शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस स्वबळावर लढणार

By admin | Updated: July 26, 2015 23:55 IST

पतंगराव कदम : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणे काळाची गरज

कोल्हापूर : महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे माजी मंत्री व समन्वय समितीचे अध्यक्ष पतंगराव कदम यांनी रविवारी येथे जाहीर केले. इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस कमिटी कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी नेमलेल्या समन्वय समिती सदस्यांची बैठक रविवारी दुपारी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कदम बोलत होते.पतंगराव कदम म्हणाले, गेल्या महापालिका निवडणुकीसाठी समन्वय समितीचा अध्यक्ष मीच होतो. यावेळीही आपल्याकडे जबाबदारी आहे. त्यानुसार आपण या ठिकाणी आलो आहे. गतनिवडणुका आम्ही ताकदीने लढलो; परंतु आमचे काही निर्णय चुकले. सक्षम व निवडून येणाऱ्या उमेदवारांना डावलल्याने त्याचा फटका बसला, असे १२ उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. यावेळी अशी चूक होणार नाही. काँग्रेसमधील गटा-तटांचा विचार न करता, तसेच बारीक-सारीक कांगोरे बाजूला ठेवून सक्षम आणि निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट दिले जाईल. यासाठी सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन, एकत्र बसून निर्णय घेतले जातील. या संदर्भातील बैठक आता महापालिका आरक्षण व प्रभाग रचना झाल्यावरच होईल. पक्ष सध्याच्या घडीला स्वबळावरच लढणार आहे. निवडणुकीवेळी सोबत कोण येईल ते नंतर पाहू. आतापर्यंत तरी कोणीही आघाडी करण्यासंदर्भात विचारणा केलेली नाही.माजी मंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्या भूमिकेविषयी विचारल्यावर ते म्हणाले, पाटील व महाडिक यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर काँग्रेसकडूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते कोणती वेगळी भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. सतेज पाटील-महाडिक यांच्या वादामुळे निश्चितच पक्षाचे नुकसान झाले हे नाकारून चालणार नाही. हा वाद मिटविण्यासाठी आपला प्रयत्न यापूर्वीही होता आणि आताही राहील. आपापसांतील मतभेद व गट-तट सोडले तर काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात बळकट आहे.गोंदिया येथील भाजप-काँग्रेस युतीबाबत छेडले असता ते म्हणाले, या ठिकाणी काँग्रेसचा एकच आमदार असून, उर्वरित आमदार, खासदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे ही युती झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा हा जिल्हा असल्याने याबाबत चर्चा होत आहे; परंतु काँग्रेस पक्षाने स्थानिक आमदार गोपाळ अगरवाल यांना नोटीस काढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही सर्वच ठिकाणी व्हावी, ही आमची भूमिका आहे. ही आघाडी काळाची गरज असून, ‘आघाडी धर्म’ पाळावा लागेल. यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच होईल.यावेळी समिती सदस्य व माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार जयवंतराव आवळे, सत्यजित देशमुख, प्रकाशराव सातपुते, महापौर वैशाली डकरे, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, माजी आमदार बजरंग देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नारायण राणेंना ‘त्या’बाबत विचारूकॉँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे ‘मॅनेज’ असल्याची टीका कॉँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली होती. याविषयी विचारल्यावर राणेंना काय अनुभव आला? विरोधी पक्षनेते कसे ‘मॅनेज’ आहेत, हे त्यांना प्रत्यक्ष भेटून नक्की विचारू. प्रदेशाध्यक्षांनी ज्येष्ठ नेत्यांची १५ जणांची समिती नेमली आहे. त्याचे आम्ही दोघे सदस्य असून, या बैठकीत त्याबाबत चर्चाही होईल, असे पतंगराव कदम यांनी सांगितले.सतेज पाटील परदेशातजिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी प्रास्ताविकातच माजी मंत्री सतेज पाटील हे परदेशात असल्याने या ठिकाणी आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच आमदार महाडिक हे काही वेळातच येतील, असे सांगून त्यांच्या गैरहजेरीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.