शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

आपत्कालिन स्थितीत प्रशासनाचे वळीवडेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गांधीनगर : आपत्कालिन स्थितीत प्रशासन वळीवडेकडे का दुर्लक्ष करते, असा संतप्त प्रश्न सरपंच अनिल पंढरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गांधीनगर : आपत्कालिन स्थितीत प्रशासन वळीवडेकडे का दुर्लक्ष करते, असा संतप्त प्रश्न सरपंच अनिल पंढरे यांनी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना केला. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा त्यांनी अन्य पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर पाढाच वाचला.

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे वळीवडे, गांधीनगर, वसगडे, उचगाव या गावांतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार शीतल मुळे-भामरे या करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्यासमवेत आल्या होत्या. त्यावेळी ग्रामस्थांनी भामरे-मुळे यांना धारेवर धरले. पंढरे म्हणाले की, आपत्कालिन स्थितीत नेहमीच प्रशासनाने वळीवडेला दुर्लक्षित केले आहे. वारंवार संपर्क साधूनही आपला संपर्क होत नव्हता. आपल्याला संदेश पाठवले; मात्र ते अद्यापही पाहिले गेले नाहीत. पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी आम्हाला बोट हवी होती. अखेर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेजारील गावांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची व्यवस्था आम्ही केली, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या उदासिनतेबद्दल खंत व्यक्त केली. यावर गटविकास अधिकारी उगले यांनी स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी असल्याचे सांगताच सरपंच पंढरे व पोलीस पाटील दीपक पासान्ना यांनी ते नेहमी वरिष्ठांकडे बोट दाखवतात. मग गावपातळीवर आम्ही करायचे तरी काय? असा प्रश्न विचारला. दरम्यान, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला.

फोटो ओळ:-

वळीवडे (ता. करवीर) येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांना पूरस्थितीमध्ये प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा प्रश्न सरपंच अनिल पंढरे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी विचारला.