शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तृणभक्षी वन्यप्राणी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 00:03 IST

वीस टक्के वाढ : वन कायद्याचा धाक आणि उपाययोजनांचा परिणाम

महालिंग सलगर--कुपवाड सह्याद्रीचे डोंगर आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वीस टक्के वाढ झाली आहे. वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे ही वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील वन विभागाच्या सर्वेक्षणात मांसभक्षी प्राण्यांपेक्षा तृणभक्षी प्राण्यांची वाढ अधिक प्रमाणात होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यात वन विभागाच्या अधिपत्याखाली ४२ हजार हेक्टर वनक्षेत्र कार्यरत आहे. हे वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत पाच टक्के आहे. या वनक्षेत्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरील वृक्ष आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वनांचा समावेश आहे. या वृक्षांमध्ये लिंब, बाभूळ, खैर, बोर, करंज आदी वृक्षांचा समावेश आहे. वन विभागाच्या अखत्यारीत जिल्ह्यात एका बाजूला सधन आणि एका बाजूला दुष्काळी पट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळेच जिल्ह्यात या प्रकारचे वृक्ष आढळून येतात. या वनक्षेत्रात वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामध्ये मांसभक्षी प्राण्यांपेक्षा तृणभक्षी प्राण्यांची वाढ अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. जिल्ह्यात शिराळा, खानापूर-विटा, आटपाडी, जत, कडेगाव, सांगली या वन परिक्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक प्राणी असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये शिराळा तालुक्याचा क्रमांक लागतो, तर सर्वात कमी संख्या असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये सांगलीचा समावेश होतो. वन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या प्रगणनेवेळी मागीलवर्षी पाचशे वन्यप्राणी आढळून आले, तर यंदा करण्यात आलेल्या प्रगणनेवेळी ६४८ वन्यप्राणी आढळून आले. जंगलातील पाणवठे आणि वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणावरील प्राण्यांच्या पायांच्या ठशांवरून ही गणना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षणात रानडुक्कर, ससा, वानर, माकड, कोल्हा, साळिंदर, गवा, लांडगा, सांबर, सकाळवीट या वन्यप्राण्यांचा समावेश आढळून आला. तसेच जिल्ह्यात वन्यजीव विभागाकडून चांदोली आणि सागरेश्वर अभयारण्यात केलेल्या गणनेत बिबट्या, गवा, लांडगा, कोल्हा, हरिण, सांबर आदीप्रकारच्या सातशेहून अधिक वन्यजीवांबरोबरच वाघाचे अस्तित्वही आढळून आल्याचे दिसून आले आहे. वन्यजीव विभागाच्या गणनेत तृणभक्षीबरोबरच मांसभक्षी प्राण्यांतही चांगली वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात वन्यजीवांबरोबरच पक्ष्यांच्या संख्येतही चांगली वाढ होऊ लागली आहे. (वार्ताहर)वन विभागाला ५५ मगरी आढळल्यासांगली आणि शिराळा वन परिक्षेत्रामध्ये नदी किनाऱ्यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वन विभागाला ५५ मगरी आढळून आल्याचीही माहिती मिळून आली. त्याठिकाणी वन विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या प्राण्यांकडून मानवावर हल्ले होऊ नयेत म्हणून हे प्राणी आढळल्यास त्यांना सुरक्षित ठिकाण असलेल्या त्यांच्या अधिवास क्षेत्रात ठेवण्याचे कामही वन विभागाकडून केले जात आहे. काटेकोर अंमलबजावणीवन अधिनियम १९७२ च्या काटेकोर अंमलबजावणीमुळे वन्यप्राण्यांना संरक्षण मिळाले आहे. वन्यप्राण्यांचा वावर आढळून आल्यावर या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडले जात आहे. तसेच वन्यप्राण्यांकडून मानवाची हत्या झाल्यास त्वरित आठ लाखांची मदत दिली जाऊ लागली आहे. अपंगत्व आल्यास चार लाखांची मदत मिळते. पिकांचे नुकसान झाल्यासही त्वरित मदत दिली जाऊ लागली आहे. त्यामुळेही प्राण्यांच्या हत्या कमी होऊ लागल्या आहेत. वन विभागाच्या क्षेत्रात तृणभक्षी प्राणी वाढले आहेत, अशी माहिती जिल्हा विभागीय वन अधिकारी समाधान चव्हाण यांनी दिली.वन्य पशूुदिन विशेष..