांचे म्हणणे होते; पण कारवाईच्या बडग्याने ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावेच लागले. हे पैसे शेतकऱ्यांना देणे कारखानदारांच्या आवाक्याबाहेर होते; पण केंद्र शासनाने ६६०० कोटींचे पॅकेज कारखान्यांना दिल्याने ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे शक्य झाले. ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना दिलेल्या उचलीमध्ये विभागातच नव्हे, संपूर्ण राज्यात सर्वाधिक दर हा हुतात्मा साखर कारखाना, वाळवा यांनी २५७१ रुपये प्रतिटन दिला. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर देत ‘हुतात्मा’ने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. याचबरोबर या कारखान्याचे धोरण शेतकरी हिताचे असते, याबाबत दुमत नाही; पण या कारखान्याची ‘एफआरपी’ २५६९ रुपये निघत होती. त्यामुळे ‘हुतात्मा’ला एवढी उचल देणे कायद्याने बंधनकारक होते. या तुलनेत दत्त-शिरोळने शेतकऱ्यांना प्रतिटन १५० रुपयेप्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे. त्यांची ‘एफआरपी’ २२९२ रुपये निघत असतानाही त्यांनी आतापर्यंत २४५० रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. जवाहर-हुपरीची ‘एफआरपी’ २२७० रुपये आहे. त्यांनी २३०० रुपये पहिली उचल दिली आहे. आता २०० रुपयांपर्यंत दुसरा हप्ता काढला आहे. त्यामुळे विभागात ‘एफआरपी’पेक्षा जादा दर देण्यात ‘दत्त’ व ‘जवाहर’ भारी पडले आहेत. (प्रतिनिधी)