शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही - सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 01:37 IST

रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी स्वयंस्फूर्तीनेच लॉकडाऊन कडक केला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने व आजरा शहरातील बाजारपेठ आज, मंगळवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.

कोल्हापूर : रुग्णांची संख्या वाढत आहे हे खरे असले तरी कोल्हापुरात तूर्तात लॉकडाऊन कडक करण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सायंकाळी स्पष्ट केले.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत लॉकडाऊन कडक करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर चर्चेत होत्या. त्याअनुषंगाने सोमवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पालकमंत्री पाटील सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी यासंबंधी चर्चा करणार होते, परंतु ती चर्चा होऊ शकली नाही.रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी स्वयंस्फूर्तीनेच लॉकडाऊन कडक केला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने व आजरा शहरातील बाजारपेठ आज, मंगळवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. असाच निर्णय अन्य गावांतही झाला आहे.कोल्हापुरातही रुग्ण आणि मृत्यूसंख्या वाढल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरच लॉकडाऊन कडक करण्याचा विचार सुरू आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री पाटील म्हणाले, रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्नशील आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात चांगले आहे.त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात, त्या आम्ही करत आहोत. त्यासाठी लॉकडाऊन करण्याची तूर्तास तरी आवश्यकता वाटत नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळावी, त्यांनी काळजी घ्यावी व अनावश्यक गर्दी टाळावी, सायंकाळनंतर अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील