शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

संविधान सन्मान यात्रा २२ आक्टोबरला कोल्हापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:59 AM

जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या पुढाकाराने २ आक्टोबर ते १0 डिसेंबर २0१८ या कालावधीमध्ये दांडी ते दिल्ली अशी राष्ट्रव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंविधान सन्मान यात्रा २२ आक्टोबरला कोल्हापुरात दांडी ते दिल्ली यात्रा जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या पुढाकाराने

कोल्हापूर : जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या पुढाकाराने २ आक्टोबर ते १0 डिसेंबर २0१८ या कालावधीमध्ये दांडी ते दिल्ली अशी राष्ट्रव्यापी संविधान सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. २२ आॅक्टोबर रोजी ही यात्रा कोल्हापुरात येणार असून, या यात्रेचे स्वागत करण्याचा निर्णय विविध पक्ष आणि संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिले आहेत, त्यांना बाधा पोहोचवण्याच्या अनेक घटना सध्या देशात घडत आहेत. या विरोधात जनजागृती करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा दुसरा टप्पा २0 आक्टोबर रोजी सुरू होणार असून, मुंबई, पुणे, सातारा, इस्लामपूरमार्गे २२ आक्टोबर रोजी सकाळी १0 वाजता ही यात्रा कोल्हापुरात येणार आहे.

यावेळी कोल्हापूरच्या पद्धतीने या यात्रेचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने संघटना आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या कोल्हापूर शाखेचे संघटक दशरथ पारेकर आणि प्राचार्य टी. एस. पाटील यांनी केले आहे.दशरथ पारेकर आणि ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी स्वागत समितीचे निमंत्रकपद स्वीकारावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या पूर्वतयारीच्या बैठकीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी बी. एल. बरगे, संभाजी जगदाळे, विजय लोंढे, प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण, डॉ. भारतभूषण माळी, अशोक चौगुले, कृष्णात स्वाती, अरुण पाटील, सतीश पाटील यांच्यासह अंधश्रद्धा निमूर्लन समिती, विवेक वाहिनी, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीkolhapurकोल्हापूर