शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

corona in kolhapur-निवारागृहांतील लोकांंची मागविली राज्य शासनाने माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:38 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात राज्यासह परराज्यांतील ८१९ मजूर, कामगार अडकून पडले आहेत. त्यांना जिल्ह्यातील १५ निवारागृहांत ठेवण्यात आले आहे. त्यांतील अनेकजणांचा १४ दिवसांचा कालावधी उद्या, मंगळवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांना इथेच ठेवायचे की, आपल्या गावी पाठवायचे याबाबतचा निर्णय केंद्र व राज्य सरकार पातळीवर होणार आहे. तत्पूर्वी राज्य शासनाकडून येथील लोकांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यासह परराज्यांतील ८१९ जणांचा समावेश जिल्हा प्रशासनाकडून माहिती सादर

प्रवीण देसाईकोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात राज्यासह परराज्यांतील ८१९ मजूर, कामगार अडकून पडले आहेत. त्यांना जिल्ह्यातील १५ निवारागृहांत ठेवण्यात आले आहे. त्यांतील अनेकजणांचा १४ दिवसांचा कालावधी उद्या, मंगळवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांना इथेच ठेवायचे की, आपल्या गावी पाठवायचे याबाबतचा निर्णय केंद्र व राज्य सरकार पातळीवर होणार आहे. तत्पूर्वी राज्य शासनाकडून येथील लोकांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासह करवीर तालुका, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, गगनबावडा, आदी तालुक्यांतील निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ व परराज्यांतील ५९७ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये कर्नाटकातील २१७ जणांचे, तमिळनाडूमधील २१४ जण, राजस्थानमधील ८०, मध्यप्रदेशमधील ४२,उत्तर प्रदेशमधील २९, केरळमधील आठ, झारखंड तीन, पुडुचेरीमधील एक, पश्चिम बंगालमधील एक, आंध्रप्रदेश एक, बिहार एक, अशा एकूण ११ राज्यांतील ५९५ जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे; तर महाराष्ट्रातील २२२ जणांचेही येथील निवारागृहात अलगीकरण करण्यात आले आहे.

यातील बहुतांश जणांचा उद्या, मंगळवारी १४ दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निवारागृहांतील लोकांची माहिती मागविली आहे. त्यानुसार रविवारी जिल्हा प्रशासनाकडून निवारागृहांतील राज्य व परराज्यांतील लोकांची संख्या यांसह इतर माहिती राज्य शासनाला कळविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांतील लोकांना पाठवायचे की नाही, हा निर्णय राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. परंतु परराज्यांतील लोकांबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारकडूनच होणार आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकार पातळीवर उद्या, मंगळवारी काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर