शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

ऊसदरात ‘दत्त’, ‘जवाहर’च भारी

By admin | Updated: June 28, 2014 00:48 IST

यंदा शेतकऱ्यांना दिलासा : ‘एफआरपी’पेक्षा दीडशे रुपये जादा दर

 कोल्हापूर : हुतात्मा साखर कारखान्याने राज्यात उच्चांकी दर दिला असला तरी हा दर ‘एफआरपी’प्रमाणेच दिला आहे. परंतु, दत्त-शिरोळ व जवाहर-हुपरी या कारखान्यांनी ‘एफआरपी’पेक्षा १५० ते २०० रुपये जादा दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. गेल्या गळीत हंगामात साखरेचे घसरलेले दर व ‘एफआरपी’ याचा ताळमेळ घालताना साखर कारखानदारांची पुरती दमछाक झाली होती. कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची ‘एफआरपी’ २२५० ते २५६९ रुपयांपर्यंत होती. पहिल्या उचलीत एवढी रक्कम देणे शक्य होणार नाही, असे कारखानदारांचे म्हणणे होते; पण कारवाईच्या बडग्याने ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावेच लागले. हे पैसे शेतकऱ्यांना देणे कारखानदारांच्या आवाक्याबाहेर होते; पण केंद्र शासनाने ६६०० कोटींचे पॅकेज कारखान्यांना दिल्याने ‘एफआरपी’प्रमाणे दर देणे शक्य झाले. ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना दिलेल्या उचलीमध्ये विभागातच नव्हे, संपूर्ण राज्यात सर्वाधिक दर हा हुतात्मा साखर कारखाना, वाळवा यांनी २५७१ रुपये प्रतिटन दिला. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर देत ‘हुतात्मा’ने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. याचबरोबर या कारखान्याचे धोरण शेतकरी हिताचे असते, याबाबत दुमत नाही; पण या कारखान्याची ‘एफआरपी’ २५६९ रुपये निघत होती. त्यामुळे ‘हुतात्मा’ला एवढी उचल देणे कायद्याने बंधनकारक होते. या तुलनेत दत्त-शिरोळने शेतकऱ्यांना प्रतिटन १५० रुपयेप्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे. त्यांची ‘एफआरपी’ २२९२ रुपये निघत असतानाही त्यांनी आतापर्यंत २४५० रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. जवाहर-हुपरीची ‘एफआरपी’ २२७० रुपये आहे. त्यांनी २३०० रुपये पहिली उचल दिली आहे. आता २०० रुपयांपर्यंत दुसरा हप्ता काढला आहे. त्यामुळे विभागात ‘एफआरपी’पेक्षा जादा दर देण्यात ‘दत्त’ व ‘जवाहर’ भारी पडले आहेत. (प्रतिनिधी)