शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कोरे-पाटील दिलजमाईची हवा : पन्हाळा-शाहूवाडीचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:57 IST

पन्हाळा-बावडा मतदारसंघाच्या गेल्या ४0 वर्षांच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले दादा-कोरे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार विनय कोरे यांनी दिवंगत नेते माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा अमर यांच्याशी राजकीय मैत्रीचा हात पुढे केला आहे.

ठळक मुद्देपारंपरिक विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली

 - विश्वास पाटील ।

कोल्हापूर : पन्हाळा-बावडा मतदारसंघाच्या गेल्या ४0 वर्षांच्या राजकारणातील एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेले दादा-कोरे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार विनय कोरे यांनी दिवंगत नेते माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा अमर यांच्याशी राजकीय मैत्रीचा हात पुढे केला आहे. अमर पाटील हे या दिलजमाईसाठी सकारात्मक असले तरी त्यांच्या गटातून त्यासंबंधीचा निर्णय होत नसल्याने घडामोडी थंडावल्या आहेत. पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवायचा असेल, तर पन्हाळ्यात मतविभागणी होता कामा नये, असे विनय कोरे यांना वाटते. तोच या घडामोडींचा गाभा आहे.

कोडोली व सातवे जिल्हा परिषद मतदारसंघात जुन्या दादा गटाची आजही चांगली ताकद आहे; त्यामुळे तिथे कोरे गट अमर पाटील यांच्या पाठीशी राहील. जिल्हा बँकेच्या राजकारणातही अमर यांना कोरे गट बळ देईल. त्यांनी विधानसभेला कोरे यांना मदत करावी, असा हा मूळ प्रस्ताव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अमर पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवून २८ हजार मते मिळवली आणि याच निवडणुकीत विनय कोरे हे शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांच्याकडून अवघ्या ३८८ मतांनी पराभूत झाले. आमदार पाटील यांना शाहूवाडीत त्या तालुक्याचे आमदार म्हणून सहानुभूती मिळते आणि पन्हाळ्यातील मतविभागणीचा फायदाही मिळतो; त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील मतविभागणी टाळली तर विजय खेचून आणता येईल, असे कोरे यांचे गणित आहे.

अमर पाटील हे जिल्हा परिषदेच्या सातवे मतदारसंघातून काँग्रेसकडून रिंगणात होते; परंतु तिथे त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षाच्या शिवाजी मोरे यांनी ११२० मतांनी पराभव केला. तिथेही अमर यांना १२ ५९३ मते मिळाली आहेत. आता त्यांच्याकडे सर्वोदय सोसायटी, कोडोली अर्बन बँक, कोडोली पतसंस्था या प्रमुख संस्था असल्या तरी जिल्हा पातळीवरील सत्तेचे पद नाही. विधानसभेला विजय मिळवण्याइतकी या गटाची आता ताकदही राहिलेली नाही; त्यामुळे दुसऱ्याला पराभूत करण्यासाठीच मी किती वर्षे निवडणूक लढवायची, अशी भावना अमर पाटील यांची झाली आहे.

यशवंतदादा यांचे वारसदार म्हणून अमर पाटील व डॉ. जयंत पाटील या दोघांना दादा गटात महत्त्व आहे; परंतु या चुलत्या-पुतण्यांमध्ये कौटुंबिक व राजकीयही फारसे सख्य नाही. किंबहुना त्यांची राजकीय भूमिका परस्परविरोधीच राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे अमर पाटील यांनी कोरे गटाबरोबर जुळवून घेतले, तरी डॉ. जयंत पाटील हे त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता नाही. त्यांचे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील यांचे सख्य आहे आणि भारत पाटील यांची पुन्हा कोरे यांच्यासोबत जाण्याची इच्छा नाही.

या मतदारसंघात आता दोन्ही काँग्रेसकडे लढण्यासाठी उमेदवारच नाही; त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर असलेल्या संबंधाचा वापर करून डॉ. जयंत पाटील हे रिंगणात उतरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोरे गटांकडून अमर पाटील यांच्याशी जशी चर्चा सुरू आहे, तशाच गाठीभेटी डॉ. जयंत पाटील यांच्याशीही सुरू आहेत. गेल्याच आठवड्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव यांनी डॉ.पाटील यांची त्यांच्या कोडोलीतील शिक्षण संस्थेत येऊन भेट घेतली आहे.

अमर पाटील यांचा परवाच्या २१ तारखेला वाढदिवस झाला. निवडणूक तोंडावर असल्याने यंदाचा वाढदिवस दणक्यात साजरा करून त्यांनी गटाची चाचपणी केली. वाढदिवसाला जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहून त्यांनाही नवा हुरूप आला आहे. या वाढदिवसाला आमदार सत्यजित पाटील यांनी उपस्थित राहून अमर यांना केकही भरवला. त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या.दादा गटाची निर्णायक ताकददादा गटांवर प्रेम करणाºया कार्यकर्त्यांचे काही झाले तरी किमान २५ हजारांचे पॉकेट नुसत्या पन्हाळा तालुक्यात आहे. अटीतटीच्या लढतीत राजकीय ताकद निर्णायक ठरणारी असल्यानेच ‘दादा’ गटाला पुन्हा महत्त्व आले आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारणkolhapurकोल्हापूर