शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

CoronaVirus Lockdown : पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:30 IST

कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.

ठळक मुद्दे पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याचीसमाजातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया : विलगीकरण केलेल्यांचीही तितकीच जबाबदारी

कोल्हापूर : कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.

रेड झोनमधून आलेल्या लोकांकडून स्थानिक लोकांना संसर्ग होऊ नये या काळजीपोटीच त्यांच्याबाबत गावपातळीवर आकसाची भूमिका घेतली जात आहे. या लोकांनीही पुरेशी दक्षता बाळगणे, हातावर शिक्का असतानाही गावांतून फिरणे बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. मुंबईकर लोकांनी महापुरात केलेल्या मदतीचे व्हिडीओ या बातमीसोबत अनेकांनी प्रसारित केले.पुण्या-मुंबईतील माणूस तुमच्या कोणत्याही अडीअडचणीला धावून आला आहे; त्यामुळे त्याच्या ऋणातून उतराई होण्याची गावांना ही संधी आहे, या भावनेने या अडचणीकडे पाहिले पाहिजे. कोरोनाचे संकट आज ना उद्या दूर होईल किंवा त्याला सोबत घेऊनच जगावे लागेल. कोणत्याही अडचणीच्या काळात कोण कुणाशी कसे वागला, याची नोंद मनात फार खोलवर होते हे लक्षात घेऊन व्यवहार होण्याची गरज आहे.

आतापर्यंत शाहूवाडी, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी या तालुक्यांत रेड झोनमधून मोठ्या संख्येने लोक आले आहेत. आता येत्या मंगळवार (दि. २६)पासूनही थांबलेले लोक येणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न नव्याने चर्चेत येणार आहे. तुम्ही आम्हांला हवे आहातच; पण कुटुंब, परिवार आणि आपला गाव कोरोनाच्या संसर्गापासून वाचला पाहिजे, यासाठीही तुमचीही जबाबदारी म्हणून काही दिवसांसाठी अंतर ठेवूया, आपलीच लहान मुले, वयोवृद्ध आईवडील घरोघरी आहेत. त्यांची काळजी घेऊया.

येणाऱ्या लोकांनी रीतसर परवानगी घेऊन तपासणी करून यावे. ग्रामस्थांनी त्यांचे संस्थात्मक किंवा घरी विलगीकरण करावे. त्यांनी गावाला समजून घ्यावे व गावाने त्यांना आधार द्यावा म्हणजे एकमेकांत संवादाचा पूल तयार होईल, अशी भावना व्यक्त झाली. गावे मतांसाठी, मदतीसाठी त्यांना इकडून गाड्या पाठवून आणतात आणि आता मात्र त्यांची दारात लागलेली गाडीही तुम्हांला का सहन होत नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे.

तुम्ही संकटात असता तेव्हा आपले लोक कसे वागतात हे जास्त महत्त्वाचे असते. गावांनी सामंजस्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त करणारे लेखन झाले.- शकील म्हालदार, बाळासाहेब फरासगगनबावडा

मुंबईतील नागरिकांबाबत अशी स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक होते. समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम या वृत्तामुळे झाले.- डॉ. सतीश पत्कीप्रसिद्ध प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ

मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकरच आहेत, ही भूमिका अत्यंत सामंजसपणाची व शहाणपणाची आहे. आपल्याच माणसांबद्दल निर्माण झालेली कटुता त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.- कौस्तुभ नाबरजाहिरात व्यावसायिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई