शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेतीचे नुकसान करणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करा, पन्हाळ्याच्या शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:13 IST

उपवनसंरक्षक चेन फेन्सिंगचा प्रस्ताव पाठविणार

कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ, तुरुकवाडी, लक्ष्मी कुरणासह परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या सुमारे ३५०० एकर शेतीच्या गव्यांमुळे झालेल्या नुकसानीला पायबंद घालण्याची मागणी उपवनसंरक्षक जी. गुरु प्रसाद यांच्याकडे केली. त्यावर यासंदर्भात या शेतकऱ्यांसाठी चेन फेन्सिंगचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ, तुरुकवाडी आणि लक्ष्मी कुरणासह परिसरातील ३५०० एकर शेतीमध्ये ६०० कुटुंबातील शेतकरी पूर्णपणे पावसावरच अवलंबून कायमस्वरूपी शेती करतात. पाच वर्षांपासून त्यांच्या शेतीमध्ये शिरून गव्यांचे कळप शेतीपिकाचे नुकसान करत आहेत. एकावेळी सुमारे ४० ते ५० गव्यांचा कळप पिकात शिरतो. गव्यांच्या भीतीने शेतकरी, विशेषत: महिला शेतकऱ्यांनी घाबरून शेताकडे जाणे बंद केले आहे.गव्यांच्या नुकसानीसंदर्भात वनविभागाने वेळोवेळी पंचनामे केले आहेत. परंतु नुकसानीच्या तुलनेत अतिशय अल्प स्वरूपात भरपाई मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. येथील वनविभागाच्या वनशेतीभोवती सौरकुंपण आहे, तथापि शेतकऱ्यांच्या शेतीभोवती सौरकुंपण नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी या शेतीभोवती सौरकुंपण करण्याची मागणी केली आहे.चेन फेन्सिंगचा प्रस्तावजी. गुरुप्रसाद यांनी प्रति ६०० मीटरप्रमाणे सुमारे तीन किलोमीटर परिसरात चर मारण्याचा अथवा चेन फेन्सिंग करण्याचा प्रस्ताव करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. यासाठी अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च येणार असल्यामुळे त्याची तरतूद करण्यासाठी डीपीडीसी आणि राज्य सरकारकडे निधीचा प्रस्तावही डिसेंबरअखेर पाठवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन जी. गुरुप्रसाद यांनी या शेतकऱ्यांना दिले. शशिकांत पोवार, कुमार चिले, अमर जाधव, आनंदा उदाळे, प्रमोद उदाळे, तानाजी काशीद, जयसिंग उदाळे, महेश भाडेकर यांच्यासह १०० शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीforest departmentवनविभाग