शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार वाढवण्यात केंद्र सरकार अपयशी - डॉ. वंदना सोनाळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:17 IST

'ही तर अक्राळविक्राळ भांडवलशाही'

कोल्हापूर : खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सध्याच्या काळात जरी हातात पैसे जास्त आले असे वाटत असले तरी सर्वसामान्यांना जगण्यासाठी ते पुरे पडत नाहीत, हे वास्तव आहे. तसेच रोजगार वाढवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरल्याचे मत अर्थशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. वंदना सोनाळकर यांनी व्यक्त केले.अवी पानसरे व्याख्यानमालेमध्ये त्यांनी बुधवारी ‘जागतिक भांडवलशाहीची सद्य:स्थिती आणि भारताची अर्थव्यवस्था’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक डॉ. वसंत भोसले होते. यावेळी गतवर्षीच्या व्याख्यानमालेतील भाषणांचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी डॉ. सोनाळकर यांनी १९९१च्या आधीची परिस्थिती आणि खुल्या अर्थव्यवस्थेनंतरची स्थिती याचा आढावा घेत आपली निरीक्षणे मांडली. त्या म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात दोन धक्के भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करून गेले. एक म्हणजे नोटाबंदी. यामुळे अनेक छोटे उत्पादक आणि व्यापारी टिकू शकले नाहीत. तर कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लॉकडाऊन केले गेले त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. त्यानंतरच्या काळातही मंद गतीने राष्ट्रीय उत्पन्न वाढले. परंतु रोजगार निर्मितीसाठी सरकारने गुंतवणूक न केल्याने औद्योगिक रोजगार निर्मिती झाली नाही.

त्या म्हणाल्या, सध्या जी काही आकडेवारी सरकार सांगत आहे, त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा असा प्रश्न पडतो. सरकारी उद्योग, व्यवसायही खासगी होऊ लागले आहेत. खासगी विद्यापीठेही सुरू झाली. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर भांडवलशाहीने आपली मजबूत पकड ठेवली असून, त्यातून प्रसारमाध्यमेही सुटलेली नाहीत. एका बाजूला भांडवलदार आहे. त्याच्याच हातात पैसा आहे. त्याच्याच हातात तंत्रज्ञान आहे आणि त्याच्यासमोर मिळेल त्या किमतीला आपल्या श्रमाची विक्री केल्याशिवाय तरणोपाय नाही, असा बेरोजगार आहे.सर्वसामान्यांसाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ही सरकारची जबाबदारी आहे असे १९८०च्या दशकाच्या शेवटापर्यंत मानले जात होते. नंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. सरकारी शाळा बंद पडत आहेत, मुलींचे शिक्षण थांबत आहे. दर्जेदार आरोग्य सेवा मिळेनाशी झाली आहे. पंडित नेहरूंच्या चुका झाल्याचे तेच घिसेपिटे वाक्य सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवण्याचे काम सुरू झाले आहे.प्रतिज्ञा कांबळे यांनी स्वागत केले. राहुल सुतार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अशोक चौसाळकर, व्यंकाप्पा भोसले, चंद्रकांत यादव, दिलीप पोवार, शिवाजीराव परुळेकर, डॉ. भारती पाटील, मेघा पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ही तर अक्राळविक्राळ भांडवलशाहीकार्यक्रमाचे अध्यक्ष ‘लोकमत’चे संपादक डॉ. वसंत भोसले म्हणाले, सध्या देशभरात अर्थविषयक जी धोरणे राबवली जात आहेत. त्याला फक्त ‘अक्राळविक्राळ भांडवलशाही’ असेच म्हटले पाहिजे. नेहरूंच्या काळात पैसा, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ काहीच नव्हते. परंतु त्यातून त्यांनी अनेक संस्था, उद्योग उभारले. ज्यातून पुढे भारत घडत गेला. आता केवळ द्वेष पसरवणाऱ्या योजना, राजकारण, समाजकारण सुरू आहे. दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्राहून अधिक दारिद्र्य निमूर्लन झालेले असताना आपल्या नंदुरबार जिल्ह्यात अजूनही ५२ टक्के लोक दारिद्र्यात जगतात, हे भीषण वास्तव आहे. महाराष्ट्राने तर एकूणच कारभारात उलटी दिशा पकडली असून, सगळ्या राजकारण्यांची आता मिलीभगत झाली आहे.

आजचे व्याख्यानवक्ते : संजय आवटे, संपादक, लोकमत, पुणेविषय : प्रसारमाध्यमांची स्वायत्तता

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEconomyअर्थव्यवस्था