शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

शहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:04 PM

कोल्हापूर शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे लवकरच शहरातील टाक्या स्वच्छ केल्या जातील.

ठळक मुद्देशहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणार कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या निविदा प्रसिद्ध

कोल्हापूर : शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे लवकरच शहरातील टाक्या स्वच्छ केल्या जातील.कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या ठिकठिकाणी पाण्याच्या २८ टाक्या आहेत. उपसा केंद्रांतून पाणी या टाक्यांमध्ये आणले जाते. येथून परिसरात पाणीपुरवठा केला जातो. यांपैकी बहुतांश टाक्या अनेक वर्षांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. काही टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पुईखडी येथे पाणीपुरवठा विभागाचे शुद्धीकरण केंद्र आहे.

उपसा केंद्रातून येथे पाणी आणले जाते. लाखो रुपये खर्च करून पाणी शुद्धीकरण केले जाते. मात्र, बहुतांश टाक्यांची अनेक वर्षे स्वच्छता केली नसल्यामुळे स्वच्छ केलेले पाणी अस्वच्छ होण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी टाक्या स्वच्छ असणे आवश्यक आहे.

यासाठी पाणीपुरवठा विभागाने टाक्या स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. उंच व बैठ्या टाक्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रतिहजारी लिटर्सप्रमाणे टाक्या स्वच्छतेसाठी संबंधित कंपनीला निविदा देण्यात येणार आहेत. १९ नोव्हेंबरपर्यंत कोटेशन देण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रशासनाने केल्या आहेत.

  • शहरात पाणी कनेक्शन - १ लाख १० हजार
  • प्रभाग संख्या- ८१
  • पाण्याच्या टाक्या- २८
  • वॉर्ड संख्या- ५
  • नदीतून दररोज उपसा होणारे पाणी- १२0 एमएलडी
  • शहराचे क्षेत्रफळ- ६६.८२ कि.मी.

पहिल्या टप्प्यात स्वच्छता होणाऱ्या टाक्या

  • साळोखेनगर
  • पुईखडी फिल्टर
  • कोकणे मठ
  • शालिनी टाकीशहरातील प्रमुख पाण्याच्या टाक्यापाण्याचा खजिना, पाण्याचा खजिना नवीन उंच टाकी, शालिनी टाकी, चंबुखडी, पुईखडी, आपटेनगर, साळोखेनगर, कळंबा फिल्टर, पद्मावती मंदिर, शेंडा पार्क, आर.के.नगर सोसायटी उंच टाकी, आर. के.नगर गणपती मंदिर परिसर, मोरेवाडी दगडी टाकी 
  • एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंदटाकी स्वच्छ करण्यासाठी एक दिवस टाकी रिकामी असणे आवश्यक आहे. संबंधित टाकीवर आवलंबून असणाऱ्या परिसराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद होणार आहे. स्वच्छ पाण्यासाठी टाकी स्वच्छ असणे आवश्यक असल्याने नागरिकांना एक दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाwater pollutionजल प्रदूषणkolhapurकोल्हापूर