शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

कोल्हापूर शहराचे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:58 AM

सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार

ठळक मुद्दे रखडलेल्या कामांना गती देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागणार आहे.

कोल्हापूर : राज्यात भाजपची, तर महानगरपालिकेत कॉँग्रेस आघाडीची सत्ता राहिल्यामुळे गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे अनेक प्रकल्प रखडले. शहर विकासापासून वंचित राहिले; मात्र आता नव्या सरकारसमोर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प पूर्ण करण्याचे एक आव्हान असणार आहे.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्याची योजना २०१४ मध्ये कॉँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केली. सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार अथवा पालकमंत्री यांचे सहकार्य अपेक्षित होते ते मिळाले नाही; त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.

पाच कोटी खर्चाचा सेफ सिटी प्रकल्प - दुसरा टप्पा, सात कोटींचे बहुमजली वाहनतळ, १४ कोटींचा केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान सुशोभीकरण - दुसरा टप्पा, ८० कोटींचा अंबाबाई मंदिर विकास आराखडा, १७० कोटींचा अमृत योजना प्रकल्प, नर्सरी बागेतील छत्रपती शाहू समाधिस्थळ, दुसरा टप्पा, १० कोटींचा नगरोत्थान योजनेतील रस्ते यासह अन्य काही महत्त्वाची विकास कामे रखडलेली आहेत. रखडलेल्या कामांना गती देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाGovernmentसरकार