शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

५०० विद्यार्थ्यांनी बनविला स्वयंपाक

By admin | Updated: February 16, 2015 00:14 IST

उत्तूर विद्यालयाचा उपक्रम : पारंपरिक नैसर्गिक साधनांचा वापर

उत्तूर : गॅस, कुकर व इलेक्ट्रिक शेगड्या यावर आधारित स्वयंपाक सर्वत्र बनविला जातो; पण पारंपरिक नैसर्गिक साधनांपासून बनविलेल्या जेवणाला गोडीही वेगळीच असते. अलीकडे ‘चुलीवरचे जेवण’ विद्यार्थ्यांबरोबर पालकही विसरत चालले आहेत. याकडेही लक्ष वेधण्यासाठी रविवारी उत्तूर विद्यालयाच्या ५०० विद्यार्थ्यांनी स्वत: जेवण बनविण्याचे धडे घेतले.विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून आहारातील मेनू बनविण्याचे सांगण्यात आले. ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या निसर्गरम्य मळ्यात विद्यार्थ्यांनी लाकडाच्या चुलीवर जेवण बनविण्यास सुरुवात केली. अलीकडे घरात धूर नसल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चुलीत फुंकर मारताना डोळे धुराणे भरून यायचे. जवळपास शंभर प्रकारचे खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने तयार केले.स्वयंपाक घरी करताना आपल्या पालकांना कशी कसरत करावी लागते, याचा नमुना विद्यार्थ्यांना जेवण बनविताना आला. काहींना जेवण बनविताना अडचणींचा सामना करावा लागला. दगड, विटांचा चूल बनविण्यासाठी, तर काट्यांचा इंधनासाठी वापर करण्यात आला. साहित्यांची जमवाजमव करताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली.सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांनी स्वयंपाक बनविण्यास सुरुवात केली. दोन तासांत नैसर्गिक साधनांचा वापर करून उत्तम असा स्वयंपाक बनविला. या विद्यार्थ्यांना प्राचार्य राजेंद्र ठाकूर, पर्यवेक्षक ए. व्ही. यमगेकर, पी. के. म्हातुगडे, इंद्रजित बनसोडे, डी. एम. कोळी, आदींसह शिक्षकांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)