कोल्हापुरातील उद्योगांचा लॉकडाऊनमधील विजेचा किमान आकार रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST2021-05-22T04:23:17+5:302021-05-22T04:23:17+5:30
कोल्हापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता हा जिल्हा कोरोनाचे देशातील सर्वाधिक रुग्ण असलेला जिल्हा बनला आहे. या गंभीरप्रसंगी प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊनचे ...

कोल्हापुरातील उद्योगांचा लॉकडाऊनमधील विजेचा किमान आकार रद्द करा
कोल्हापूर जिल्ह्याची सध्याची परिस्थिती पाहता हा जिल्हा कोरोनाचे देशातील सर्वाधिक रुग्ण असलेला जिल्हा बनला आहे. या गंभीरप्रसंगी प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊनचे निर्बंध कडक केले आहेत. हे निर्बंध लावताना औद्योगिक क्षेत्राचा या बंदकाळातील होणाऱ्या नुकसानीचा विचार प्रशासनाने केलेला नाही. लॉकडाऊनमुळे कोल्हापूरमधील कागल-हातकणंगले पंचतारांकित, गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसी दि. १६ पासून बंद आहेत. त्या उद्या, रविवारपर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत उच्चदाब वीज ग्राहकांना याचा फारच तोटा सहन करावा लागणार आहे. आठ ते दहा दिवस कारखाने बंद ठेवून पूर्ण २६ दिवसांसाठी विजेचा किमान आकार नाहक भरावा लागणार आहे. त्यामुळे हा आकार रद्द करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.