शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

Kolhapur: शेतीचे नुकसान करणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करा, पन्हाळ्याच्या शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:13 IST

उपवनसंरक्षक चेन फेन्सिंगचा प्रस्ताव पाठविणार

कोल्हापूर : पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ, तुरुकवाडी, लक्ष्मी कुरणासह परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या सुमारे ३५०० एकर शेतीच्या गव्यांमुळे झालेल्या नुकसानीला पायबंद घालण्याची मागणी उपवनसंरक्षक जी. गुरु प्रसाद यांच्याकडे केली. त्यावर यासंदर्भात या शेतकऱ्यांसाठी चेन फेन्सिंगचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ, तुरुकवाडी आणि लक्ष्मी कुरणासह परिसरातील ३५०० एकर शेतीमध्ये ६०० कुटुंबातील शेतकरी पूर्णपणे पावसावरच अवलंबून कायमस्वरूपी शेती करतात. पाच वर्षांपासून त्यांच्या शेतीमध्ये शिरून गव्यांचे कळप शेतीपिकाचे नुकसान करत आहेत. एकावेळी सुमारे ४० ते ५० गव्यांचा कळप पिकात शिरतो. गव्यांच्या भीतीने शेतकरी, विशेषत: महिला शेतकऱ्यांनी घाबरून शेताकडे जाणे बंद केले आहे.गव्यांच्या नुकसानीसंदर्भात वनविभागाने वेळोवेळी पंचनामे केले आहेत. परंतु नुकसानीच्या तुलनेत अतिशय अल्प स्वरूपात भरपाई मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. येथील वनविभागाच्या वनशेतीभोवती सौरकुंपण आहे, तथापि शेतकऱ्यांच्या शेतीभोवती सौरकुंपण नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी या शेतीभोवती सौरकुंपण करण्याची मागणी केली आहे.चेन फेन्सिंगचा प्रस्तावजी. गुरुप्रसाद यांनी प्रति ६०० मीटरप्रमाणे सुमारे तीन किलोमीटर परिसरात चर मारण्याचा अथवा चेन फेन्सिंग करण्याचा प्रस्ताव करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. यासाठी अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च येणार असल्यामुळे त्याची तरतूद करण्यासाठी डीपीडीसी आणि राज्य सरकारकडे निधीचा प्रस्तावही डिसेंबरअखेर पाठवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन जी. गुरुप्रसाद यांनी या शेतकऱ्यांना दिले. शशिकांत पोवार, कुमार चिले, अमर जाधव, आनंदा उदाळे, प्रमोद उदाळे, तानाजी काशीद, जयसिंग उदाळे, महेश भाडेकर यांच्यासह १०० शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीforest departmentवनविभाग