शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
2
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
3
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
4
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
5
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
6
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
7
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
8
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
9
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
10
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
11
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
12
अखेर केडीएमसीने मॅनहोलमध्ये पडलेेल्या 'त्या' मुलाच्या मृत्युची जबाबदारी घेतली, पालकांना देणार सहा लाख
13
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
14
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
15
हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार
16
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
17
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
18
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
19
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
20
Palash Muchhal: पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
Daily Top 2Weekly Top 5

चुकांच्या दुरुस्तीने दहावीच्या निकालाची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे नाव, गुणांच्या नोंदी आदी स्वरूपातील तांत्रिक चुकांची दुरुस्ती झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबतच्या प्रक्रियेची गती ...

कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे नाव, गुणांच्या नोंदी आदी स्वरूपातील तांत्रिक चुकांची दुरुस्ती झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबतच्या प्रक्रियेची गती वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व ९३१ शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण करून त्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाला सादर केली आहे.

या विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १,३९,५१८ विद्यार्थ्यांच्या गुणांची शाळांनी राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या संगणक प्रणालीमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात विद्यार्थ्यांचे नाव, कमी अथवा जादा गुणांची नोंद, एका विषयाचे गुण दुसऱ्या विषयासाठी नोंदविले जाणे, आदींचा समावेश आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी कोल्हापूर विभागाच्यावतीने जिल्हानिहाय शिबिर घेण्यात आले. दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित प्रक्रिया संपवून निकालाबाबतची माहिती राज्य मंडळाला कोल्हापूर विभागाकडून सादर केली जाणार आहे.

पॉंइंटर

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी : ५६,२२४

मुले : ३१,०८३

मुली : २५,१४१

मूल्यांकन पूर्ण झालेल्या शाळा : ९३१

पॉंइंटर

अशा होत्या मूल्यांकनातील चुका

१) विद्यार्थ्यांच्या नाव, आडनावामध्ये बदल

२) एका विषयाच्या गुणांची दुसऱ्या विषयाला नोंद

३) ४० ऐवजी ३० अशी गुणांची नोंद

४) पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंदमध्ये चुका

५) २० आणि ३० टक्के गुणांमध्ये झालेली सरमिसळ

६) गुणांची कमी-जास्त स्वरूपात नोंद

प्रतिक्रिया

मुख्याध्यापक म्हणतात...

एसएससी बोर्डाने ऑनलाईन स्वरूपात शाळांकडून गुणांची नोंद करून घेतल्याने त्यांचे काम सोपे झाले. अनेकवेळा बदललेल्या परिशिष्टांमुळे निकाल भरताना शिक्षकांची मात्र तारांबळ उडाली. गुणांची नोंद शाळांनी केल्याने निकालाचे औत्सुक्य राहिले नाही.

-जी. के. भोसले, श्री. चौंडेश्वरी हायस्कूल, हळदी

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची ऑनलाईन नोंद करताना सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. एसएससी बोर्डाने त्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याने त्या वेळीच दूर झाल्या. राज्य मुख्याध्यापक महामंडळाने ५० हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले. बोर्डाच्या पातळीवरील कार्यवाही लवकर पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल.

-बी. बी. पाटील, पी. एस. तोडकर हायस्कूल, वाकरे

प्रतिक्रिया

मूल्यांकनामध्ये शाळांच्या पातळीवरील तांत्रिक चुकांची दुरुस्ती झाली आहे. त्यापुढील प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर विभागाच्या निकालाची माहिती राज्य शिक्षण मंडळाला सादर केली जाणार आहे.

-देविदास कुलाळ, विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ