शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पीक कर्जावरील व्याज परतावा अनुदान रद्द, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 17:36 IST

ही सवलत कायम ठेवायची म्हटली तर जिल्हा बँकेचे उत्पन्न ४४ कोटीने घटणार असल्याने बँकेनेही केंद्राच्या धोरणाला विरोध केला आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या पीक कर्जावरील व्याज परतावा अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. ही सवलत कायम ठेवायची म्हटली तर जिल्हा बँकेचे उत्पन्न ४४ कोटीने घटणार असल्याने बँकेनेही केंद्राच्या धोरणाला विरोध केला आहे. देशातील जिल्हा बँकांनी एकत्रित येऊन हा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव जिल्हा बँकेच्या शुक्रवार झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव करण्यात आला.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारने २००८ पासून शेतकऱ्यांना व्याज परतावा अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारनेही नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणली. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एक लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी मिळत होते. त्यापुढे जाऊन तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय झाला. जिल्हा बँक पाच लाखापर्यंत बिनव्याजी देत आहे. आता केंद्र सरकारने २ टक्के व्याज परतावा अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

जिल्हा बँकेने हा भार सोसायचा म्हटला तर ४४ कोटीने उत्पन्न कमी होणार आहे. त्यामुळे देशातील सर्व जिल्हा बँकांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारकडे व्याज परताव्यासाठी पाठपुरावा करण्याचा ठराव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.

अशी मिळत होती व्याज सवलत-

एक लाखापर्यंत

  • केंद्र सरकार -३ टक्के
  • राज्य सरकार - ३ टक्के 

१ ते ३ लाखांपर्यंत

  • केद्र सरकार - २ टक्के
  • राज्य सरकार - ४ टक्के

 

केंद्र सरकारने व्याज परतावा बंदच्या निर्णयाविरोधात देशभरातील जिल्हा बँकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अगोदरच व्याज सवलतीपोटी दीड टक्का व्याज बँक सहन करत आहे. आणखी दोन टक्के करायचे म्हटले तर ४४ कोटींचा फटका बसू शकतो. त्यामुळे जिल्हा बँकांच्या प्रतिनिधींना घेऊन लवकरच केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहे. - हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बँक व ग्रामविकास मंत्री)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी