शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

दानोळीतील १४00 जणांवर गुन्हे शासकीय कामात अडथळा : ९0 जणांची नावे निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:24 IST

जयसिंगपूर : इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दानोळी (ता. शिरोळ) येथील ९0 जणांसह १४०० अज्ञातांवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देगावात तणावपूर्ण शांतता

जयसिंगपूर : इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दानोळी (ता. शिरोळ) येथील ९0 जणांसह १४०० अज्ञातांवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे, सर्जेराव शिंदे, रावसाहेब भिलवडे, रामा शिंदे, गब्रू गावडे, मानाजीराव भोसले, बापूसो दळवी, सुकुमार पाटील, सुजाता शिंदे, सतीश मलमे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इचलकरंजी नगरपालिकेचे जलअभियंता अजय विश्वासराव साळुंखे यांनी पोलिसांत तक्रार दिली.बुधवारी (दि. ०२) दानोळी (ता. शिरोळ) येथे इचलकरंजीच्या अमृत योजनेच्या कामाची सुरुवात करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस फौजफाटा गेला होता. यावेळी शिवाजी चौकात संशयित आरोपींनी त्यांना रोखले. शासकीय कामात अडथळा आणून योजनेचे काम करण्यास गेलो असताना रस्त्यात टायरी पेटवून रस्ता अडविला. शिवाय दुकाने बंद ठेवून आर्थिक नुकसान करण्यात आले. नदीकडे जाणाºया मार्गावर दगडांचा बांध टाकून रस्ता बंद करण्यात आला होता. जिल्हाधिकाºयांच्या बंदी आदेशाचाही भंग करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण, छायाचित्रे प्रसारित केल्यामुळे संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे यांनी दिली.दरम्यान, या घटनेत सुमारे९0 जणांची नावे निष्पन्न झाली असून, अटकसत्र मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वारणेप्रश्नी आमदारांचे पर्यावरणमंत्र्यांना साकडेशिरोळ : पंचगंगा नदी प्रदूषण करणाºया घटकांकडे डोळेझाक करणाºया प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार उल्हास पाटील यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. तर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी पोलीस बळाचा वापर करून दानोळी येथे वारणा योजनेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. पर्यावरण विभागाकडून प्रदूषणाबाबत अहवाल घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये, असे आदेश संबंधितांना द्यावेत, अशीही मागणी आमदार पाटील यांनी पर्यावरणमंत्री कदम यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी त्याचबरोबर सांगली व मिरज महापालिकेचे दूषित पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्याचा फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे. वारणा पाणी बचाव कृती समिती व ( पान ४ वर)फौजफाटा तळ ठोकूनआता माघार नाही : धनवडेदानोळी येथील वारणा बचाव कृती समितीच्यावतीने गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. बुधवारच्या घटनेनंतर दानोळी येथे गुरुवारी तणावपूर्ण शांतता होती. तर आमच्यावर गुन्हे दाखल करणाºयांनी कोणत्या सरकारी कामात अडथळा आणला हे दाखवून द्यावे. गावामध्ये दहा हजार समितीचे कार्याध्यक्ष आहेत. आम्हाला बंदिस्त ठेवावे. आता माघार नाही, अशी भूमिका वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे यांनी व्यक्त केली.उमळवाड, कवठेसार कोथळीत कडकडीत बंदउदगाव / दानोळी : वारणेचे पाणी इचलकरंजीला देणार नाही, या दानोळीकरांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरुवारी शिरोळ तालुक्यातील कोथळी, उमळवाड, कवठेसार या गावांमधील व्यवहार बंद ठेवून शासनाच्या विरोधात निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये सरपंच व गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यासह परिसरातील गावांमधूनही आंदोलनाला बळ मिळत आहे.कोथळीत गुरुवारी सकाळी रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. ‘पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात आल्या. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून अमृत योजनेला विरोध दर्शविला. यावेळी सरपंच अमृता पाटील-धडेल, उपसरपंच सागर पुजारी, संजय नांदणे, शीतल पाटील-धडेल, रावसो बोरगावे, सुकुमार नेजकर यांच्यासह ग्रामस्थ रॅलीत सहभागी झाले होते. तर उमळवाड येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास गावातून रॅली काढून व्यवहार बंद ठेवले. उदगावच्या जि. प. सदस्या स्वाती सासणे व शिवसेनेचे नेते भरत वरेकर यांनी वारणा बचाव कृती समितीला उदगावकरांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. कवठेसार येथे सकाळी नऊच्या सुमारास गावातून रॅली काढून अमृत योजनेला विरोध दर्शविला. सर्व व्यवहार दिवसभर बंद होते. यावेळी पोपट भोकरे, संदीप कांबळे, अमित पाटील, सुधाकर भोसले, राहुल भोकरे, भोला लतिफ, सर्जेराव गाडवे, भरत तेरदाळे, संजय चंदोबा उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater pollutionजल प्रदूषण