शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अटी घालून लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार का, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:22 IST

..तर पालकमंत्री द्या म्हणून उपोषणाला बसावे लागेल

कोल्हापूर : लाडकी बहीण योजना सुरु झाली त्यावेळी अर्थ खात्याने त्या फाईलवर अटी आणि शर्ती घाला असे लिहिले होते का ? लिहिले होते तर त्यावेळी त्या का घातल्या नाहीत? या अटी व शर्ती आताच का घालता, या लाभार्थी बहिणींना भाऊ वाऱ्यावर सोडणार का ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सरकारला केला.आमदार पाटील म्हणाले, शासनाच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणींचे अर्ज भरले गेले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी अटी व शर्ती आताच का घालता? या लाभार्थी बहिणींना भाऊ वाऱ्यावर सोडणार आहेत का, असा सवाल त्यांनी केला.बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी कार्यक्षमता दाखवणे गरजेचे आहे. सत्ता कुणाची आहे यापेक्षा सिस्टिम काय करते, हे महत्त्वाचे आहे. मूळ आरोपी सापडल्याशिवाय या प्रकरणाचा उलगडा होणार नाही. वेगळ्या दिशेने हे प्रकरण घेऊन जात असल्याचा संशय आहे. प्रीपेड मीटरचे २७ हजार कोटींचे टेंडर चार-पाच कंपन्यांना दिले आहे. विधानसभेच्या निवडणुकीपुरते हे थांबवले होते. आता परत हे मीटर बसवणे सुरु झाले. लोकांचा याला विराेध असून, आम्हीही याला विरोध करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले...तर पालकमंत्री द्या म्हणून उपोषणाला बसावे लागेल१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन कार्यक्रमांसाठी पालकमंत्री नसतात तर त्या जिल्ह्याचे आर्थिक नियोजन करण्याची भूमिका पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे खातेवाटप, पालकमंत्री नियुक्तीचा वाद लवकरच मिटावा अन्यथा आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना उपोषणाला बसावे लागेल, अशी कोपरखळी आमदार सतेज पाटील यांनी लगावली.आता रखडलेले प्रश्न मार्गी लावाकोल्हापूरच्या जनतेने महायुतीला भरभरून यश दिले आहे. त्यामुळे महायुतीच्या आमदारांनी, मंत्र्यांनी कोल्हापूरचे आयटी पार्क, शाहू मिलचा विस्तार, कोल्हापुरातील रस्त्यांचे नियोजन, रखडलेले प्रकल्प, हातकणंगलेतील लॉजिस्टिक पार्क, गडकिल्ल्यांचे संवर्धन ही कामे पाच वर्षांत पूर्ण करावीत, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

राजू शेट्टी यांचे नियोजित आंदोलन रास्तचकेंद्र शासनाकडे साखरेची एमएसपी वाढवावी म्हणून आमचे प्रयत्न सुरु आहेत. एमएसपी वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांना चार पैसे जास्त देणे कारखान्यांना परवडणार नाही. प्लेज कर्ज जे मिळते ते शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. सरकारला साखरेचे भाव वाढू द्यायचे नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांना भाव मिळवून द्यायचे नाहीत. नेमके सरकारचे धोरण काय आहे हेच कळत नाही. त्यामुळे राजू शेट्टी याबाबत आंदोलन करणार असतील तर ते रास्त असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाguardian ministerपालक मंत्री