शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

बालकल्याण समितीची अध्यक्षपदे वर्षभरापासून रिक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:32 PM

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बालकल्याण समितीचे अध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. या पदासाठी प्रस्ताव मागवून मुलाखतीही झाल्या आहेत; परंतु तोपर्यंत राज्यात सत्तांतर झाल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. अशीच स्थिती राज्यातील १७ जिल्ह्यांतील याच समित्यावरील सदस्यांच्या २३ पदांची आहे. त्याही नियुक्त्या लोंबकळत पडल्या आहेत. त्याचा या समितीच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देबालकल्याण समितीची अध्यक्षपदे वर्षभरापासून रिक्तचकोल्हापूर-सिंधुदुर्गमधील चित्र : १७ जिल्ह्यांतील सदस्यपदे रिक्त

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बालकल्याण समितीचे अध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. या पदासाठी प्रस्ताव मागवून मुलाखतीही झाल्या आहेत; परंतु तोपर्यंत राज्यात सत्तांतर झाल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. अशीच स्थिती राज्यातील १७ जिल्ह्यांतील याच समित्यावरील सदस्यांच्या २३ पदांची आहे. त्याही नियुक्त्या लोंबकळत पडल्या आहेत. त्याचा या समितीच्या कामकाजावर परिणाम होत आहे.बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील प्र्रकरण ५ मधील कलम २७ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम २०१८ मधील नियम १५ (१) मध्ये बालकल्याण समिती स्थापन करण्याची तरतूद आहे.विधिसंघर्षग्रस्त आणि काळजी व संरक्षणाची गरज बालकांच्या बालहक्क, पुनर्वसन या संदर्भातील निर्णय घेणारी ही न्यायिक समिती आहे. भाजप सरकारच्या काळात कोल्हापूरच्या अध्यक्षपदी मे २०१८ मध्ये शुभांगी जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांनी आठ महिने काम केले. त्या इचलकरंजी नगरपालिकेत नोकरीस होत्या. कौटुंबिक कारणांतून त्यांना वेळ देता येईना म्हणून त्यांनी आठ महिन्यांत राजीनामा दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर अध्यक्षांसह सदस्यांचीही पाच पदे रिक्त आहेत. तिथे आधीच्या समितीलाच मुदतवाढ दिली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी महिला बालकल्याण आयुक्तांनी १५ जून २०१९ रोजी अर्ज मागविले. त्यानुसार मुलाखती झाल्या; परंतु कुणालाच अजून नियुक्ती देण्यात आलेली नाही. या पदाची कायदेशीर मुदत तीन वर्षांसाठी आहे. त्यांतील दोन वर्षे संपली आहेत.

आता नव्याने सदस्यांची कधी निवड होणार आणि ती उर्वरित काळासाठी होणार की पुन्हा तीन वर्षांसाठी हा प्रश्न आहे. या नियुक्त्या राज्यपालांच्या मान्यतेने होत असल्या तरी त्यांवर राज्य सरकारचा अंकुश असतो. मधल्या काळात राज्यात सत्तांतर झाले; त्यामुळे यापूर्वीच प्रस्ताव मागविलेल्या लोकांना संधी देणार की नव्याने ही सगळीच प्रक्रिया राबविणार याबाबत संभ्रम आहे.

या समितीच्या अध्यक्षपदावरील व्यक्तीस विशिष्ट अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे नियमित अध्यक्ष व नियमानुसार कामकाज होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने या समितीवरील रिक्त पदे तातडीने भरावीत.- अतुल देसाईआभास फौंडेशन, कोल्हापूर 

 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासkolhapurकोल्हापूर