शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-निवारागृहांतील लोकांंची मागविली राज्य शासनाने माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:38 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात राज्यासह परराज्यांतील ८१९ मजूर, कामगार अडकून पडले आहेत. त्यांना जिल्ह्यातील १५ निवारागृहांत ठेवण्यात आले आहे. त्यांतील अनेकजणांचा १४ दिवसांचा कालावधी उद्या, मंगळवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांना इथेच ठेवायचे की, आपल्या गावी पाठवायचे याबाबतचा निर्णय केंद्र व राज्य सरकार पातळीवर होणार आहे. तत्पूर्वी राज्य शासनाकडून येथील लोकांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यासह परराज्यांतील ८१९ जणांचा समावेश जिल्हा प्रशासनाकडून माहिती सादर

प्रवीण देसाईकोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात राज्यासह परराज्यांतील ८१९ मजूर, कामगार अडकून पडले आहेत. त्यांना जिल्ह्यातील १५ निवारागृहांत ठेवण्यात आले आहे. त्यांतील अनेकजणांचा १४ दिवसांचा कालावधी उद्या, मंगळवारी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांना इथेच ठेवायचे की, आपल्या गावी पाठवायचे याबाबतचा निर्णय केंद्र व राज्य सरकार पातळीवर होणार आहे. तत्पूर्वी राज्य शासनाकडून येथील लोकांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासह करवीर तालुका, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, गगनबावडा, आदी तालुक्यांतील निवारागृहांमध्ये राज्यातील २२२ व परराज्यांतील ५९७ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये कर्नाटकातील २१७ जणांचे, तमिळनाडूमधील २१४ जण, राजस्थानमधील ८०, मध्यप्रदेशमधील ४२,उत्तर प्रदेशमधील २९, केरळमधील आठ, झारखंड तीन, पुडुचेरीमधील एक, पश्चिम बंगालमधील एक, आंध्रप्रदेश एक, बिहार एक, अशा एकूण ११ राज्यांतील ५९५ जणांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे; तर महाराष्ट्रातील २२२ जणांचेही येथील निवारागृहात अलगीकरण करण्यात आले आहे.

यातील बहुतांश जणांचा उद्या, मंगळवारी १४ दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निवारागृहांतील लोकांची माहिती मागविली आहे. त्यानुसार रविवारी जिल्हा प्रशासनाकडून निवारागृहांतील राज्य व परराज्यांतील लोकांची संख्या यांसह इतर माहिती राज्य शासनाला कळविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांतील लोकांना पाठवायचे की नाही, हा निर्णय राज्य सरकारकडून अपेक्षित आहे. परंतु परराज्यांतील लोकांबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारकडूनच होणार आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकार पातळीवर उद्या, मंगळवारी काय निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर