शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

Kolhapur: बालिंगा पुलावरुन वाद, मजबुतीकरण करूनही पुल धोकादायक कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 15:25 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१९ मध्ये ४५ लाख रूपये खर्च झाले कशावर?

प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा तेथील १८८५ मध्ये बांधलेला रिव्हज पूल धोकादायक असल्याचे कारण सांगून मंगळवारी दि.२६ पासून बंद केला. मात्र, दोन-तीन वर्षापूर्वी या पुलाचे मजबुतीकरण केले असून, तो आता धोकादायक झाला कसा असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.पुलाच्या सर्व पीलरचे बेंगलोरच्या कंपनीकडून २०१९ मध्ये वॉटर इन्सपेक्शन करण्यात आले. यात मध्यभागी असणाऱ्या नदीपात्रातील पिलरच्या पाया भोवतीचे दगड निखळल्याचे लक्षात आल्यानंतर पाया मजबूत करण्यासाठी कामाची निविदा काढली होती. चिपळूणच्या प्रभू इंजिनिअरिंग कंपनीने या कामाचा ठेका घेतला होता. त्यांनी मुंबई येथील वसंत धडके या उपठेकेदाराला हे काम दिले होते. ४६ लाखाचे हे काम होते. या कामासाठी पिलरच्या भोवती मुरुम, दगड,मातीचा २५ ते २७ फूट पूलाच्या पुर्वेकडील पिलर भोवती भराव टाकण्यात आले.पुलाचे काम करताना अंडर वॉटर सिस्टीम या अंत्यत उच्च प्रतीचे तंत्रज्ञानाचा वापर करून मायक्रो काँक्रीटीकरण करण्यात आले.या द्वारे पीलरना काँक्रीट जँकेट होणार असल्याने पुराच्या प्रवाहाचा धोका कमी होणार असून पुलाचे आयुष्य वाढणार आहे असे सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता रविंद्र येडगे यांनी सांगितले होते. 

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल मजबूत कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या सात ब्रिटिशकालीन फुलांपैकी बालिंगा येथील रिव्हर्स पूल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मजबूत असल्याचे तात्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते यानंतरही या फुलाची मजबूत करण्याचे काम झाले होते असे असताना पूल धोकादायक कसा असा प्रश्न जनतेला पडला आहे.दोन वर्षांपूर्वी पुलाच्या मजबुतीकरणाचे काम करूनही पूल धोकादायक कसा?

राष्ट्रीय महामार्ग अनभिज्ञ१८८५ ला हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे पिलरचे दगड निखळले असण्याची तसेच दोन दगडांमध्ये फटी निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे. पुराच्या वेगवान पाण्याचा प्रवाहाचा परिणाम पिलरवर होऊन पुलाला धोका निर्माण होऊ शकतो, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण, २०१९-२० मध्ये या पुलाच्या पिलरच्या दोन दगडांमधील फटी बुजवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मायक्रो काँक्रिटीकरण केले आहे. पुलाच्या पायाशी काँक्रीट जॅकेट केले आहे. ही माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतलेली नाही का? पुलाला धोका आहे, अशी भीती निर्माण करून राष्ट्रीय महामार्ग बंद करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बालिंगा पुलाची माहितीनिर्मिती - सन १८८५एकूण गाळे - ५लांबी - १०२.५ मीटररुंदी - १० मीटरबांधकाम वर्ष - १८८५रुंदीकरण - २००५

तालुका -करवीर,राधानगरी, पन्हाळा,शाहूवाडी,तळकोकणात प्रवासी व अवजड माल वाहतूकवाहतूक (दिवसभरात)दुचाकी -८००० ते १०,०००अवजड-१०००कार -४०००प्रवासी वहाने २ ते ४ हजार 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर