शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

बंद कारखान्यांकडे ३२.४१ कोटी भागभांडवल अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:40 IST

‘शरद’ला एक कोटी १९ लाख रुपये भागभांडवल दिले असून, पैकी ६९ लाख थकीत आहेत. त्यातील दहा लाख रुपये भरले आहेत. ‘मंडलिक’ कारखान्याकडे सहा कोटी ५१ लाख रुपये भागभांडवल आहे, पैकी पाच कोटी सहा लाख थकीत असून त्यातील त्यांनी २५ लाख भरले. डी. वाय. पाटील कारखान्याकडे तीन कोटी दहा लाख शिल्लक भागभांडवल आहे.

ठळक मुद्दे‘कुंभी’, ‘मंडलिक’, ‘शरद’ने पैसे भरल्याने परवान्याचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : जिल्ह्यातील बंद साखर कारखान्यांकडे शासनाचे ३२ कोटी ४१ लाख रुपयांचे भागभांडवल अडकले आहे. हा हप्ता थकल्याने साखर आयुक्तांनी चालू कारखान्यांपैकी ‘कुंभी’, ‘सदाशिवराव मंडलिक’, ‘शरद’, ‘डी. वाय. पाटील’ यांचा गाळप परवाना रोखला होता; पण त्यांनी भागभांडवलाचा देय हप्ता भरल्याने परवान्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

साखर कारखाना सुरू करताना अथवा मध्यंतरीच्या टप्प्यात शासन कारखान्यांना भागभांडवल म्हणून पैसे देते. त्याचा परतावा साधारणत: दहा वर्षांनंतर कारखाना सक्षम झाल्यानंतर करावयाचा असतो. प्रत्येक वर्षी कारखान्यांना हा हप्ता येतो, बहुतांशी कारखाने त्याची नियमित परतफेड करतात. मात्र, यंदा कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखाना, हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखाना, नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखाना व डी. वाय. पाटील साखर कारखाना पळसंबे (ता. गगनबावडा) या कारखान्यांचे हप्ते थकले होते. ‘कुंभी’ला तीन कोटी ८८ लाख रुपये दिले असून, ३८ लाख ८५ हजार रुपये थकीत हप्ता होता. यापैकी १० टक्केप्रमाणे तीन लाख ८८ हजार रुपये भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी भरले आहेत.

‘शरद’ला एक कोटी १९ लाख रुपये भागभांडवल दिले असून, पैकी ६९ लाख थकीत आहेत. त्यातील दहा लाख रुपये भरले आहेत. ‘मंडलिक’ कारखान्याकडे सहा कोटी ५१ लाख रुपये भागभांडवल आहे, पैकी पाच कोटी सहा लाख थकीत असून त्यातील त्यांनी २५ लाख भरले. डी. वाय. पाटील कारखान्याकडे तीन कोटी दहा लाख शिल्लक भागभांडवल आहे. त्यातील ७० लाख भरल्याने त्यांच्या गाळप परवान्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.इंदिरा महिला साखर कारखाना, तांबाळे (ता. भुदरगड)कडे १७ कोटी २८ लाख रुपये भागभांडवल आहे. त्यातील १६ कोटी ७८ लाख थकीत आहेत. देवर्डे (ता. भुदरगड) येथील भुदरगड तालुका साखर कारखान्याकडे १५ लाख, तर धामोड (ता. राधानगरी) येथील सह्याद्री साखर कारखान्याकडे १२ कोटींचे भागभांडवल थकीत आहे.‘दत्त’ आसुर्लेची विक्री, तरीही थकीतचआसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखान्याची दालमिया शुगर्स प्रा. लि.ला तब्बल १०८ कोटी रुपयांनी विक्री केली. वास्तविक कारखाना लिलावाची प्रक्रिया राबविताना शासकीय येणे-देणेबाबत काही अटी होत्या. त्यानुसार शासकीय भागभांडवलाबाबतही चर्चा झाली होती; पण त्यांच्याकडे अद्याप तीन कोटी ४८ लाख ७५ हजारांचे भागभांडवल अडकून आहे.विभागात दीड लाख टनांपेक्षा अधिक गाळपविभागातील सुमारे २४ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यांनी आतापर्यंत दीड लाख टनांपेक्षा अधिक गाळप केले असून, सर्वाधिक गाळप डी. वाय. पाटील साखर कारखान्याने ४४ हजार ७०० टनांचे केले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेbillबिलMONEYपैसा