शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कोकणात सागरी कासवांच्या विणीच्या हंगामाला प्रारंभ; गुहागरच्या किनाऱ्यावर मिळाले पहिले घरटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 14:05 IST

संदीप आडनाईक  कोल्हापूर : सागरी कासवांच्या विणीचा हंगामातील पहिले घरटे कोकण किनारपट्टीवर गुहागर किनाऱ्यावर मिळाले आहे. वन विभागाच्या नोंदीनुसार ...

संदीप आडनाईक कोल्हापूर : सागरी कासवांच्या विणीचा हंगामातील पहिले घरटे कोकण किनारपट्टीवर गुहागर किनाऱ्यावर मिळाले आहे. वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १५ किनाऱ्यांवर कासवांची घरटी सापडतात.हिवाळ्याच्या तोंडावर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमध्ये दरवर्षी सागरी कासवांची वीण होते. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीत समुद्री कासवांमधील 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर ग्रीन सी कासवांची घरटी देखील सापडली आहेत. यंदापासून कासव संवर्धनाच्या कामाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी कांदळवन कक्षाच्या खांद्यावर असणार आहे.सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुहागरच्या किनाऱ्यावर राज्यातील सागरी कासवांची सर्वात जास्त घरटी आढळतात. सहा किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर गेल्यावर्षी २९८ घरटी आढळून आली होती. यंदाच्या हंगामातील पहिले घरटे शुक्रवारी सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावर आढळल्याची माहिती रत्नागिरीच्या विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली. यामध्ये आढळलेल्या ११७ अंड्यांना कासवमित्रांनी हॅचरीमध्ये सुरक्षित हलविल्याचे त्यांनी सांगितले.

तीन हॅचरीमधून कासव संवर्धनगुहागर किनाऱ्यावर सहा कासवमित्रांच्या मदतीने कासव संवर्धनाचे काम होते. यासाठी दोन हॅचरी तयार करण्यात येतात. मात्र, गुहागर किनाऱ्यावर कासवांची घरटी सापडण्याची वर्षागणिक वाढणारी संख्या लक्षात घेता, तीन हॅचरी बांधून कासव संवर्धनाचे काम करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी कोकण किनारपट्टीवरून समुद्री कासवांची १ लाख ५८ हजार ८७३ पिल्ले समुद्रात सोडली होती. तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २ हजार ५६६ घरटी आढळली होती आणि पिल्लांच्या जन्म होण्याचा दर ६४ टक्के होता. हा दर यंदाही कायम आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग