शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

सावकरांना काँग्रेस आघाडीचा ‘बाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:54 AM

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा उमेदवारच उभा न करता जनसुराज्य पक्षाचे ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा उमेदवारच उभा न करता जनसुराज्य पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांच्यामागे रसद पुरविण्याच्या हालचाली आघाडीत सुरू आहेत.कोरे महायुतीत असले तरी स्थानिक राजकारणात ते आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यासोबत राहिले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत कोरे यांनी ‘हातकणंगले’मध्ये भूमिका जाहीर न करता मदत केल्याने त्यांचा पैरा फेडण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस ५, राष्टÑवादी ३ व स्वाभिमानीने १ जागेवर लढावे, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र, ‘स्वाभिमानी’ने ‘हातकणंगले’वर दावा सांगितल्याने काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेसचे राज्याचे जागावाटप निश्चित झाले आहे. दोन्ही काँग्रेस प्रत्येकी १२५ जागा लढणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना देणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा जागांचे वाटपही बऱ्यापैकी पूर्ण झाले असून ‘कोल्हापूर उत्तर’, ‘कोल्हापूर दक्षिण’, ‘करवीर’, ‘हातकणंगले’, ‘इचलकरंजी’ या जागा काँग्रेसला मिळणार आहेत. ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी-भुदरगड’ या राष्टÑवादीला, तर ‘शिरोळ’ स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात येणार आहेत. ‘शाहूवाडी’तून काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सभापती अमरसिंह पाटील यांनी मागणी केली आहे; पण जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीसह स्थानिक राजकारणात माजी मंत्री विनय कोरे हे दोन्ही काँग्रेससोबत राहिले आहेत. अटीतटीच्या विधानपरिषद निवडणुकीत कोरे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मागे ताकद लावली होती, तर मावसभाऊ आमदार सत्यजित पाटील हे महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहिल्याचा राग आमदार पाटील यांच्या मनात आहे. स्थानिक राजकारणात त्यांची महाडिक विरोधातच भूमिका असल्याने आमदार मुश्रीफ व आमदार पाटील यांचे पाठबळ राहणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीत असतानाही कोरे यांनी ‘हातकणंगले’मध्ये आपली भूमिका जाहीर केली नव्हती; पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, हे जगजाहीर आहे. त्यामुळेच लोकसभेचा पैरा फेडण्यासाठी राजू शेट्टी दोन्ही काँग्रेसशी सहमती दर्शवतील, अशी चर्चा आहे.‘स्वाभिमानी’ने हातकणंगलेवर दावा सांगितला आहे; पण येथून काँग्रेसतर्फे राजू जयवंतराव आवळे हे इच्छुक आहेत. त्यांनी लढण्याची पूर्ण तयारी केल्याने आघाडीसमोर पेच निर्माण झाला आहे. राजू शेट्टी हे मराठवाड्याच्या दौºयावर आहेत, ते शुक्रवारी (दि. २०) कोल्हापुरात येत आहेत. त्यानंतरच ‘हातकणंगले’चा पेच सुटणार आहे.