संकट वाढले तरी नागरिकांची बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:35+5:302021-02-23T04:36:35+5:30

जयसिंगपूर : मागील मार्च महिन्यापासून सुरू झालेले कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. जयसिंगपूर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर ...

Citizens' indifference despite the crisis | संकट वाढले तरी नागरिकांची बेफिकिरी

संकट वाढले तरी नागरिकांची बेफिकिरी

जयसिंगपूर : मागील मार्च महिन्यापासून सुरू झालेले कोरोनाचे संकट अद्यापही घोंगावत आहे. जयसिंगपूर शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली आहे. असे असतानाही शहरातील बाजारपेठेत नागरिक मास्क न लावताच बिनधास्त वावरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अनलॉकची प्रक्रिया राबविताना शासनाने मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगची नियमावली घालून दिली होती. मात्र, या नियमांचे गेल्या दोन महिन्यांपासून पालन बंद झाले आहे. यामुळे कोरोना संपल्यासारखीच परिस्थिती बाजारपेठेत पहावयास मिळत होती. मात्र, मुंबई, पुणे, नागपूर यासह कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, नागरिकांकडून कोरोना रुग्णांवरील उपाय कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. वर्षभरापूर्वी लॉकडाऊन सुरू झाले होते. त्याची वर्षपूर्ती होत असतानाच कोरानाने पुन्हा शिरकाव केला आहे; परंतु कोरोना कमी झालेला नाही, हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे असल्यास तपासणी करण्याची गरज आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याने त्याचा फैलाव होत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वीच नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.

फोटो - २१०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - जयसिंगपूर शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात मास्क न लावताच अनेक नागरीक बिनधास्त वावरत होते.

Web Title: Citizens' indifference despite the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.