शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

देश प्रगतीसाठी धडपडणारा शिलेदार

By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST

कृषिक्रांतीचे शिलेदार

कौटिल्याने अर्थशास्त्रविषयक विवेचनामध्ये प्रगत राज्याबाबत सत्यवचन लिहून ठेवले आहे. कौटिल्याच्या प्रगत राज्याच्या संकल्पनेप्रमाणे ज्या राज्यातील शेती उत्पादन पावसावर अवलंबून नसते ते राज्य प्रगत असते. हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शाहू महाराजांसारख्या द्रष्ट्या राजाने प्रयत्न केलेले कोल्हापूरवासीयांना ज्ञात आहेच. तसेच आपले राज्य, देश प्रगत बनवण्यासाठी धडपडणारा शिलेदार म्हणजे विलासराव साळुंखे!सांगली जिल्ह्यातील रांजणी गावचे सैनिक सुभेदार बळवंतराव ऊर्फ नानासाहेब साळुंखे यांच्या ज्येष्ठ पुत्राच्या रूपात विलासरावांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३७ रोजी झाला. बालपणापासूनच विलासराव हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. पुण्याच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यांनी महाविद्यालयातील पडीक जागेत महिनाभरात सुंदर बगीचा फुलविला होता आणि हा बगीचा अनेक वर्ष साळुंखेची बाग म्हणून ओळखला जात होता.अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याच महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्य केले. विद्युत मोटार वायंडिंगचे वर्कशॉप काढले. पानशेत धरणफुटीमध्ये ते वाहून गेले. त्याच आपत्तीमुळे मोटार रिवायंडिंगची कामे मात्र मोठ्या प्रमाणात येऊ लागली. त्यांनी बळवंत इंजिनिअरिंग वर्कशॉप सुरू केले. याचेच पुढे क्युरेट इंजिनिअरिंगमध्ये रूपांतर झाले. त्याच काळात त्यांनी युरोप दौरा केला. क्युरेट इंजिनिअरिंग भरभराटीस येत असतानाच १९७२ चा दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे निर्माण झालेले चित्र पाहून विलासराव अस्वस्थ झाले. लोक अन्न आणि पैशासाठी रस्त्यासाठी खडी फोडण्याचे काम करत. दुष्काळावर मात करण्यासाठी काय करता येईल, याचा ते विचार करू लागले. अशीच पाहणी करत असताना झेंडेवाडी येथे वेगळे चित्र दिसले. झेंडेवाडी येथील लोक आपल्या शेतात काम करत होते. त्यांनी अगोदरच्या वर्षी नालाबंडींगची कामे केली होती. त्यामुळे त्या गावाला दुष्काळाच्या झळा बसल्या नव्हत्या.ग्रामीण विकासासाठी शेतकऱ्याला बारा महिने पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे विलासरावांनी ओळखले. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्याऐवजी नालाबंडींगची कामे करावीत, असे सुचविले. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शवली. लघुसिंचन विभागाने अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगितले. विलासरावांनी चुणचुणीत मुले निवडून त्यांना स्वखर्चाने प्रशिक्षण दिले. नालाबंडींगची कामे पुरंदर तालुक्यात सुरू केली. १९७३ मध्ये पडलेल्या पावसात याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. पाणी प्रश्न समजून घेण्यासाठी ते इस्रायलला गेले. ग्रामगौरव प्रतिष्ठानची स्थापना केली. ग्रामीण विकासासाठी खेड्यात राहावयाचा निर्णय घेतला आणि नायगावला राहावयास गेले. गावात जागोजागी पाणी अडेल आणि ते गावातच मुरेल याची दक्षता घेतली. बांधावर झाडे लावून जमिनीची धूप थांबवली. सुरुवातीला केवळ एक चतुर्थांश जमिनीवर बागाईत शेती सुरू केली. यशस्वी प्रयोगाचा प्रसार करत नवे ज्ञान आणि प्रकल्प राबवताना ते ज्येष्ठांचे अनुभवही ऐकत. शेतीपूरक उद्योगांची माहिती शेतकऱ्यांना देऊन नवे उत्पन्नवाढीचे मार्ग दाखविले. नायगावात दुधाचा महापूर आला. उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थित नियोजनाने काय होऊ शकते, हे नायगाव प्रकल्पाने दाखवून दिले. पुढे हा नायगाव पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला. शासनाने नायगावच्या धर्तीवर जलसंधारणाची कामे करावीत असे कळविले. त्यांना १९८६ साली जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित केले गेले. या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाने २३ एप्रिल २००२ रोजी इहलोकीचा निरोप घेतला.- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.