शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

देश प्रगतीसाठी धडपडणारा शिलेदार

By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST

कृषिक्रांतीचे शिलेदार

कौटिल्याने अर्थशास्त्रविषयक विवेचनामध्ये प्रगत राज्याबाबत सत्यवचन लिहून ठेवले आहे. कौटिल्याच्या प्रगत राज्याच्या संकल्पनेप्रमाणे ज्या राज्यातील शेती उत्पादन पावसावर अवलंबून नसते ते राज्य प्रगत असते. हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शाहू महाराजांसारख्या द्रष्ट्या राजाने प्रयत्न केलेले कोल्हापूरवासीयांना ज्ञात आहेच. तसेच आपले राज्य, देश प्रगत बनवण्यासाठी धडपडणारा शिलेदार म्हणजे विलासराव साळुंखे!सांगली जिल्ह्यातील रांजणी गावचे सैनिक सुभेदार बळवंतराव ऊर्फ नानासाहेब साळुंखे यांच्या ज्येष्ठ पुत्राच्या रूपात विलासरावांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३७ रोजी झाला. बालपणापासूनच विलासराव हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. पुण्याच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यांनी महाविद्यालयातील पडीक जागेत महिनाभरात सुंदर बगीचा फुलविला होता आणि हा बगीचा अनेक वर्ष साळुंखेची बाग म्हणून ओळखला जात होता.अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याच महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्य केले. विद्युत मोटार वायंडिंगचे वर्कशॉप काढले. पानशेत धरणफुटीमध्ये ते वाहून गेले. त्याच आपत्तीमुळे मोटार रिवायंडिंगची कामे मात्र मोठ्या प्रमाणात येऊ लागली. त्यांनी बळवंत इंजिनिअरिंग वर्कशॉप सुरू केले. याचेच पुढे क्युरेट इंजिनिअरिंगमध्ये रूपांतर झाले. त्याच काळात त्यांनी युरोप दौरा केला. क्युरेट इंजिनिअरिंग भरभराटीस येत असतानाच १९७२ चा दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे निर्माण झालेले चित्र पाहून विलासराव अस्वस्थ झाले. लोक अन्न आणि पैशासाठी रस्त्यासाठी खडी फोडण्याचे काम करत. दुष्काळावर मात करण्यासाठी काय करता येईल, याचा ते विचार करू लागले. अशीच पाहणी करत असताना झेंडेवाडी येथे वेगळे चित्र दिसले. झेंडेवाडी येथील लोक आपल्या शेतात काम करत होते. त्यांनी अगोदरच्या वर्षी नालाबंडींगची कामे केली होती. त्यामुळे त्या गावाला दुष्काळाच्या झळा बसल्या नव्हत्या.ग्रामीण विकासासाठी शेतकऱ्याला बारा महिने पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे विलासरावांनी ओळखले. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्याऐवजी नालाबंडींगची कामे करावीत, असे सुचविले. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शवली. लघुसिंचन विभागाने अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगितले. विलासरावांनी चुणचुणीत मुले निवडून त्यांना स्वखर्चाने प्रशिक्षण दिले. नालाबंडींगची कामे पुरंदर तालुक्यात सुरू केली. १९७३ मध्ये पडलेल्या पावसात याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. पाणी प्रश्न समजून घेण्यासाठी ते इस्रायलला गेले. ग्रामगौरव प्रतिष्ठानची स्थापना केली. ग्रामीण विकासासाठी खेड्यात राहावयाचा निर्णय घेतला आणि नायगावला राहावयास गेले. गावात जागोजागी पाणी अडेल आणि ते गावातच मुरेल याची दक्षता घेतली. बांधावर झाडे लावून जमिनीची धूप थांबवली. सुरुवातीला केवळ एक चतुर्थांश जमिनीवर बागाईत शेती सुरू केली. यशस्वी प्रयोगाचा प्रसार करत नवे ज्ञान आणि प्रकल्प राबवताना ते ज्येष्ठांचे अनुभवही ऐकत. शेतीपूरक उद्योगांची माहिती शेतकऱ्यांना देऊन नवे उत्पन्नवाढीचे मार्ग दाखविले. नायगावात दुधाचा महापूर आला. उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थित नियोजनाने काय होऊ शकते, हे नायगाव प्रकल्पाने दाखवून दिले. पुढे हा नायगाव पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला. शासनाने नायगावच्या धर्तीवर जलसंधारणाची कामे करावीत असे कळविले. त्यांना १९८६ साली जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित केले गेले. या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाने २३ एप्रिल २००२ रोजी इहलोकीचा निरोप घेतला.- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.