शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री योजना’ राबविणार, दरमहा ३००० रुपये मिळणार; खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 12:14 IST

इचलकरंजी : राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री योजना’ राबविण्यात येणार असून, प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले ...

इचलकरंजी : राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री योजना’ राबविण्यात येणार असून, प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जातील. या योजनेची घोषणा लवकरच राज्य सरकार करणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.येथील संजय गांधी निराधार योजनेतील ४०० लाभार्थ्यांना शिंदे यांच्या हस्ते पत्र वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना १५०० रुपयांऐवजी आता दोन हजार रुपये पेन्शन देण्याबाबत सरकार विचार करीत आहेत. दिव्यांगांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच संगांयोमधील २५ हजार रुपये उत्पन्नाची अट बदलून ५० हजार रुपयांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या मुलाचे वय २५ वर्षे झाल्यानंतर त्या यादीतून लाभार्थ्याचे नाव वगळले जात होते; मात्र ही अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठांना आयुष्यभर पेन्शन स्वरूपात लाभ मिळणार आहे; तसेच आता राज्य सरकार ६५ वर्षांवरील व्यक्तींच्या खात्यात थेट तीन हजार रुपये आणि पेन्शनचे १५०० रुपये असे साडेचार हजार रुपये मिळतील.खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भाषणे झाली. संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विठ्ठल चोपडे, रवींद्र माने, अमृत भोसले यांच्यासह संजय गांधी योजनेचे पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShrikant Shindeश्रीकांत शिंदे