शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासात सहकाराचा मोलाचा वाटा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 19:14 IST

महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक परिवर्तनात सहकाराचा मोठा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील आर्थिक परिवर्तन हे सहकारामुळेच आहे.

कोल्हापूर‍ : महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक परिवर्तनात सहकाराचा मोठा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनातील आर्थिक परिवर्तन हे सहकारामुळेच आहे. हा सन्मार्ग छत्रपती राजर्षि शाहू महाराजांनी दाखवून दिलेला आहे. महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कार्य करीत आहे. त्यांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात सर्वांगिण परिवर्तन करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

8 जुलै 1917 रोजी स्थापन झालेल्या दी कागल को- ऑपरेटिव्ह बँक, लि. कागल या बँकेच्या शतकमहोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक, लि. कागल असे नामकरण कागल येथे आयोजित नामकरण सोहळ्यात करण्यात आले. 

यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश हळवणकर, आमदार अमल महाडिक, प्रविणसिंह घाटगे, सुहासिनीदेवी घाटगे, नवोदिता घाटगे, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदूराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्जमाफीचे काम येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होईल - मुख्यमंत्रीराज्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी आधारच्या माध्यमातून करुन पारदर्शी कर्जमाफी करण्यावर भर दिला. महाराष्ट्रातील 15 लाख 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 6 हजार 500 कोटी रुपये आजच भरले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे 10 लाख शेतकऱ्यांची यादी पुन्हा 10 लाख शेतकऱ्यांची यादी अशा पद्धतीनं कर्जमाफीचे काम येत्या 10 ते 15 दिवसात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पटांगणावर श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने आयोजित केलेल्या दिलखुलास मुक्त संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वारणा उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे हेही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्त संवाद कार्यक्रमाद्वारे शेतकरी,ऊस उत्पादक, दूध उत्पादक, लोक प्रतिनिधी,सहकारी संस्थाचे पदाधिकारी, महिला बचत गट, कामगार, शिक्षक तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर