शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

जिल्ह्यात तृणभक्षी वन्यप्राणी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 00:03 IST

वीस टक्के वाढ : वन कायद्याचा धाक आणि उपाययोजनांचा परिणाम

महालिंग सलगर--कुपवाड सह्याद्रीचे डोंगर आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वन विभागाच्या परिक्षेत्रात वन्यजीवांच्या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वीस टक्के वाढ झाली आहे. वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे ही वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील वन विभागाच्या सर्वेक्षणात मांसभक्षी प्राण्यांपेक्षा तृणभक्षी प्राण्यांची वाढ अधिक प्रमाणात होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे.जिल्ह्यात वन विभागाच्या अधिपत्याखाली ४२ हजार हेक्टर वनक्षेत्र कार्यरत आहे. हे वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत पाच टक्के आहे. या वनक्षेत्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरील वृक्ष आणि दुष्काळी पट्ट्यातील खुरट्या वनस्पतींनी व्यापलेल्या जिल्ह्यातील वनांचा समावेश आहे. या वृक्षांमध्ये लिंब, बाभूळ, खैर, बोर, करंज आदी वृक्षांचा समावेश आहे. वन विभागाच्या अखत्यारीत जिल्ह्यात एका बाजूला सधन आणि एका बाजूला दुष्काळी पट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळेच जिल्ह्यात या प्रकारचे वृक्ष आढळून येतात. या वनक्षेत्रात वन विभागाच्या उपाययोजना आणि वन कायद्याच्या धाकामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामध्ये मांसभक्षी प्राण्यांपेक्षा तृणभक्षी प्राण्यांची वाढ अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. जिल्ह्यात शिराळा, खानापूर-विटा, आटपाडी, जत, कडेगाव, सांगली या वन परिक्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक प्राणी असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये शिराळा तालुक्याचा क्रमांक लागतो, तर सर्वात कमी संख्या असलेल्या वन परिक्षेत्रामध्ये सांगलीचा समावेश होतो. वन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या प्रगणनेवेळी मागीलवर्षी पाचशे वन्यप्राणी आढळून आले, तर यंदा करण्यात आलेल्या प्रगणनेवेळी ६४८ वन्यप्राणी आढळून आले. जंगलातील पाणवठे आणि वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या ठिकाणावरील प्राण्यांच्या पायांच्या ठशांवरून ही गणना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वेक्षणात रानडुक्कर, ससा, वानर, माकड, कोल्हा, साळिंदर, गवा, लांडगा, सांबर, सकाळवीट या वन्यप्राण्यांचा समावेश आढळून आला. तसेच जिल्ह्यात वन्यजीव विभागाकडून चांदोली आणि सागरेश्वर अभयारण्यात केलेल्या गणनेत बिबट्या, गवा, लांडगा, कोल्हा, हरिण, सांबर आदीप्रकारच्या सातशेहून अधिक वन्यजीवांबरोबरच वाघाचे अस्तित्वही आढळून आल्याचे दिसून आले आहे. वन्यजीव विभागाच्या गणनेत तृणभक्षीबरोबरच मांसभक्षी प्राण्यांतही चांगली वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात वन्यजीवांबरोबरच पक्ष्यांच्या संख्येतही चांगली वाढ होऊ लागली आहे. (वार्ताहर)वन विभागाला ५५ मगरी आढळल्यासांगली आणि शिराळा वन परिक्षेत्रामध्ये नदी किनाऱ्यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात वन विभागाला ५५ मगरी आढळून आल्याचीही माहिती मिळून आली. त्याठिकाणी वन विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या प्राण्यांकडून मानवावर हल्ले होऊ नयेत म्हणून हे प्राणी आढळल्यास त्यांना सुरक्षित ठिकाण असलेल्या त्यांच्या अधिवास क्षेत्रात ठेवण्याचे कामही वन विभागाकडून केले जात आहे. काटेकोर अंमलबजावणीवन अधिनियम १९७२ च्या काटेकोर अंमलबजावणीमुळे वन्यप्राण्यांना संरक्षण मिळाले आहे. वन्यप्राण्यांचा वावर आढळून आल्यावर या वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडले जात आहे. तसेच वन्यप्राण्यांकडून मानवाची हत्या झाल्यास त्वरित आठ लाखांची मदत दिली जाऊ लागली आहे. अपंगत्व आल्यास चार लाखांची मदत मिळते. पिकांचे नुकसान झाल्यासही त्वरित मदत दिली जाऊ लागली आहे. त्यामुळेही प्राण्यांच्या हत्या कमी होऊ लागल्या आहेत. वन विभागाच्या क्षेत्रात तृणभक्षी प्राणी वाढले आहेत, अशी माहिती जिल्हा विभागीय वन अधिकारी समाधान चव्हाण यांनी दिली.वन्य पशूुदिन विशेष..