शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

कामे मंजुरी ते ठेकेदार नियुक्तीपर्यंत सगळे काही करतात राजकीय नेतेच, कोल्हापूर महानगरपालिकेत वाढला भ्रष्टाचार

By भारत चव्हाण | Updated: October 9, 2025 18:06 IST

विकासकामांचा बट्ट्याबोळ यामुळेच, हतबल अधिकारी, निकृष्ट कामे

भारत चव्हाण कोल्हापूर : राज्यकर्त्यांना पाहिजे त्याच कामांचे एस्टिमेट केली जातात. शासकीय दरबारी राजकीय वजन वापरून निधी मंजूर करून त्या कामांचा शासन निर्णय आणतात. निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर अमुक एका ठेकेदारालाच काम देण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे कामे रेंगाळण्यासह त्याचा दर्जाही निकृष्ट राहात असल्याचा अनुभव सातत्याने येऊ लागला आहे. ज्यांनी ही ठेकेदार ठरवून त्याच्याकडून टक्केवारी घेतली तेच लोक पुन्हा महापालिकेचा कारभार किती भोंगळ आहे असा आरोप बैठक घेऊन चढ्या आवाजात करू लागले आहेत.एका नेत्याने तर महापालिकेची कामे करणाऱ्या प्रमुख ठेकेदारांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेऊन अमुक एक काम अमुक ठेकेदार करणार आहे, त्याठिकाणी कोणी निविदा भरू नये असे बजावले होते. कोणती कामे कोणी करायची याची यादीच तयार केली जाते. त्यानुसार ठेकेदार निविदा भरतात. गेल्या काही वर्षातील हाच अनुभव आहे.अलिकडील काळात राजकारणी आणि ठेकेदार यांची युती झाल्यामुळे विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा अधिकार अधिकाऱ्यांच्या हातून निसटला आहे. कोणती कामे करायची, त्याला निधी किती मंजूर करायचा याचा थेट शासन निर्णयच अधिकाऱ्यांच्या हातात पडत असल्याने त्याची अंमलबजावणी करण्यापलिकडे अधिकाऱ्यांच्या हातात काहीच राहात नाही.पंधरा वीस वर्षांपूर्वी शहरातील विकासकामांची एक विशिष्ट प्रक्रिया ठरलेली होती. प्रशासनातील अधिकारी शहरातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवायचे. त्यानुसार त्याची अंदाजपत्रके तयार होत होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून विकासकामे दिली जात होती. ही निविदा प्रक्रिया अतिशय पारदर्शक असायची. परंतु, अलिकडील काही वर्षांत ही प्रक्रियाच माेडून काढली आहे.

शंभर कोटींचे काय..?शंभर कोटींच्या रस्त्यांच्या कामांची एकच निविदा निघाली. स्थानिक ठेकेदारांनी ही निविदा फोड करून पाच ते दहा कोटींच्या कामाच्या निविदा काढाव्यात असा बराच प्रयत्न केला. बरीच आदळआपट केली. परंतु शासनाने जी. आर. काढताना ती एकच निविदा काढण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर ठेकेदाराचा स्वत:चा बॅचमिक्स प्लँट असला पाहिजे अशी अट घातली. त्यामुळे स्थानिक ठेकेदार त्या कामास अपात्र ठरले.

गुणवत्तेकडे दुर्लक्ष का होते?राजकारणी आणि ठेकेदार यांची युती अधिकाऱ्यांची मोठी डोकेदुखी आहे. अधिकारी कामाच्या गुणवत्तेवर जास्तच नियंत्रण ठेवायला लागले तर अधिकाऱ्यांची खरडपट्टी सुरू होते. एकीकडे सार्वजनिक टीका आणि दुसरीकडे राजकीय हस्तक्षेप यामुळे अधिकारी हतबल झाले आहेत.

वरिष्ठ अधिकारीही आश्चर्यचकितमूलभूत सेवा सुविधाअंतर्गत शहरात २२ कोटींची कामे होणार आहेत. त्याचा आढावा घेण्यात आला. गल्लीबोळातील किरकोळ कामे यात धरली आहेत. हे पाहून एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, कनिष्ठ अधिकाऱ्यांना झापले. शहरातील मुख्य रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत आणि तुम्ही असली गल्लीबोळातील कामे यात कशाला धरली आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी शासन निर्णय झाला असल्याने आता त्यात काही बदल होणार नसल्याचे स्पष्टीकरण त्या अधिकाऱ्याने दिले.