शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आजरा कारखान्याचे धुराडे यंदाही राहणार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 11:45 IST

ajara sugerfactory, kolhapur, hasanmusrif, आजरा साखर कारखान्याचे यंदा सलग दुसऱ्या वर्षीही धुराडे पेटणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला पुन्हा नव्याने १४० कोटींचे कर्ज देणे शक्य नसल्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केल्याने कारखान्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देआजरा कारखान्याचे धुराडे यंदाही राहणार बंदच जिल्हा बँकेकडून अर्थसहाय्यात अडचण, मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याचे यंदा सलग दुसऱ्या वर्षीही धुराडे पेटणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला पुन्हा नव्याने १४० कोटींचे कर्ज देणे शक्य नसल्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केल्याने कारखान्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.याबाबत मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या ३१ मार्च २०२० च्या ताळेबंदामध्ये आम्ही १० टक्के एनपीएची म्हणजे १४ कोटींची तरतूद केली आहे. आजरा साखर कारखान्याची मालतारण, नियमित कर्ज अशी सर्व कर्जखाती एनपीएमध्ये गेली आहेत.

जर आजरा कारखान्याला नवीन कर्ज द्यावयाचे झाले तर त्यांना साखर सोडून बाकीचे सर्व कर्ज भरावे लागेल. त्याशिवाय नवे कर्ज देता येणार नाही असे नाबार्ड आणि राज्य बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे पडले. आता पुन्हा १४० कोटी रूपयांचे कर्ज देणे जिल्हा बँकेला परवडणार नाही. त्याचा बँकेच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे हा कारखाना यंदा सुरू होण्याची शक्यता धूसर आहे.कारखान्याचा गेल्या वर्षी गळित हंगाम झाला नाही. यंदाचा हंगाम घेण्यासाठी खासगी कंपन्यांशी चर्चाही झाली. जिल्हा बँकेने कारखान्याची साखर ताब्यात घेवून साखर कारखाना चालवण्यासाठी देण्यासाठी निविदाही काढली. मात्र आलेली एकच निविदा रद्द करण्यात आली. यानंतर जिल्हा बॅकेवरच सर्वांच्या आशा केंद्रित झाल्या. यासाठी व्यवस्थापन आणि कारखाना पदाधिकारी यांच्या बैठका झाला. परंतू मुश्रीफ यांनी स्पष्टपणे भूमिका मांडल्यामुळे उरल्या सुरल्या आशाही संपल्या आहेत.कंपनीलाच प्राधान्य राहणारएकूण स्थिती पाहता पुढच्या वर्षी जरी साखर कारखाना सुरू करायचा झाला तरी एखाद्या खासगी कंपनीलाच तो चालवण्यासाठी द्यावा लागणार आहे. कारण जर यंदा जिल्हा बँक कर्ज देवू शकत नसेल तर ती पुढच्या वर्षी तरी कशी देणार हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आणखी अटी, शर्ती घालून एखादी कंपनी त्यासाठी पुढच्या वर्षी तयार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ