शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

corona virus : कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय: समूह संसर्गाला निमंत्रणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 11:30 AM

कोल्हापूर शहरात संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे.

ठळक मुद्देमास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई समूह संसर्गाला निमंत्रणच, कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय

कोल्हापूर : शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता तेव्हा संसर्ग होईल या भीतीमुळे दीड-दोन महिने स्वत:ला कोंडून घेणाऱ्या कोल्हापूरकरांनी आता मात्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचना न पाळण्याचा गाफीलपणा, तसेच दुर्लक्ष समूह संसर्गाला आमंत्रण देणारे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गाचे वादळ कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचले. जिल्हा प्रशासनाने चांगली खबरदारी घेतली. लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी केला. त्यामुळे कोरोनापासून कोल्हापूरकरांचा बचाव झाला. परंतु, पुणे, मुंबई, तसेच अन्य रेडझोनमधील शहरातून नागरिक यायला लागले तसा बाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली. सुरुवातीला त्याचेही काही वाटले नाही. बाहेरून आला, वेळीच तपासणी झाली आणि अलगीकरणही करण्यात आल्याने कोरोना पसरला नाही. जरी रुग्ण आढळले तरी ते वेळीच क्वारंटाईन, तसेच रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्यापासून अन्य कोणाला फारशी बाधा झाली नाही.परंतु, गेल्या काही दिवसांत ही रुग्ण संख्या वाढत असून, ती कमी होण्याचे नाव घेत नाही. कोरोनाचे रुग्ण आता हजाराचा टप्पा पार करीत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. भाजी मार्केट, बाजारपेठ अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे.सामाजिक अंतराचे भानच नाहीअनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले जात नाही, विना मास्क नागरिकांचा वावर आहे. मंडईत अथवा बाजारात गेले तरी त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेवले जात नाही. चौकाचौकात, प्रमुख रस्त्यांवर सामूहिकपणे एकत्रितपणे वावरणे सुरू आहे. संसर्ग होईल याचे भान कोणालाही राहिलेले नाही.परस्पर शहरात घुसघोरीशहरातील नागरिकांची तर कोरोनाचे संकट आता टळले आहे अशीच धारणा झाली की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. शहरात अनेकजण नाके चुकवून आले असून, परस्पर घरात गेले आहेत. ग्रामीण भागातसुद्धा पूर्वीसारखी देखरेख राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका वाढलेला आहे. अशा वेळी अधिक काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे.मास्क नसल्यास आजपासून दंडकोल्हापूर महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अधिक कडक भूमिका घेतली असून, जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना दंड करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा पहिला दणका पालिकेच्या अधिकाऱ्याला दिला. सोमवारी चक्क आस्थापना अधीक्षक सागर कांबळे यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला. आता ही मोहीम आज, मंगळवारपासून शहरात सुरू केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर