शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

अटी घालून लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार का, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:22 IST

..तर पालकमंत्री द्या म्हणून उपोषणाला बसावे लागेल

कोल्हापूर : लाडकी बहीण योजना सुरु झाली त्यावेळी अर्थ खात्याने त्या फाईलवर अटी आणि शर्ती घाला असे लिहिले होते का ? लिहिले होते तर त्यावेळी त्या का घातल्या नाहीत? या अटी व शर्ती आताच का घालता, या लाभार्थी बहिणींना भाऊ वाऱ्यावर सोडणार का ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सरकारला केला.आमदार पाटील म्हणाले, शासनाच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणींचे अर्ज भरले गेले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अटी व शर्ती आताच का घालता? या लाभार्थी बहिणींना भाऊ वाऱ्यावर सोडणार आहेत का, असा सवाल त्यांनी केला.बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणे गरजेचे आहे. सत्ता कुणाची आहे यापेक्षा सिस्टिम काय करते, हे महत्त्वाचे आहे. मूळ आरोपी सापडल्याशिवाय या प्रकरणाचा उलगडा होणार नाही. वेगळ्या दिशेने हे प्रकरण घेऊन जात असल्याचा संशय आहे. प्रीपेड मीटरचे २७ हजार कोटींचे टेंडर चार-पाच कंपन्यांना दिले आहे. विधानसभेच्या निवडणुकीपुरते हे थांबवले होते. आता परत हे मीटर बसवणे सुरु झाले. लोकांचा याला विराेध असून, आम्हीही याला विरोध करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले...तर पालकमंत्री द्या म्हणून उपोषणाला बसावे लागेल१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन कार्यक्रमांसाठी पालकमंत्री नसतात तर त्या जिल्ह्याचे आर्थिक नियोजन करण्याची भूमिका पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे खातेवाटप, पालकमंत्री नियुक्तीचा वाद लवकरच मिटावा अन्यथा आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना उपोषणाला बसावे लागेल, अशी कोपरखळी आमदार सतेज पाटील यांनी लगावली.आता रखडलेले प्रश्न मार्गी लावाकोल्हापूरच्या जनतेने महायुतीला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे महायुतीच्या आमदारांनी, मंत्र्यांनी कोल्हापूरचे आयटी पार्क, शाहू मिलचा विस्तार, कोल्हापुरातील रस्त्यांचे नियोजन, रखडलेले प्रकल्प, हातकणंगलेतील लॉजिस्टिक पार्क, गडकिल्ल्यांचे संवर्धन ही कामे पाच वर्षांत पूर्ण करावीत, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

राजू शेट्टी यांचे नियोजित आंदोलन रास्तचकेंद्र शासनाकडे साखरेची एमएसपी वाढवावी म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहेत. एमएसपी वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांना चार पैसे जास्त देणे कारखान्यांना परवडणार नाही. प्लेज कर्ज जे मिळते ते शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. सरकारला साखरेचे भाव वाढू द्यायचे नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांना भाव मिळवून द्यायचे नाहीत. नेमके सरकारचे धोरण काय आहे हेच कळत नाही. त्यामुळे राजू शेट्टी याबाबत आंदोलन करणार असतील तर ते रास्त असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाguardian ministerपालक मंत्री