शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही - सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 01:37 IST

रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी स्वयंस्फूर्तीनेच लॉकडाऊन कडक केला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने व आजरा शहरातील बाजारपेठ आज, मंगळवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.

कोल्हापूर : रुग्णांची संख्या वाढत आहे हे खरे असले तरी कोल्हापुरात तूर्तात लॉकडाऊन कडक करण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सायंकाळी स्पष्ट केले.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत लॉकडाऊन कडक करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर चर्चेत होत्या. त्याअनुषंगाने सोमवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पालकमंत्री पाटील सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी यासंबंधी चर्चा करणार होते, परंतु ती चर्चा होऊ शकली नाही.रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांनी स्वयंस्फूर्तीनेच लॉकडाऊन कडक केला आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावाने व आजरा शहरातील बाजारपेठ आज, मंगळवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे. असाच निर्णय अन्य गावांतही झाला आहे.कोल्हापुरातही रुग्ण आणि मृत्यूसंख्या वाढल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरच लॉकडाऊन कडक करण्याचा विचार सुरू आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री पाटील म्हणाले, रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्नशील आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात चांगले आहे.त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात, त्या आम्ही करत आहोत. त्यासाठी लॉकडाऊन करण्याची तूर्तास तरी आवश्यकता वाटत नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळावी, त्यांनी काळजी घ्यावी व अनावश्यक गर्दी टाळावी, सायंकाळनंतर अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील