शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शहरातील बारावीचे वर्ग मंगळवारपासून भरणार, विद्यार्थ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 14:36 IST

coronavirus, educationsector, school, kolhapurnews कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दक्षतेच्या उपाययोजनांची तयारी आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाल्याने शहरातील महाविद्यालयांनी इयत्ता बारावीचे वर्ग मंगळवार (दि. १ डिसेंबर) पासून भरणार आहेत. त्याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना दूरध्वनी, एसएमएसद्वारे सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्दे शहरातील बारावीचे वर्ग मंगळवारपासून भरणार, विद्यार्थ्यांना सूचना महाविद्यालयांकडून अकरावी प्रवेशाची तयारी सुरू

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दक्षतेच्या उपाययोजनांची तयारी आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाल्याने शहरातील महाविद्यालयांनी इयत्ता बारावीचे वर्ग मंगळवार (दि. १ डिसेंबर) पासून भरणार आहेत. त्याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांना दूरध्वनी, एसएमएसद्वारे सूचना दिल्या आहेत.

अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाच्या प्रक्रियेचा प्रारंभ गुरुवार (दि. ३ डिसेंबर) पासून होणार आहे. त्याची तयारी महाविद्यालयांनी सुरू केली आहे. जिल्हा आणि शहरातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरविण्याची प्रक्रिया दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाली.

त्यामध्ये शहर वगळता जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील इयत्ता नववी, दहावीचे वर्ग भरले. महापालिकेच्या कोरोना नियंत्रण समितीने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील व्यवस्थेची पाहणी गेल्या तीन दिवसांपूर्वी सुरू केली. या महाविद्यालयांनी कोरोनाच्या उपाययोजना केल्या आहेत. तेथील शिक्षक, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे. त्यामुळे त्यांनी मंगळवारपासून बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातील ३८० शाळा सुरूजिल्ह्यातील ३८० शाळा शुक्रवारपर्यंत सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये एकूण २४१५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक ७३ शाळा करवीर तालुक्यात सुरू झाल्या आहेत. त्यापाठोपाठ पन्हाळा (४७), शिरोळ (३९), चंदगड (३८), कागल (३६), राधानगरी (३४), भुदरगड (३२), शाहूवाडी (२७), हातकणंगले (२६) या तालुक्यांचा क्रम आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर