शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

'कोकण-गोव्यातील सोन्याच्या खाणींसाठी तटस्थ सर्वेक्षण करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 11:49 IST

१९८०च्या दशकात महाराष्ट्र खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे यांनीही सोने आणि प्लॅटिनम वर्गातील सहा मौल्यवान धातू असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते

कोल्हापूर : महाराष्ट्रातील कोकण-कर्नाटक आणि गोव्यातील सोन्यासारख्या मौल्यवान खनिजांसाठी केंद्राच्या अखत्यारीत तत्काळ तटस्थ समिती नेमावी, त्यांच्यामार्फत विस्तारित सर्वेक्षण करावे आणि तोपर्यंत या परिसरातील खनिजांची निर्यात पूर्णपणे थांबवून देशाची लूट थांबवावी, अशी मागणी खनिकर्म विभागाचे माजी अधिकारी रामसिंग हजारे, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आणि ज्येष्ठ वकील नंदकुमार पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी पंढरपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याचे सांगितले आहे. पण या जिल्ह्यातच नव्हे तर कोकणासहगोवा आणि कर्नाटक राज्यांतील भूगर्भातही सोन्यासह अन्य मौल्यवान धातू असल्याचे भूगर्भशास्त्राचे अभ्यासक डॉ. एम. के. प्रभू यांनी १९७० मध्ये अंदाज व्यक्त केला होता. १९८०च्या दशकात महाराष्ट्र खनिकर्म विभागाचे अधिकारी रामसिंग हजारे यांनीही सोने आणि प्लॅटिनम वर्गातील सहा मौल्यवान धातू असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले होते. याबाबत केंद्र सरकारशी त्यांनी पत्रव्यवहारही केला. शिवाजी विद्यापीठातील तत्कालीन कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांनीही छायाचित्रकार अनिल वेल्हाळ, उदय कुलकर्णी, हजारे यांच्यासोबत खनिजांचे नमुने तपासले. त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्र्यासह केंद्रीय खाण मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे दिला होता तरीही याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून तत्काळ लोह खनिजाच्या नावावर मौल्यवान धातूच्या निर्यातीतून होणारी देशाची लूट थांबवावी आणि त्याबाबतची वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी, सोन्याबरोबरच प्लॅटिनम, ऑस्मियम व पैलेडियम यासारखे मौल्यवान धातू आढळून येत असलेल्या ‘संदूर पट्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या भूभागाचे सर्वकष सर्वेक्षण करा,

सर्व्हे ऑफ इंडिया, ब्युरो ऑफ माईन्स, केंद्र शासनाच्या खनिकर्म अथवा जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना वगळून तत्काळ केंद्राची तटस्थ समिती नेमावी, त्यात यापूर्वी काम केलेल्या शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांचा समावेश करावा आणि शिवाजी विद्यापीठावर या सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवावी, यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा निश्चित कालावधीत ते पूर्ण करावे, सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत कोकण व गोव्यातील खजिनांची निर्यात पूर्णपणे थांबवावी, आतापर्यंत अब्जावधी रुपयांची लूट झाल्याचे स्पष्ट झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर देशद्रोह व भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGoldसोनंkonkanकोकणgoaगोवा