शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

गांधीनगरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

By admin | Updated: March 3, 2016 00:29 IST

गुन्हेगारी प्रमाणात वाढ : चोऱ्या, किरकोळ गुन्ह्यांवर पाळत ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक

बाबासाहेब नेर्ले --गांधीनगर -व्यापाऱ्याचे अपहरण, चोरी, भुरट्या चोरी, मटका आणि अवैध धंद्यांमुळे गांधीनगर बाजारपेठेत वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. गुन्हेगारीविषयक घटनांना आळा घालण्यासाठी गांधीनगर बाजारपेठेत सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची गरज निर्माण झाली आहे. व्यापारी पेठेत किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत वाढ होऊ लागल्याने कापड नगरीतील गुन्हेगारांवर पाळत ठेवण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी सीसीटीव्ही चांगला पर्याय ठरणार असून, लोकसहभागातून हा उपक्रम राबवण्यासाठी व्यापारी व अन्य व्यावसायिकांनी पुढे येणे अपेक्षित आहे.पश्चिम महाराष्ट्रातील मोठी कापड बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, वळिवडे व चिंचवाड या पाच गावच्या हद्दीत ही व्यापारीपेठ विस्तारली आहे. या व्यापारी केंद्रात कापड व्यवसायाबरोबरच प्लास्टिक, कटलरी, होजिअरी अनेक छोटेमोठे उद्योग विस्तारत आहेत. जिद्दीने, कष्टाने येथील व्यापारी व्यवसाय करीत आहेत; पण ‘आयत्या बिळात नागोबा’ या म्हणीप्रमाणेच काहीजण व्यापाऱ्यांना त्रास देतात. चोऱ्या, अपहरण, चेनस्नॅचिंग या घटनांना येथील व्यापाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. अपहरण, चोऱ्यासारख्या घटना घडूनही काही व्यापारी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे पोलिसांनाही अशा गुन्ह्यांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी अशा गुन्हेगारांचे फावते आहे.दोन वर्षांत तीन अपहरणाच्या घटना घडल्या. त्यामध्ये मोठ्या व्यावसायिकांनाच टार्गेट करण्यात आले. त्यामुळे गांधीनगर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटना ताजी होती तेव्हा अनेक व्यापारी व व्यावसायिकांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घेतला; पण त्याला म्हणावी तितकी गती मिळाली नाही. होलसेल संघ, रिटेल व्यापारी संघ तसेच अन्य संघटना यांच्या मदतीने व सीसीटीव्हीच्या आधारे असे वाढते गुन्हे रोखता येतील; पण त्याची गंभीरता लक्षात येणे गरजेचे आहे.एक महिन्यापूर्वी गांधीनगरातील एका व्यापाऱ्याचे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना अपहरण झाले. त्यामुळे गांधीनगर व्यापारीपेठेत भीतीचे वातावरण पसरले. अनेक व्यापारी हे मॉर्निंग वॉकला जाण्याचे टाळू लागले. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना कमी करावयाच्या असल्यास अशा घटनांवर चाप आणला पाहिजे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज आहे. सीसीटीव्ही बसविल्याने अनेक गुन्हेगारी घटनांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होईल. गर्दीच्या ठिकाणी होणारी पाकीटमारी, किरकोळ वाद, महिलांची होणारी टिंगलटवाळी, चोरीच्या घटना, या सर्व बाबींवर अंकुश ठेवणे सहज शक्य होईल. तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे गेट हा मुख्य रस्ता तसेच शेरू चौक, सिंधू मार्केट, रेल्वे स्थानक, भाजी मंडई, गुरुनानक पेट्रोल पंप, अशा वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची गरज आहे.यासाठी येथील व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन या सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यापारी पेठेवर सीसीटीव्हीचा वॉच राहिला तर अशा दुर्घटनांपासून गांधीनगर बाजारपेठ सुरक्षित राहील. गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात मदत होईल. +परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पोलीस प्रशासन कुठेही कमी पडणार नाही. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेतच; पण ती कशी टाळता येईल या बाबींकडे लक्ष केंद्रित करून उपाय योजना करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. - संभाजी गायकवाडसहायक पोलीस निरीक्षकगांधीनगर पोलीस ठाणे.वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी गांधीनगरमध्ये सीसीटीव्हीची गरज आहेच. त्या बाबतीत सर्व होलसेल व रिटेल व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला तर गांधीनगर खरोखरच भयमुक्त होईल. - सुरेश आहुजाव्यापारी गांधीनगरवाहतुकीच्या दृष्टीने गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांमध्ये गुन्हेगारींची दहशत आहे. त्यामुळे बिनधास्त फिरणे अवघड झाले आहे.- रमेश वाच्छाणीव्यापारी, गांधीनगर.