शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जावरील व्याज परतावा अनुदान रद्द, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:36 IST

ही सवलत कायम ठेवायची म्हटली तर जिल्हा बँकेचे उत्पन्न ४४ कोटीने घटणार असल्याने बँकेनेही केंद्राच्या धोरणाला विरोध केला आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या पीक कर्जावरील व्याज परतावा अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. ही सवलत कायम ठेवायची म्हटली तर जिल्हा बँकेचे उत्पन्न ४४ कोटीने घटणार असल्याने बँकेनेही केंद्राच्या धोरणाला विरोध केला आहे. देशातील जिल्हा बँकांनी एकत्रित येऊन हा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव जिल्हा बँकेच्या शुक्रवार झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव करण्यात आला.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारने २००८ पासून शेतकऱ्यांना व्याज परतावा अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारनेही नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणली. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एक लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी मिळत होते. त्यापुढे जाऊन तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय झाला. जिल्हा बँक पाच लाखापर्यंत बिनव्याजी देत आहे. आता केंद्र सरकारने २ टक्के व्याज परतावा अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

जिल्हा बँकेने हा भार सोसायचा म्हटला तर ४४ कोटीने उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे देशातील सर्व जिल्हा बँकांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारकडे व्याज परताव्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.

अशी मिळत होती व्याज सवलत-

एक लाखापर्यंत

  • केंद्र सरकार -३ टक्के
  • राज्य सरकार - ३ टक्के 

१ ते ३ लाखांपर्यंत

  • केद्र सरकार - २ टक्के
  • राज्य सरकार - ४ टक्के

 

केंद्र सरकारने व्याज परतावा बंदच्या निर्णयाविरोधात देशभरातील जिल्हा बँकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अगोदरच व्याज सवलतीपोटी दीड टक्का व्याज बँक सहन करत आहे. आणखी दोन टक्के करायचे म्हटले तर ४४ कोटींचा फटका बसू शकतो. त्यामुळे जिल्हा बँकांच्या प्रतिनिधींना घेऊन लवकरच केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहे. - हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बँक व ग्रामविकास मंत्री)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी