शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

साखर जप्त करा अन् आमचे पैसे मिळवून द्या : ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:07 AM

कायद्यानुसार आम्ही मागतोय..., आम्हाला कोणीच वाली नाही..., साखर कारखान्यांनी बिले न दिल्याने मुलांच्या शिक्षणाची फी भरलेली नाही, बियाणे व खते खरेदी करायला पैसे नाहीत...त्यामुळे ‘आरआरसी’ कायद्यानुसार कारखान्यातील

ठळक मुद्देकार्यकर्ते आक्रमक; कारखान्यांवर योग्य कारवाई करू - जिल्हाधिकारी

कोल्हापूर : कायद्यानुसार आम्ही मागतोय..., आम्हाला कोणीच वाली नाही..., साखर कारखान्यांनी बिले न दिल्याने मुलांच्या शिक्षणाची फी भरलेली नाही, बियाणे व खते खरेदी करायला पैसे नाहीत...त्यामुळे ‘आरआरसी’ कायद्यानुसार कारखान्यातील साखर जप्त करून ‘एफआरपी’चे पैसे द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

‘एफआरपी’ कायद्यानुसार १४ दिवसांत पैसे शेतकºयांना देणे बंधनकारक आहे; परंतु त्याचे उल्लंंघन केल्याबद्दल साखर आयुक्तांनी ‘आरआरसी’ कायद्यानुसार कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅससह इतर उत्पादनांची विक्री करून या रकमेतून शेतकºयांची देय रक्कम देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली, याची विचारणा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

यावेळी प्रा. जालंदर पाटील म्हणाले, साखर आयुक्तांनी ‘एफआरपी’ कायद्याचा भंग करणाºया कारखान्यांवर ‘आरआरसी’प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी साखर जप्तीची कारवाई करून शेतकºयांना पैसे मिळवून द्यावेत. सागर शंभूशेटे म्हणाले, साखर कारखानदारांवर कारवाई केव्हा करणार? याचा टाईम बॉँड सांगा. शक्य असल्यास एका दिवसात ही कारवाई करून आम्हाला पैसे द्या.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी साखर कारखानदारांना नोटीस लागू होण्यापासून कारवाई होईपर्यंतचा कालावधी कमी होऊ शकतो, याचे कायदेशीर मागर्दर्शन घेऊन योग्य ती कारवाई के ली जाईल, असे सांगितले. यावेळी विठ्ठल मोरे, शैलेश चौगुले, वैभव कांबळे, अजित पोवार, आदी उपस्थित होते.आरोपी आत जनता बाहेरकार्यकर्ते भेटायला येणार हे कळवूनही जिल्हाधिकारी सुभेदार कार्यालयातून जायला निघाले, अशी समजूत झाल्याने बाहेर उपस्थित कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांना आत भेटायला बोलावल्यावर शेतकºयांनाच आपल्या भेटीसाठी अपॉर्इंटमेंटसारख्या औपचारिकता आणि साखर कारखानदारांना सरळ कार्यालयात प्रवेश, अशा शब्दांत सावकार मादनाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी विचारणा केली. शेतकºयांचे देणेकरी असलेले आरोपी आत आणि आम्ही बाहेर, अशा शब्दांत तीव्र प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जे कारखाने एफआरपी देणार नाहीत, त्यांच्यावर साखर जप्तीच्या नोटिसा बजावाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना भेटून केली; परंतु जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय कार्यकर्त्यांना टोलवाटोलवी करू लागल्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच अशी बैठक मारली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने