शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गोठे, दुकाने, हॉटेल कागदावरच; अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून स्थळ पाहणी, लाभार्थ्यांची उडाली तारांबळ

By राजाराम लोंढे | Updated: July 10, 2024 12:18 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून व्याज सवलतीचा फायदा घेणाऱ्या लाभार्थ्यांची महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून व्याज सवलतीचा फायदा घेणाऱ्या लाभार्थ्यांची महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी (स्पॉट व्हिजिट) सुरू झाल्याने लाभार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जनावरांचे गोठे, वीटभट्ट्या, दुकान, हॉटेल व्यवसाय कागदावरच असल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आल्याने तपासणी सुरू केली आहे.राज्य शासनाशी संलग्न अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. महामंडळाकडून २०१८ पासून बिनव्याजी कर्ज योजना सुरू केली असून, आतापर्यंत राज्यात ९५ हजार तरुण, तरुणींना लाभ देण्यात आला आहे. पूर्वी १० लाखांपर्यंत ही योजना होती, पण आता त्यात वाढ करून १५ लाखांपर्यंत कर्जपुरवठा केला जातो. यातून जनावरांचे गोठे, वीटभट्ट्या, दुकाने, चांदी व्यवसाय, हॉटेल आदी लघुउद्योगांसाठी महामंडळ विविध बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा करते.पण, अनेक ठिकाणी या कर्जाचा वापर लघुउद्योगासाठी केला नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. बँकांकडून या पैशांची उचल करून दुसऱ्या व्यवसायासाठी वापरले आणि महामंडळाकडून व्याज सवलतीचा लाभ घेतला जात आहे. यासाठी महामंडळाने जिल्हा निहाय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार महामंडळाचे अधिकारी बँकेतून कर्ज प्रकरणनिहाय माहिती घेऊन अचानक व्यवसायाची स्थळ पाहणी करू लागले आहेत. यामध्ये, काही तालुक्यांत ज्या उद्देशाने कर्ज घेतले आहे, त्यासाठी वापर झाला नसल्याची माहिती समोर येत आहे.

व्यवसायच जागेवरून गायबजिल्ह्यात मध्यंतरी एका नागरी सहकारी बँकेतील अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली आहे. बँकेने पाचशेहून अधिक प्रकरणे केली होती, त्याची स्थळ पाहणी केल्यानंतर ते काही व्यवसाय जागेवर नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.संचालकांची शिफारस, निरीक्षक अडचणीतजिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कर्ज प्रकरणांपैकी बहुतांशी जिल्हा बँकेच्या माध्यमातून केलेली आहेत. बँकेतील संबधित विभागप्रमुख व बँक निरीक्षकांनी कागदपत्रांची पडताळणी करूनच मंजुरी दिली जाते. पण, काही संचालकांनी नियमात बसत नसतानाही शिफारसी केल्या आहेत. त्याच शिफारसी बोगसगिरीच्या मुळाशी असल्या, तरी निरीक्षकांच्या अडचणी वाढवणाऱ्या आहेत.

दृष्टीक्षेपात राज्यातील कर्ज प्रकरणे :

  • याेजना कालावधी : २०१८ ते २०२४
  • एकूण लाभार्थी - ९५ हजार
  • आतापर्यंतचा व्याज परतावा : ८५० कोटी

महामंडळाकडून ज्या लघुउद्योगासाठी कर्ज घेतले, त्यासाठी वापर होत नसल्याच्या तक्रारी महामंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या. यासाठी संपूर्ण राज्यात स्थळपाहणीचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत ९५ हजार तरुणांना लाभ दिला असून, लवकरच १ लाखाचा टप्पा पार करू. - नरेंद्र पाटील (अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसायbankबँक