शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या धास्तीपुढे कोरोनाही फिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून निर्बंध कडक करण्यासह लाॅकडाऊनचे संकेत राज्य सरकारकडून दिले जात असताना कोल्हापुरात मात्र ...

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून निर्बंध कडक करण्यासह लाॅकडाऊनचे संकेत राज्य सरकारकडून दिले जात असताना कोल्हापुरात मात्र खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीमुळे धान्यापासून ते तिखटाच्या मिरच्यांपर्यंतची दुकाने माणसांनी ओसंडून वाहत होती. कोरोना निर्बंधांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचेच सार्वत्रिक चित्र होते. खरेदीसाठी ग्राहकांची तारांबळ तर आणलेल्या मालाच्या उठावाची चिंता विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर होती.

गेल्यावर्षी मार्चमध्ये अचानक लागलेल्या लॉकडाऊनचा कटू अनुभव गाठीशी असल्याने आता लॉकडाऊनचे संकेत मिळाल्यावर लगेचच लोकांनी बाजारात धाव घेतली आहे. आज (सोमवारी) मुख्यमंत्री घोषणा करणार आहेत, तत्पूर्वीच कोल्हापूरकर पूर्वतयारीला लागल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसत होते. नाशवंत फळे व भाजीपाला सोडला तर ठेवणीसाठीचे धान्य, कडधान्य, मसाले, तेल, किराणा सामान जास्तीचे खरेदी होत असल्याचे दिसत होते. लॉकडाऊनचे स्वरुप नेमके काय आहे, याची कल्पना नसल्याने पुढे अडचण नको म्हणून ही बेगमी केली जात आहे.

सध्या चटणीचा हंगाम आहे. तिखटासाठीच्या मिरच्यांनी बाजार लालभडक झाला आहे. मसाल्यांची विक्री जोरात सुरु आहे. अशातच लॉकडाऊन झाले तर काय म्हणून लोकांनी मिरची दुकानात एकच गर्दी केली होती.

पावसाळ्यात वापरण्यासाठी लागणारे व वर्षभर टिकणारे धान्य, कडधान्य खरेदीचा हा हंगाम आहे. या महिन्यातच नवीन ज्वारी, गहू व डाळी बाजारात आलेल्या असतात. त्याच्या खरेदीसाठी नियमितपणे गर्दी असते, पण रविवारी लॉकडाऊनच्या भीतीने ही गर्दी आणखी वाढली होती.

चौकट ०१

कोरोनापेक्षा रोजगाराची चिंता

लॉकडाऊनची धास्ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. कोरोनाच्या भीतीपेक्षा हातचा रोजगार जाईल, या चिंतेचे मळभ जास्त दाटलेले हाेते. बाजारात फेरफटका मारताना कोरोना परवडला पण लॉकडाऊन नको, अशाच प्रतिक्रिया लोकांमधून उमटत होत्या.

चौकट ०२

नागरिकांची बेफिकिरी

बाजारातील गर्दी पाहून खरंच कोरोना आहे का, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मास्क आहे, पण तो बऱ्याचवेळा हनुवटीवरच लटकत आहे. एकाही विक्रेत्याच्या हातात ग्लोव्हज् नाही, साेशल डिस्टन्सच्या नावाने तर शंखच आहे. थुंकण्याचा नियमही कोणी पाळताना दिसत नाही. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी आहे.

चाैकट ०३

रविवारची सुट्टी त्यात लॉकडाऊनची धास्ती यामुळे शॉपिंग मॉल्स, बेकरी दुकानांमध्ये लोकांनी धाव घेतली. तेथे नियमांचे पालन करुन आत साेडले जात होते, पण आत गेल्यावर मात्र साेशल डिस्टन्सचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसत होते.

प्रतिक्रिया

तिखटासाठी मिरची विक्री जोरात सुरु आहे. मागणी जास्त असल्याने मालही भरपूर आणला आहे. आता लाॅकडाऊन झाले तर माल कोल्ड स्टोअरेजला ठेवावा लागणार आहे, त्याचा प्रतिकिलोचा दर साडेतीन रुपये असा आहे. साठवणुकीचा खर्च वाढल्याने दरातही वाढ होणार आहे. शिवाय लाखोंची केेलेली गुंतवणूकही अडकून पडणार आहे.

- ओमकार पेटकर, मिरची विक्रेते, लक्ष्मीपुरी

प्रतिक्रिया

मिरचीसाठी लागणाऱ्या किरकोळ मसाले विक्रीचा माझा व्यवसाय आहे, गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे विक्री करण्यावर मर्यादा आल्या, नुकसानही सोसावे लागले. आता पुन्हा लॉकडाऊन झाले तर ही केलेली गुंतवणूक कशी भरुन काढू. सरकारने निर्बंध लावावेत, पण लॉकडाऊन करुन आमच्या पोटावर पाय आणू नये.

- अमर साळोखे, मसाले विक्रेता, लक्ष्मीपुरी