शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:30 IST

कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.

ठळक मुद्दे पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याचीसमाजातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया : विलगीकरण केलेल्यांचीही तितकीच जबाबदारी

कोल्हापूर : कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.

रेड झोनमधून आलेल्या लोकांकडून स्थानिक लोकांना संसर्ग होऊ नये या काळजीपोटीच त्यांच्याबाबत गावपातळीवर आकसाची भूमिका घेतली जात आहे. या लोकांनीही पुरेशी दक्षता बाळगणे, हातावर शिक्का असतानाही गावांतून फिरणे बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. मुंबईकर लोकांनी महापुरात केलेल्या मदतीचे व्हिडीओ या बातमीसोबत अनेकांनी प्रसारित केले.पुण्या-मुंबईतील माणूस तुमच्या कोणत्याही अडीअडचणीला धावून आला आहे; त्यामुळे त्याच्या ऋणातून उतराई होण्याची गावांना ही संधी आहे, या भावनेने या अडचणीकडे पाहिले पाहिजे. कोरोनाचे संकट आज ना उद्या दूर होईल किंवा त्याला सोबत घेऊनच जगावे लागेल. कोणत्याही अडचणीच्या काळात कोण कुणाशी कसे वागला, याची नोंद मनात फार खोलवर होते हे लक्षात घेऊन व्यवहार होण्याची गरज आहे.

आतापर्यंत शाहूवाडी, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी या तालुक्यांत रेड झोनमधून मोठ्या संख्येने लोक आले आहेत. आता येत्या मंगळवार (दि. २६)पासूनही थांबलेले लोक येणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न नव्याने चर्चेत येणार आहे. तुम्ही आम्हांला हवे आहातच; पण कुटुंब, परिवार आणि आपला गाव कोरोनाच्या संसर्गापासून वाचला पाहिजे, यासाठीही तुमचीही जबाबदारी म्हणून काही दिवसांसाठी अंतर ठेवूया, आपलीच लहान मुले, वयोवृद्ध आईवडील घरोघरी आहेत. त्यांची काळजी घेऊया.

येणाऱ्या लोकांनी रीतसर परवानगी घेऊन तपासणी करून यावे. ग्रामस्थांनी त्यांचे संस्थात्मक किंवा घरी विलगीकरण करावे. त्यांनी गावाला समजून घ्यावे व गावाने त्यांना आधार द्यावा म्हणजे एकमेकांत संवादाचा पूल तयार होईल, अशी भावना व्यक्त झाली. गावे मतांसाठी, मदतीसाठी त्यांना इकडून गाड्या पाठवून आणतात आणि आता मात्र त्यांची दारात लागलेली गाडीही तुम्हांला का सहन होत नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे.

तुम्ही संकटात असता तेव्हा आपले लोक कसे वागतात हे जास्त महत्त्वाचे असते. गावांनी सामंजस्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त करणारे लेखन झाले.- शकील म्हालदार, बाळासाहेब फरासगगनबावडा

मुंबईतील नागरिकांबाबत अशी स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक होते. समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम या वृत्तामुळे झाले.- डॉ. सतीश पत्कीप्रसिद्ध प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ

मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकरच आहेत, ही भूमिका अत्यंत सामंजसपणाची व शहाणपणाची आहे. आपल्याच माणसांबद्दल निर्माण झालेली कटुता त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.- कौस्तुभ नाबरजाहिरात व्यावसायिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई