शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

५०० विद्यार्थ्यांनी बनविला स्वयंपाक

By admin | Updated: February 16, 2015 00:14 IST

उत्तूर विद्यालयाचा उपक्रम : पारंपरिक नैसर्गिक साधनांचा वापर

उत्तूर : गॅस, कुकर व इलेक्ट्रिक शेगड्या यावर आधारित स्वयंपाक सर्वत्र बनविला जातो; पण पारंपरिक नैसर्गिक साधनांपासून बनविलेल्या जेवणाला गोडीही वेगळीच असते. अलीकडे ‘चुलीवरचे जेवण’ विद्यार्थ्यांबरोबर पालकही विसरत चालले आहेत. याकडेही लक्ष वेधण्यासाठी रविवारी उत्तूर विद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांनी स्वत: जेवण बनविण्याचे धडे घेतले.विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून आहारातील मेनू बनविण्याचे सांगण्यात आले. ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या निसर्गरम्य मळ्यात विद्यार्थ्यांनी लाकडाच्या चुलीवर जेवण बनविण्यास सुरुवात केली. अलीकडे घरात धूर नसल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चुलीत फुंकर मारताना डोळे धुराणे भरून यायचे. जवळपास शंभर प्रकारचे खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने तयार केले.स्वयंपाक घरी करताना आपल्या पालकांना कशी कसरत करावी लागते, याचा नमुना विद्यार्थ्यांना जेवण बनविताना आला. काहींना जेवण बनविताना अडचणींचा सामना करावा लागला. दगड, विटांचा चूल बनविण्यासाठी, तर काट्यांचा इंधनासाठी वापर करण्यात आला. साहित्यांची जमवाजमव करताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली.सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांनी स्वयंपाक बनविण्यास सुरुवात केली. दोन तासांत नैसर्गिक साधनांचा वापर करून उत्तम असा स्वयंपाक बनविला. या विद्यार्थ्यांना प्राचार्य राजेंद्र ठाकूर, पर्यवेक्षक ए. व्ही. यमगेकर, पी. के. म्हातुगडे, इंद्रजित बनसोडे, डी. एम. कोळी, आदींसह शिक्षकांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)