शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

ढगफुटीसदृश पावसाने रात्र जागवली, नागरिक भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 18:58 IST

आख्खा दिवस घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघाल्यानंतर गुरुवारची मध्यरात्र ढगफुटीसदृश पावसामुळे जागून काढण्याची वेळ जिल्ह्यावर आली. गडगडाटासह आलेल्या या तुफानी पावसामुळे नागरिकांचा थरकाप उडाला. पन्हाळा व करवीर तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. त्या तुलनेत राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांनी मात्र कडकडीत ऊन अनुभवले.

ठळक मुद्दे ढगफुटीसदृश पावसाने रात्र जागवली, नागरिक भयभीतपन्हाळा, करवीरला सर्वाधिक तडाखा

कोल्हापूर : आख्खा दिवस घामाच्या धारांमध्ये न्हाऊन निघाल्यानंतर गुरुवारची मध्यरात्र ढगफुटीसदृश पावसामुळे जागून काढण्याची वेळ जिल्ह्यावर आली. गडगडाटासह आलेल्या या तुफानी पावसामुळे नागरिकांचा थरकाप उडाला. पन्हाळा व करवीर तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. त्या तुलनेत राधानगरी आणि भुदरगड तालुक्यांनी मात्र कडकडीत ऊन अनुभवले.जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मान्सूनने परतीची वाट धरल्यासारखी वाटचाल सुरू केली आहे. कडकडीत ऊन आणि त्यानंतर कुठे ढग थांबेल तेथे जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (दि. २) दिवसभर असेच वातावरण तापलेले होते. कडक उन्हामुळे अंग भाजून निघत होते. दुपारनंतर मात्र ढग उतरायला सुरुवात झाली.

सोसाट्याच्या वाऱ्यासह जागोजागी पाऊस झाला. रात्री आठनंतर तर जिल्ह्यातील राधानगरी व भुदरगड हे दोन तालुके वगळता ढग फुटल्यासारख्या झालेल्या पावसाने अनेकांच्या पोटात गोळा आणला. पावसाचा जोर एवढा होता की काही मिनिटांतच पाण्याचे लोट वाहू लागले.पन्हाळ्यात सर्वाधिक ३७, करवीरमध्ये ३३ मि.मी. पाऊस काही तासांतच नोंदवला गेला. गडहिंग्लजमध्ये २१, शिरोळमध्ये १९, गगनबावड्यात १८, हातकणंगले, आजरा व चंदगडमध्ये प्रत्येकी १५, शाहूवाडीमध्ये १४, कागलमध्ये ४, राधानगरी व भुदरगडमध्ये एक मि.मी. असा पाऊस झाला. गुरुवारी सकाळीही पावसाचे वातावरण होते; पण थोड्या वेळाने ते निवळले आणि पुन्हा ऊन पडले. दुपारनंतर मात्र ढग भरून आले आणि वादळी पावसाला सुरुवात झाली.राजाराम बंधारा खुलापंचगंगा नदीवरील सात बंधारे बुधवारपर्यंत पाण्याखाली होते; पण गुरुवारी सकाळी केवळ रुई आणि इचलकरंजी हे दोन बंधारे वगळता सर्व बंधारे खुले झाले. राजाराम, सुर्वे, शिंगणापूर हे बंधारे पूर्णपणे खुले झाल्याने या मार्गावरून वाहतूकही सुरू झाली.चिकोत्रा १०० टक्के भरलेआजरा, कागल तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेले चिकोत्रा धरण गुरुवारी सकाळी १०० टक्के भरले. धरणाची घळभरणी झाल्यापासून गेल्या वर्षीपासून दुसऱ्यांदा हे १०० टक्के भरले असल्याने या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. घटप्रभा ९३ टक्के वगळता जिल्ह्यातील सर्व धरणे आजअखेरपर्यंत १०० टक्के भरली आहेत.सांगरूळ सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊसजिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ७६ सर्कलमध्ये सर्वाधिक ६५ मिलिमीटर पाऊस एकट्या करवीर तालुक्यातील सांगरूळमध्ये पडला आहे. करवीरमधीलच कसबा बावडा सर्कलमध्ये ६२ मि.मी. पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव सर्कलमध्ये ६१ मि.मी., हातकणंगले तालुक्यातील हेर्ले सर्कलमध्ये ६० मि.मि., शिरोळमध्ये ४०, पन्हाळ्यातीलच कोतोली ४९, कळे ४१, करवीरमधील बीडमध्ये ४५, गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी सर्कलमध्ये ४४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर