शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

बंद कारखान्यांकडे ३२.४१ कोटी भागभांडवल अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:40 IST

‘शरद’ला एक कोटी १९ लाख रुपये भागभांडवल दिले असून, पैकी ६९ लाख थकीत आहेत. त्यातील दहा लाख रुपये भरले आहेत. ‘मंडलिक’ कारखान्याकडे सहा कोटी ५१ लाख रुपये भागभांडवल आहे, पैकी पाच कोटी सहा लाख थकीत असून त्यातील त्यांनी २५ लाख भरले. डी. वाय. पाटील कारखान्याकडे तीन कोटी दहा लाख शिल्लक भागभांडवल आहे.

ठळक मुद्दे‘कुंभी’, ‘मंडलिक’, ‘शरद’ने पैसे भरल्याने परवान्याचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : जिल्ह्यातील बंद साखर कारखान्यांकडे शासनाचे ३२ कोटी ४१ लाख रुपयांचे भागभांडवल अडकले आहे. हा हप्ता थकल्याने साखर आयुक्तांनी चालू कारखान्यांपैकी ‘कुंभी’, ‘सदाशिवराव मंडलिक’, ‘शरद’, ‘डी. वाय. पाटील’ यांचा गाळप परवाना रोखला होता; पण त्यांनी भागभांडवलाचा देय हप्ता भरल्याने परवान्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

साखर कारखाना सुरू करताना अथवा मध्यंतरीच्या टप्प्यात शासन कारखान्यांना भागभांडवल म्हणून पैसे देते. त्याचा परतावा साधारणत: दहा वर्षांनंतर कारखाना सक्षम झाल्यानंतर करावयाचा असतो. प्रत्येक वर्षी कारखान्यांना हा हप्ता येतो, बहुतांशी कारखाने त्याची नियमित परतफेड करतात. मात्र, यंदा कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखाना, हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखाना, नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद सहकारी साखर कारखाना व डी. वाय. पाटील साखर कारखाना पळसंबे (ता. गगनबावडा) या कारखान्यांचे हप्ते थकले होते. ‘कुंभी’ला तीन कोटी ८८ लाख रुपये दिले असून, ३८ लाख ८५ हजार रुपये थकीत हप्ता होता. यापैकी १० टक्केप्रमाणे तीन लाख ८८ हजार रुपये भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी भरले आहेत.

‘शरद’ला एक कोटी १९ लाख रुपये भागभांडवल दिले असून, पैकी ६९ लाख थकीत आहेत. त्यातील दहा लाख रुपये भरले आहेत. ‘मंडलिक’ कारखान्याकडे सहा कोटी ५१ लाख रुपये भागभांडवल आहे, पैकी पाच कोटी सहा लाख थकीत असून त्यातील त्यांनी २५ लाख भरले. डी. वाय. पाटील कारखान्याकडे तीन कोटी दहा लाख शिल्लक भागभांडवल आहे. त्यातील ७० लाख भरल्याने त्यांच्या गाळप परवान्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.इंदिरा महिला साखर कारखाना, तांबाळे (ता. भुदरगड)कडे १७ कोटी २८ लाख रुपये भागभांडवल आहे. त्यातील १६ कोटी ७८ लाख थकीत आहेत. देवर्डे (ता. भुदरगड) येथील भुदरगड तालुका साखर कारखान्याकडे १५ लाख, तर धामोड (ता. राधानगरी) येथील सह्याद्री साखर कारखान्याकडे १२ कोटींचे भागभांडवल थकीत आहे.‘दत्त’ आसुर्लेची विक्री, तरीही थकीतचआसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखान्याची दालमिया शुगर्स प्रा. लि.ला तब्बल १०८ कोटी रुपयांनी विक्री केली. वास्तविक कारखाना लिलावाची प्रक्रिया राबविताना शासकीय येणे-देणेबाबत काही अटी होत्या. त्यानुसार शासकीय भागभांडवलाबाबतही चर्चा झाली होती; पण त्यांच्याकडे अद्याप तीन कोटी ४८ लाख ७५ हजारांचे भागभांडवल अडकून आहे.विभागात दीड लाख टनांपेक्षा अधिक गाळपविभागातील सुमारे २४ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यांनी आतापर्यंत दीड लाख टनांपेक्षा अधिक गाळप केले असून, सर्वाधिक गाळप डी. वाय. पाटील साखर कारखान्याने ४४ हजार ७०० टनांचे केले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेbillबिलMONEYपैसा