शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

CoronaVirus Lockdown : पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:30 IST

कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.

ठळक मुद्दे पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याचीसमाजातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया : विलगीकरण केलेल्यांचीही तितकीच जबाबदारी

कोल्हापूर : कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.

रेड झोनमधून आलेल्या लोकांकडून स्थानिक लोकांना संसर्ग होऊ नये या काळजीपोटीच त्यांच्याबाबत गावपातळीवर आकसाची भूमिका घेतली जात आहे. या लोकांनीही पुरेशी दक्षता बाळगणे, हातावर शिक्का असतानाही गावांतून फिरणे बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. मुंबईकर लोकांनी महापुरात केलेल्या मदतीचे व्हिडीओ या बातमीसोबत अनेकांनी प्रसारित केले.पुण्या-मुंबईतील माणूस तुमच्या कोणत्याही अडीअडचणीला धावून आला आहे; त्यामुळे त्याच्या ऋणातून उतराई होण्याची गावांना ही संधी आहे, या भावनेने या अडचणीकडे पाहिले पाहिजे. कोरोनाचे संकट आज ना उद्या दूर होईल किंवा त्याला सोबत घेऊनच जगावे लागेल. कोणत्याही अडचणीच्या काळात कोण कुणाशी कसे वागला, याची नोंद मनात फार खोलवर होते हे लक्षात घेऊन व्यवहार होण्याची गरज आहे.

आतापर्यंत शाहूवाडी, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी या तालुक्यांत रेड झोनमधून मोठ्या संख्येने लोक आले आहेत. आता येत्या मंगळवार (दि. २६)पासूनही थांबलेले लोक येणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न नव्याने चर्चेत येणार आहे. तुम्ही आम्हांला हवे आहातच; पण कुटुंब, परिवार आणि आपला गाव कोरोनाच्या संसर्गापासून वाचला पाहिजे, यासाठीही तुमचीही जबाबदारी म्हणून काही दिवसांसाठी अंतर ठेवूया, आपलीच लहान मुले, वयोवृद्ध आईवडील घरोघरी आहेत. त्यांची काळजी घेऊया.

येणाऱ्या लोकांनी रीतसर परवानगी घेऊन तपासणी करून यावे. ग्रामस्थांनी त्यांचे संस्थात्मक किंवा घरी विलगीकरण करावे. त्यांनी गावाला समजून घ्यावे व गावाने त्यांना आधार द्यावा म्हणजे एकमेकांत संवादाचा पूल तयार होईल, अशी भावना व्यक्त झाली. गावे मतांसाठी, मदतीसाठी त्यांना इकडून गाड्या पाठवून आणतात आणि आता मात्र त्यांची दारात लागलेली गाडीही तुम्हांला का सहन होत नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे.

तुम्ही संकटात असता तेव्हा आपले लोक कसे वागतात हे जास्त महत्त्वाचे असते. गावांनी सामंजस्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त करणारे लेखन झाले.- शकील म्हालदार, बाळासाहेब फरासगगनबावडा

मुंबईतील नागरिकांबाबत अशी स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक होते. समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम या वृत्तामुळे झाले.- डॉ. सतीश पत्कीप्रसिद्ध प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ

मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकरच आहेत, ही भूमिका अत्यंत सामंजसपणाची व शहाणपणाची आहे. आपल्याच माणसांबद्दल निर्माण झालेली कटुता त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.- कौस्तुभ नाबरजाहिरात व्यावसायिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई