शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विषय हार्ड, काटा किर्रर...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाला कोल्हापुरी ठसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 20:09 IST

मागील अडीच वर्षाच्या काळात एकही सिंचनाचा प्रकल्प मंजूर केला नव्हता असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला.

कोल्हापूर - लय भारी, कोल्हापूरकरांनो, राम राम..! ही काटा किर्रर गर्दी अन् नाद खुळा उत्साह पाहून विरोधकांचा टांगा पलटी, घोडं फरार व्हायचं नव्हं अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणानं कोल्हापूरकरांना साद घातली. शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासन आपल्या दारी या उपक्रमाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्धाटन झाले. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा-शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तुम्ही विषय लईट हार्ड केलाय, जिकडे बघावे तिकडे गर्दीच गर्दी हाय, आतापर्यंत जेवढे कार्यक्रम, मेळावे झाले त्यापेक्षा आजच्या कार्यक्रमानं सर्वांच्या गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक आज आपण केलंय. नजर पोहचत नाही तिथपर्यंत माणसं आहेत. कोल्हापूरची जनता या मैदानात प्रेमानं, आपुलकीने आलीय. मी कोल्हापूरकरांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून धन्यवाद देतो असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत कोल्हापूरची माती छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शनाने पवित्र झालीय. या मातीने आपल्याला पराक्रम शिकवलाय. कुठलेही संकट कोसळले तरी धाडसी बाणा कोल्हापूरने शिकवलाय. निधड्या छातीचा कोल्हापूरकर सगळ्या संकटाला सामोरे जाऊन यशस्वी होतो. हजारो, लाखो लोक शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हजेरी लावू लागले. एका छताखाली निर्णय, लाभ, योजना आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे देण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारी कामासाठी फार मोठा खटाटोप करावा लागतो. परंतु आपलं सरकार सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आहे. आतापर्यंत ३०-३५ कॅबिनेट झाल्या त्यात सर्वसामान्यांच्या हितापेक्षा दुसरा कुठलाही निर्णय घेतला नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, मागील अडीच वर्षाच्या काळात एकही सिंचनाचा प्रकल्प मंजूर केला नव्हता. परंतु आपल्या ११ महिन्याच्या काळात २९ सिंचनाच्या प्रकल्पांना मंजुरी देत ६-७ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुलीच्या जन्मापासून ११ वीपर्यंत तिला पैसे देण्याची योजना सरकारने आणली. नमो शेतकरी सन्मान योजनेतंर्गत वर्षाला १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. सततच्या पावसामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून १५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला. शेतकरी केंद्र बिंदू मानून आपण काम करतोय. मागच्या सरकारने जे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार अनुदान घेण्याचा निर्णय घेतला परंतु प्रत्यक्षात पैसे जमा झाले नाही. परंतु आपले सरकार येताच हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. महिलांना ५० टक्के दरात एसटी सेवा दिली. ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास दिला अशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे