शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

राजू शेट्टी यांची गट्टी काँग्रेससोबत शक्य? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घेतली राजू शेट्टींची सदिच्छा भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 14:52 IST

अवघ्या तीन वर्षात भाजपापासून दुरावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची गट्टी आगामी काळात काँग्रेससोबत जमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विश्वास पाटील/कोल्हापूर : अवघ्या तीन वर्षात भाजपापासून दुरावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची गट्टी आगामी काळात काँग्रेससोबत जमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शेट्टी यांच्या शिरोळमधील निवासस्थांनी भेट दिली. यावेळी शेट्टी यांनी त्यांचा सत्कार केला. ही भेट घडवून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला होता. आमदार पाटील यांच्या सतेज कृषी प्रदर्शनाचा समारोपही खासदार शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात शेट्टी यांची मदत पाटील यांच्या दृष्टीने मोलाची आहे. हा देखील एक पदर या भेटीमागे आहे.

चव्हाण शुक्रवारपासून कोल्हापूर दौ-यावर होते. शनिवारी सकाळी त्यांनी नृसिंहवाडीला जावून दत्त दर्शन घेतले. त्यानंतर ते शिरोळला शेट्टी यांच्या निवासस्थांनी गेले. या भेटीत कर्जमाफी व शेतक-यांच्या प्रश्र्नांवर एकत्रित काम करण्याची तयारी या दोन्ही नेत्यांनी दर्शवली. अन्य राजकीय चर्चा कांही झाली नसली तरी या दोन नेत्यांतील ही भेट अनेकांच्या भुवया उंचावून गेली. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार यावे म्हणून ज्यांनी सगळ्यात जास्त आक्रमक प्रचार केला त्यामध्ये शेट्टी पुढे होते. परंतु सत्ता आल्यावर भाजपाकडून त्यांना सवतीची वागणूक मिळालीच शिवाय राजकीय दृष्ट्या त्यांना संपविण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला.

स्वाभिमानीतून बाजूला झालेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना बळ देवून संघटनेचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न पध्दतशीरपणे झाले. या सगळ्याचा परिणाम म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीतून बाहेर पडली. महाआघाडीतून बाहेर पडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घरी बसवा असे खासदार शेट्टी जाहीरपणे बोलत आहेत. देशभरातील १८३ शेतकरी संघटनांची मोट बांधून त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधानांनाच आव्हान दिले. त्यासाठी किसान मुक्ती मोर्चा काढला. त्या मोर्चाला गेलेली स्वाभिमानी एक्सप्रेस गुजरातमधून परतीच्या प्रवासात जाऊ नये, असे प्रयत्न पद्धतशीरपणे झाल्याचा शेट्टी यांचा आरोप आहे. 

भाजपापासून बाजूला गेलेल्या शेट्टी यांनाही राजकारणात भाजपला आडवे करायचे असेल तर कोणतरी भक्कम जोडीदार हवा आहे. शेट्टी यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांची काँग्रेसबाबतची व काँग्रेसची त्यांच्याबाबतची भूमिका कायमच एकमेकांना पूरक राहिली आहे. ऊस आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांत मिलीभगत असल्याचा आरोप करत असे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत हे दोन्ही पक्ष पाच वर्षे सत्तेत होते. आताही शेट्टी यांनी ठरविले तर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता येवू शकते. शेतकरी नेता म्हणून शेट्टी यांच्याबाबत लोकांच्या मनांत आदराची भावना आहे. विधानसभेच्या पाच-पंचवीस मतदार संघात स्वाभिमानीची मते निकालावर परिणाम करणारी आहेत. त्याशिवाय भाजपला घाम फोडणारा शेट्टी यांच्यासारखा स्टार प्रचारक जर हाती लागत असेल तर ते काँग्रेसलाही हवे आहे. त्याची पेरणी करण्यासाठीच प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्वत:हून शेट्टी यांच्या निवासस्थांनी भेट दिली आहे. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नृसिंहवाडीहून मिरजेला निघाले होते. ते माझे संसदेतील सहकारी आहेत. त्यांच्यासोबतच्या भेटीत कर्जमाफी व शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. - राजू शेट्टी,  खासदार व संस्थापक स्वाभिमानी शेतकरी संघटना

नवी जुळवाजुळव..!काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळमधील निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी शेट्टी यांनी चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी भगवान काटे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,सावकर मादनाईक, आमदार सतेज पाटील व गणपतराव पाटील आदी नेते उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा