शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कोरोना आर्थिक मदतीची वेबसाईटच बंद, मदत मिळाल्याची संख्या गुलदस्त्यात; अनेकांना पुन्हा अर्ज करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 12:49 IST

राज्यभरातून १४ हजार ९१५ मृतांच्या वारसांना ५० हजार रुपये वाटप झाले आहेत.

इंदुमती गणेशकोल्हापूर : कोरोनाने निधन झालेल्या किती व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत मिळाली ही संख्या गुलदस्त्यात आहे. गेल्या वर्षभरापासून शासनाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या डॅशबोर्डवर डिसेंबर २०२१ सालची आकडेवारी दिसत आहे. सॉफ्टवेअर कंपनीचा ठेका बदलल्याने गेली तीन महिने शासनाची वेबसाईटच बंद असल्याने यंत्रणा ठप्प झाली होती. आता बेवसाईट सुरू झाली असली तरी फक्त नोंदणी स्वीकारण्याचे काम सुरू आहे. राज्यभरात हीच स्थिती आहे. राज्यभरातून १४ हजार ९१५ मृतांच्या वारसांना ५० हजार रुपये वाटप झाले आहेत.सन २०२० व २०२१ या दोन वर्षांमध्ये कोरोनाने कोल्हापूर जिल्ह्यातील ७ हजार ५९१ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना शासनाकडून ५० हजारांची आर्थिक मदत दिली जाते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने वारसांकडून ऑनलाइन अर्ज भरून घ्यायचे, त्या अर्जांची छाननी करायची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पडताळणी झाली, त्यांची परवानगी आली की अर्ज अप्रूव्ह करून राज्य शासनाकडे पाठवायचे, राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ही मदत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते, अशी ही पद्धत आहे.मदत द्यायला सुरुवात झाली त्यावेळी रोज वेगाने वेबसाईटवर माहिती अपडेट होत होती. त्यानंतर मात्र डॅशबोर्डवरची आकडेवारीच बदललेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे रक्कम वर्ग झालेल्या लाभार्थ्यांची नेमकी आकडेवारी नाही. मात्र, ९० टक्क्यांहून अधिक वारसांच्या खात्यावर रक्कम वर्ग झाल्याचे समजले.डिसेंबर २०२१ म्हणजे गतवर्षीपर्यंत यंत्रणा व्यवस्थित कार्यरत होती. त्यावेळी कोल्हापूर शहर आणि ग्रामीण मिळून ७ हजार ५९१ जणांचे अर्ज मंजूर झाले होते आणि ८९३ जणांच्या खात्यावर रक्कम वर्ग झाली होती. वर्षभराने आजदेखील हीच आकडेवारी डॅशबोर्डवर दिसत आहे.

सॉफ्टवेअरचा घोळ...तीन महिने यंत्रणा ठप्पज्या कंपनीने सॉफ्टवेअर तयार केले, त्यांचा ठेका संपल्यानंतर ठेकेदार बदलण्यात आला. या बदलाबदलीमुळे, डेटा ट्रान्सफर करण्याच्या गोंधळामुळे ऑक्टोबरपासून वेबसाईट बंद असल्याने कामकाज ठप्प होते. ज्यांच्या खात्यावर अजून रक्कम मिळालेली नाही, त्यांना काही कळत नव्हते. नवीन अर्ज स्वीकारले जात नव्हते. महत्त्वाचे म्हणजे सॉफ्टवेअरच्या या घोळामुळे अनेकांचे ऑनलाइन अर्ज देखील गहाळ झाले (सॉफ्टवेअरमधून उडाले) आहेत. आपल्या अर्जाचे पुढे काय झाले, याची चौकशी करायला वारस आल्यावर कळाले की त्यांचा अर्जच नाही. शेवटी अशा वारसांना पुन्हा अर्ज करण्यासाठी सांगण्यात आले.

शून्याची करामत..चुकीचा खाते क्रमांक हे रक्कम न मिळण्याचे महत्त्वाचे कारण आहे. खाते क्रमांकाच्या आधी असलेला एक शून्य किंवा आकडा चुकलेला दिसला की बँक रक्कम खात्यावर वर्ग करीत नाही. राज्य शासनाकडून आलेले खाते क्रमांक आणि बँकेकडील खाते क्रमांक वेगळे असेल तर बँक शासनाला पैसे परत पाठविते. त्यामुळे आता दर आठवड्याला अशा खात्यांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे पाठविली जाते, लाभार्थ्यांकडून पुन्हा कागदपत्रे घेऊन त्याची पडताळणी करून सुधारीत खाते क्रमांक पाठविले जात आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या