शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

क्षणिक रागात होरपळले कोवळ्या जिवांचे बालपण--कोल्हापूर शुक्रवार पेठेतील आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करणचे पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 1:20 AM

कोल्हापूर : पती-पत्नी आणि दोन गोंडस मुले असे हे चौकोनी कुटुंब, चांदी कारागिरीचा धंदा असल्याने आर्थिकदृष्ट्याही सक्षम, चांगले दुमजली घर, अशा या रेशमी घरट्याला वडिलांच्या क्षणिक रागाचे ग्रहण लागले.

ठळक मुद्देअनाथ भावंडं : आता त्यांना आई-वडील कधीच दिसणार नाहीत. क्षणिक रागात मुलांचे हे होरपळलेले बालपण इतर कोणत्याही व्यक्तींनी न भरून येणार आहे.

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : पती-पत्नी आणि दोन गोंडस मुले असे हे चौकोनी कुटुंब, चांदी कारागिरीचा धंदा असल्याने आर्थिकदृष्ट्याही सक्षम, चांगले दुमजली घर, अशा या रेशमी घरट्याला वडिलांच्या क्षणिक रागाचे ग्रहण लागले. त्या घटनेत झालेल्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर गणेश आणि करण लहानग्या भावंडांच्या बावरलेल्या आणि पाणावलेल्या नजरा मोठ्यांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावून जातात. पालक नसले तरी मुलं मोठी होतातच, पण प्रश्न आहे तो अचानक आई-वडिलांच्या हरवलेल्या छत्रछायेचा आणि मनावर कायमस्वरूपी उठलेल्या ओरखड्यांचा. आता या मुलांचे पुढे काय? हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील माणसाला सतावत राहतो.

शुक्रवार पेठेतील जैन मठासमोरील बोळात राहत असलेले चांदी व्यावसायिक सुभाष कुंभार यांनी पत्नीचा खून करून आत्महत्या केली. त्यामागे कारण कोणतेही असले तरी या क्षणिक रागाने दोन निरागस भावंडांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे मायेचे छत्र हिरावून घेतले आहे. आई-वडिलांच्या निधनाचे दु:ख, त्यानंतर सुरू झालेल्या चर्चा, तुला कधी कळलं आई-वडील सारखे भांडायचे का? तुला काही बोलले होते का? असे पोलिसांसह परिसरातील नागरिक, नातेवाइकांचे प्रश्न आणि भेटायला येणाºयांच्या सहानुभूतीने हळहळणाºया नजरांचा सामना करणाºया निरागस नजराही न बोलता खूप काही बोलून जातात. या घटनेनंतर त्यांच्या घराला कुलूप असून, दोन्ही मुलं काकांच्या घरी आहेत.

सुभाष कुंभार यांना तीन मोठे भाऊ असून, ते तिघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. विटा तयार करणे, हा त्यांचा मूळ व्यवसाय. मात्र, शेजारी राहणाºया चांदी कारागिरांमुळे त्यांनीही व्यवसाय बदलला आणि चारही भावांनी चांदी व्यवसायात जम बसविला. सुभाष कुंभार तेवढे जैन गल्लीत राहायचे. मोठा मुलगा करण हा विवेकानंद शाळेत इयत्ता सातवीत, तर लहान करण हा खर्डेकर शाळेत पाचवीत शिकतो. लहान दीर आणि जावेच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या काकींनी ‘आता आम्ही सगळे मिळून मुलांचा सांभाळ करू,’ तर काकांनी, ‘बघू, आमच्यात चर्चा होऊन मुलांचे काय करायचे ते ठरवू,’ असे सांगितले.

पालकांनी टाकून दिलेली अगदी एक दिवसाची, अनाथपण वाट्याला आलेली मुलंही मोठी होतात. कोणत्या ना कोणत्या नातेवाइकांकडून, संस्थांकडून त्यांचा सांभाळ केला जातो. प्रश्न राहतो तो अशा दुर्दैवी घटनांमुळे अचानक आई-वडिलांचे प्रेम, माया, आईची उबदार कूस आणि वडिलांची आदरयुक्त भीती, लाडिक हट्ट, घेतली जाणारी काळजी या हरवलेल्या छायाछत्राचा आणि मनावर उठलेल्या ओरखड्यांचा.कोल्हापुरात आई-वडिलांच्या मृत्यूनंतर काकांच्या घरी असलेली गणेश आणि करण ही लहान भावंडे गुरुवारी अशी बावरलेली होती. काका-काकी, इतर भावंडं असली तरी आता त्यांना आई-वडील कधीच दिसणार नाहीत. पालकांना आलेल्या क्षणिक रागात मुलांचे हे होरपळलेले बालपण इतर कोणत्याही व्यक्तींनी न भरून येणार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFamilyपरिवार