शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
3
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
4
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
5
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
6
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
7
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
8
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
9
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
10
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
11
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
12
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
13
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
14
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
15
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
16
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
17
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
18
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
19
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
20
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

दुर्लक्षामुळे फुलण्याआधीच कोमेजले ऑक्सिजन पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:46 IST

Agriculture Sector firenews kolhapur- निधीची कमतरता आणि सामाजिक वनीकरणच्या दुर्लक्षामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले शेंंडा पार्कातील ऑक्सिजन पार्क फुलण्याआधीच कोमेजून गेले. जळालेल्या ६० टक्केपैकी ८० टक्के वृक्ष हे थोडीशी देखभाल केली, तर जगण्याची आशा आहे. पण याचा खर्च करायचा कुणी, हाच कळीचा प्रश्न आहे. शासनाकडून संरक्षणाचा खर्च येत नसल्यानेच गेल्या आठ महिन्यांपासून या वृक्षसंपदेकडे सामाजिक वनीकरणने दुर्लक्ष केले, त्याची परिणती संपदा जळून खाक होण्यात झाली.

ठळक मुद्देशेंडा पार्कातील वृक्ष लागवड आगीच्या भक्ष्यस्थानी जळालेल्या ६० टक्केपैकी ८० टक्के वृक्ष जगण्याची आशा

कोल्हापूर : निधीची कमतरता आणि सामाजिक वनीकरणच्या दुर्लक्षामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले शेंंडा पार्कातील ऑक्सिजन पार्क फुलण्याआधीच कोमेजून गेले. जळालेल्या ६० टक्केपैकी ८० टक्के वृक्ष हे थोडीशी देखभाल केली, तर जगण्याची आशा आहे. पण याचा खर्च करायचा कुणी, हाच कळीचा प्रश्न आहे. शासनाकडून संरक्षणाचा खर्च येत नसल्यानेच गेल्या आठ महिन्यांपासून या वृक्षसंपदेकडे सामाजिक वनीकरणने दुर्लक्ष केले, त्याची परिणती संपदा जळून खाक होण्यात झाली.राज्य शासनाने २०१८ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना आणली होती. त्याअंतर्गत कोल्हापूरला दोन लाखाचे उद्दिष्ट होते. यातील ४० हजार वृक्षलागवड शेंडा पार्कात करण्याचा पर्याय पुढे आला. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ सोडले, तर कुठेही एक हजाराहून अधिक झाडे एकत्र असणारे जंगल नाही.

आर. के. नगरकडे जाणाऱ्या शेंडा पार्कच्या या उघड्या माळावर सदाहरित जंगल तयार करण्याच्या आणि औषधी पारंपरिक वृक्ष लागवडीच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क तयार करण्याच्या हेतूने हा वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. ही जागा कृषी महाविद्यालयाच्या मालकीची असल्याने तीन वर्षांनंतर वृक्षांसह हस्तांतरण करण्याच्या करारावर सह्या करुन सामाजिक वनीकरणने ९० एकर जागेवर ४० हजार रोपांची लागवड केली.तीन वर्षांच्या करारात या झाडांच्या लागवडीपासून ते त्यांच्या देखभालीपर्यंतची सर्व जबाबदारी सामाजिक वनीकरणने घेतली. यासाठी त्यांना प्रति झाड ४४६ रुपयेप्रमाणे १ कोटी ७८ लाखाच्या संरक्षण खर्चाची तरतूद देखील वन विभागाकडून करण्यात आली. पहिली दोन वर्षे निधी मिळत गेल्याने लावलेल्या ४० हजारपैकी ३५ हजार झाडे जगली. त्यांच्या संरक्षणासाठी चारही बाजूने चर खोदून स्थानिक लोकांचा हस्तक्षेपही थांबवण्यात आला. तथापि यावर्षी कोरोनामुळे संरक्षणासाठीचा शासनाकडून येणारा निधी वारंवार मागणी करुन देखील आला नाही. त्यामुळे एप्रिलपासूनच यातून सामाजिक वनीकरण विभागाने अंग काढून घेतले.

गवत कापणीविषयी वारंवार सांगून देखील वनीकरणने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी रविवारी एक हेक्टर क्षेत्राला आग लागून वृक्ष जळाले. तातडीने ते विझविण्यात आले. योग्य काळजी न घेतल्याने परत दुसऱ्याच दिवशी सोमवारी पुन्हा आग लागली आणि तब्बल ३० हेक्टरवरील वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.हस्तांतरणापूर्वीच घातसामाजिक वनीकरणसोबत झालेल्या करारानुसार येत्या एक एप्रिलला ही वनसंपदा कृषी महाविद्यालयाकडे हस्तांतरित होणार होती. दोन महिने उरले असतानाच आग लागल्याने यामागे दुसरे काही षड्‌यंत्र आहे का? अशीही चर्चा सुरु आहे. या जागेवर जंगल होऊ नये अशी अनेकांची मानसिकता आहे, त्यातूनच हा प्रकार घडला आहे का? यावरुनही आता तपास सुरु आहे.ही होती वृक्षसंपदा...आंबा, वड, पिंपळ, चिंच, लिंब, फणस, आवळा, आपटा, करंज, बहावा, उंबर, कोकम, कदंब, बकुळ.

आम्ही गेली दोन वर्षे चांगल्याप्रकारे झाडे जगवली, पण शासनाकडे मागणी केलेला ३३ टक्के निधी अद्याप मिळालेला नसल्याने या वृक्षसंपदेची देखभाल कशी करायची, मजुरांचे पगार कशातून भागवायचे, हा मोठा प्रश्न आहे.- मधुकर चंदनशिवे,सहायक उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण 

जळालेल्या वृक्षांपैकी ८० टक्के वृक्षांची झळीमुळे पाने गळाली आहेत. त्यांचा बुंधा हिरवा आहे. पाणी व खत व्यवस्थापन केले, तर त्यांना पालवी फुटू शकते, हे मंगळवारी केलेल्या पाहणीदऱम्यान दिसले आहे. त्यासंबंधीच्या सूचना सामाजिक वनीकरणला केल्या आहेत.- प्रा. एस. आर. शिंदे, कृषी महाविद्यालय कोल्हापूर

टॅग्स :fireआगAgriculture Sectorशेती क्षेत्रkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग