शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ढगफुटीसदृश पावसाने रात्र जागवली, नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 18:58 IST

आख्खा दिवस घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघाल्यानंतर गुरुवारची मध्यरात्र ढगफुटीसदृश पावसामुळे जागून काढण्याची वेळ जिल्ह्यावर आली. गडगडाटासह आलेल्या या तुफानी पावसामुळे नागरिकांचा थरकाप उडाला. पन्हाळा व करवीर तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. त्या तुलनेत राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांनी मात्र कडकडीत ऊन अनुभवले.

ठळक मुद्दे ढगफुटीसदृश पावसाने रात्र जागवली, नागरिक भयभीतपन्हाळा, करवीरला सर्वाधिक तडाखा

कोल्हापूर : आख्खा दिवस घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघाल्यानंतर गुरुवारची मध्यरात्र ढगफुटीसदृश पावसामुळे जागून काढण्याची वेळ जिल्ह्यावर आली. गडगडाटासह आलेल्या या तुफानी पावसामुळे नागरिकांचा थरकाप उडाला. पन्हाळा व करवीर तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. त्या तुलनेत राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांनी मात्र कडकडीत ऊन अनुभवले.जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मान्सूनने परतीची वाट धरल्यासारखी वाटचाल सुरू केली आहे. कडकडीत ऊन आणि त्यानंतर कुठे ढग थांबेल तेथे जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (दि. २) दिवसभर असेच वातावरण तापलेले होते. कडक उन्हामुळे अंग भाजून निघत होते. दुपारनंतर मात्र ढग उतरायला सुरुवात झाली.

सोसाट्याच्या वाऱ्यासह जागोजागी पाऊस झाला. रात्री आठनंतर तर जिल्ह्यातील राधानगरी व भुदरगड हे दोन तालुके वगळता ढग फुटल्यासारख्या झालेल्या पावसाने अनेकांच्या पोटात गोळा आणला. पावसाचा जोर एवढा होता की काही मिनिटांतच पाण्याचे लोट वाहू लागले.पन्हाळ्यात सर्वाधिक ३७, करवीरमध्ये ३३ मि.मी. पाऊस काही तासांतच नोंदवला गेला. गडहिंग्लजमध्ये २१, शिरोळमध्ये १९, गगनबावड्यात १८, हातकणंगले, आजरा व चंदगडमध्ये प्रत्येकी १५, शाहूवाडीमध्ये १४, कागलमध्ये ४, राधानगरी व भुदरगडमध्ये एक मि.मी. असा पाऊस झाला. गुरुवारी सकाळीही पावसाचे वातावरण होते; पण थोड्या वेळाने ते निवळले आणि पुन्हा ऊन पडले. दुपारनंतर मात्र ढग भरून आले आणि वादळी पावसाला सुरुवात झाली.राजाराम बंधारा खुलापंचगंगा नदीवरील सात बंधारे बुधवारपर्यंत पाण्याखाली होते; पण गुरुवारी सकाळी केवळ रुई आणि इचलकरंजी हे दोन बंधारे वगळता सर्व बंधारे खुले झाले. राजाराम, सुर्वे, शिंगणापूर हे बंधारे पूर्णपणे खुले झाल्याने या मार्गावरून वाहतूकही सुरू झाली.चिकोत्रा १०० टक्के भरलेआजरा, कागल तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेले चिकोत्रा धरण गुरुवारी सकाळी १०० टक्के भरले. धरणाची घळभरणी झाल्यापासून गेल्या वर्षीपासून दुसऱ्यांदा हे १०० टक्के भरले असल्याने या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. घटप्रभा ९३ टक्के वगळता जिल्ह्यातील सर्व धरणे आजअखेरपर्यंत १०० टक्के भरली आहेत.सांगरूळ सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊसजिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ७६ सर्कलमध्ये सर्वाधिक ६५ मिलिमीटर पाऊस एकट्या करवीर तालुक्यातील सांगरूळमध्ये पडला आहे. करवीरमधीलच कसबा बावडा सर्कलमध्ये ६२ मि.मी. पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव सर्कलमध्ये ६१ मि.मी., हातकणंगले तालुक्यातील हेर्ले सर्कलमध्ये ६० मि.मि., शिरोळमध्ये ४०, पन्हाळ्यातीलच कोतोली ४९, कळे ४१, करवीरमधील बीडमध्ये ४५, गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी सर्कलमध्ये ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर