शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीक कर्जवाटपात कोल्हापूर पुणे विभागात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 13:04 IST

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार नाबार्ड जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देते. पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँका सक्षम असल्याने त्यांना एकूण वाटपापैकी ५० टक्के उद्दिष्ट दिले जाते.

ठळक मुद्देमहिन्याभरात ६५ हजार शेतकऱ्यांना ५४५ कोटींचे कर्जवाटप विभागातील जिल्हा बँकांबरोबर राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांचा पुढाकार

राजाराम लोंढेकोल्हापूर : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली असून, पीक कर्जाच्या मागणीतही वाढ होत आहे. राज्यातील बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप पीककर्जाचे वाटप सुरू झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने प्रभावीपणे कर्जवाटप केले असून, पुणे विभागात कोल्हापूर पुढे राहिले आहे. जिल्ह्यासाठी १२४० कोटींचे उद्दिष्ट होते, त्यापैकी दीड महिन्यात तब्बल ५४५ कोटींचे वाटप करून जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात भात, भुईमूग, नागली, सोयाबीन, खरीप, ज्वारीसह कडधान्य व ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो. या पिकांना एप्रिलपासूनच पीक कर्जवाटप सुरू होते. साधारणत: सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्जवाटपाची मुदत असली तरी मे, जूनमध्येच बहुतांश शेतकरी कर्जाची उचल करतात. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार नाबार्ड जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत, खासगी व ग्रामीण बँकांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट देते. पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँका सक्षम असल्याने त्यांना एकूण वाटपापैकी ५० टक्के उद्दिष्ट दिले जाते. गेल्या दोन महिन्यांत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकांनी विकास संस्थांच्या माध्यमातून एक लाख ७३ हजार ४५४ शेतकऱ्यांना ११३४ कोटी २९ लाखांचे पीक कर्ज दिले आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनीही विभागातील साडेसहा हजार शेतकऱ्यांना ५७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.

केडीसीसीची कर्जवाटपात राज्यात आघाडीपीककर्ज वाटपात पुणे विभागातील जिल्हा मध्यवर्ती बँका नेहमीच पुढे असतात. त्यातही कोल्हापूूर जिल्हा मध्यवर्ती बँक (केडीसीसी) आघाडीवर असते. गेल्या खरीप हंगामात या बँकेने उद्दिष्टाच्या तुलनेत १६६ टक्के कर्जाचे वाटप केले होते. आतापर्यंतही तिने ७६ टक्के वाटप करून राज्यात आघाडी घेतली आहे.२४ हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहणारकोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी दोन लाख २४ हजार शेतकरी पीककर्जाची उचल करतात. मात्र यंदा महापूर, साखर कारखान्यांच्या प्रलंबित असणाऱ्या उसाच्या बिलांमुळे कसे तरी दोन लाख शेतकरीच कर्जासाठी पात्र ठरतील, असा अंदाज आहे.लॉकडाऊनमुळे कर्ज वितरणावर परिणामसध्या सगळीकडेच लॉकडाऊन सुरू असल्याने त्याचा फटका कर्जवाटपास बसला आहे. गावे बंद असल्याने सचिवांना विकास संस्थेपर्यंत जाता येत नसल्याने कर्जपुरवठा थांबल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहेत.

  • कोल्हापूर विभागातील पीक कर्जवाटप, कोटींत -
  • जिल्हा उद्दिष्ट प्रत्यक्ष वाटप शेतकरी संख्या

 

  • कोल्हापूर १२४०.११ ५४५.२६ ६५,३९०

 

  • सांगली १५५७.०० २७७.१९ ४०,४१८
  • सातारा २२७०.०० ३६९.६१ ७४,५२९

एकूण ५०६७.११ ११९२.०७ १,८०,३३७ 

पीक कर्जवाटपात कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची कर्जवाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.- राहुल माने (व्यवस्थापक, लीड बँक)

टॅग्स :FarmerशेतकरीbankबँकPuneपुणेkolhapurकोल्हापूर