शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

चुकांच्या दुरुस्तीने दहावीच्या निकालाची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे नाव, गुणांच्या नोंदी आदी स्वरूपातील तांत्रिक चुकांची दुरुस्ती झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबतच्या प्रक्रियेची गती ...

कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे नाव, गुणांच्या नोंदी आदी स्वरूपातील तांत्रिक चुकांची दुरुस्ती झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबतच्या प्रक्रियेची गती वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व ९३१ शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण करून त्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाला सादर केली आहे.

या विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १,३९,५१८ विद्यार्थ्यांच्या गुणांची शाळांनी राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या संगणक प्रणालीमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात विद्यार्थ्यांचे नाव, कमी अथवा जादा गुणांची नोंद, एका विषयाचे गुण दुसऱ्या विषयासाठी नोंदविले जाणे, आदींचा समावेश आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी कोल्हापूर विभागाच्यावतीने जिल्हानिहाय शिबिर घेण्यात आले. दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित प्रक्रिया संपवून निकालाबाबतची माहिती राज्य मंडळाला कोल्हापूर विभागाकडून सादर केली जाणार आहे.

पॉंइंटर

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी : ५६,२२४

मुले : ३१,०८३

मुली : २५,१४१

मूल्यांकन पूर्ण झालेल्या शाळा : ९३१

पॉंइंटर

अशा होत्या मूल्यांकनातील चुका

१) विद्यार्थ्यांच्या नाव, आडनावामध्ये बदल

२) एका विषयाच्या गुणांची दुसऱ्या विषयाला नोंद

३) ४० ऐवजी ३० अशी गुणांची नोंद

४) पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंदमध्ये चुका

५) २० आणि ३० टक्के गुणांमध्ये झालेली सरमिसळ

६) गुणांची कमी-जास्त स्वरूपात नोंद

प्रतिक्रिया

मुख्याध्यापक म्हणतात...

एसएससी बोर्डाने ऑनलाईन स्वरूपात शाळांकडून गुणांची नोंद करून घेतल्याने त्यांचे काम सोपे झाले. अनेकवेळा बदललेल्या परिशिष्टांमुळे निकाल भरताना शिक्षकांची मात्र तारांबळ उडाली. गुणांची नोंद शाळांनी केल्याने निकालाचे औत्सुक्य राहिले नाही.

-जी. के. भोसले, श्री. चौंडेश्वरी हायस्कूल, हळदी

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची ऑनलाईन नोंद करताना सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. एसएससी बोर्डाने त्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याने त्या वेळीच दूर झाल्या. राज्य मुख्याध्यापक महामंडळाने ५० हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले. बोर्डाच्या पातळीवरील कार्यवाही लवकर पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल.

-बी. बी. पाटील, पी. एस. तोडकर हायस्कूल, वाकरे

प्रतिक्रिया

मूल्यांकनामध्ये शाळांच्या पातळीवरील तांत्रिक चुकांची दुरुस्ती झाली आहे. त्यापुढील प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर विभागाच्या निकालाची माहिती राज्य शिक्षण मंडळाला सादर केली जाणार आहे.

-देविदास कुलाळ, विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ