शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पोलिसांमधील गुन्हेगारी, भ्र्रष्टाचार कमी करणार : पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:37 IST

कोल्हापूर : महाराष्टत असे कोणते शहर आहे की, ज्याला स्वत:ची ओळख आहे. मात्र, ते कोल्हापूर आहे. अशा जिल्ह्णात काम करताना सुरुवातीस पोलिसांमध्ये गुन्हेगारी, भ्रष्टाचार आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न करू. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबर वाहतूक समस्येचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ, असा विश्वास नवे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी ...

ठळक मुद्देसंघटित गुन्हेगारीला आळा घालणार; वाहतूक समस्याही सोडवणार

कोल्हापूर : महाराष्टत असे कोणते शहर आहे की, ज्याला स्वत:ची ओळख आहे. मात्र, ते कोल्हापूर आहे. अशा जिल्ह्णात काम करताना सुरुवातीस पोलिसांमध्ये गुन्हेगारी, भ्रष्टाचार आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न करू. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबर वाहतूक समस्येचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ, असा विश्वास नवे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पदभार स्वीकारताना कोल्हापूरच्या जनतेला दिला.

ते म्हणाले, गडचिरोलीतील आणि कोल्हापुरातील कामाची पद्धत वेगळी आहे. मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच कामाला सुरुवात करतो. गुन्हेगारी नियंत्रण, संघटित गुन्हेगारीला आळा घालणे, वाहतूक समस्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यावर काम करण्याचा माझा निश्चितच भर राहील. कोल्हापूरला पोलीस अधीक्षक म्हणून काम करण्यास संधी मिळणे, हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे.

पोलीस दलात लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे, ते रोखण्यासाठी आपण काय करणार? या प्रश्नावर ते म्हणाले, कर्मचाऱ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी लक्ष दिले जाईल. छुप्या मार्गाने अल्पकाळात फायदा मिळविण्यासाठी जर प्रयत्न केला तर त्याचा परिणाम आपल्या नोकरीवर, कुटुंबावर होईल हे दाखवून देऊ. जे चांगले काम करतात त्यांचा सन्मान करू. दहा लोक भ्रष्ट कारभार करीत असतील तर त्याचे प्रमाण एक-दोनवर आणण्याचा आपला प्रयत्न राहील.इचलकरंजीतील गुन्हेगारीवर कठोर पाऊल उचलूइचलकरंजी शहर व परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. येथील संघटित गुन्हेगारांची मोठी दहशत आहे. त्यांच्यापुढे एकही नागरिक तक्रार देण्यास पुढे येण्याचे धाडस करीत नाही.यावर डॉ. देशमुख म्हणाले, संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पाऊल उचलू.नागरिकांना सन्मानाची वागणूकते म्हणाले, जिल्ह्णातील अधिकारी व कर्मचाºयांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून, महाराष्टÑात नागरिकांना सर्वांत चांगली वागणूक कोल्हापूर पोलिसांकडून मिळते, हे दाखवून देण्याचा आपला प्रयत्न राहिल.कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी स्वीकारला. यावेळी त्यांचे स्वागत करताना मावळते पोलीस अधीक्षक संजय मोहिते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसfraudधोकेबाजीCrimeगुन्हा