शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-पोलिसांचा अजब कारभार; गुन्हा दाखल घरफोडीचा; तपास केला दुचाकी चोरीचा

By उद्धव गोडसे | Updated: July 5, 2023 11:44 IST

चोरटे सापडत नसल्याचे सूचना पत्र फिर्यादींना पाठवले

उद्धव गोडसेकोल्हापूर : राजारामपुरीतील मंडलिक पार्क येथील घरफोडीचा गुन्हा दाखल होऊन जवळपास तीन महिने उलटत आले तरी राजारामपुरी पोलिसांना चोरटे सापडलेले नाहीत. १४ लाख रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा दाखल असताना पोलिसांनी मात्र दुचाकी चोरीचा तपास केला. चोरटे मिळाल्यास किंवा गुन्ह्याचा तपास पुढे चालू केल्यास कळवू, असे पत्र पोलिसांनी फिर्यादींना पाठवले आहे. त्यामुळे राजारामपुरी पोलिसांचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे पुष्कराज प्रदीप सोनार (वय ३७, रा. मंडलिक पार्क, राजारामपुरी, १३ वी गल्ली, कोल्हापूर) यांच्या घरात ९ एप्रिलच्या रात्री चोरी झाली. चोरट्यांनी हॉलचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडी झाल्यानंतर सोनार यांनी तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकानेही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरटे लवकरच सापडतील, असे फिर्यादी सोनार यांना वाटत होते. मात्र, काही दिवसातच घरफोडीचा तपास पोलिसांच्या फाईलमध्येच राहिला.सोनार यांनी पोलिस ठाण्यात वारंवार हेलपाटे मारून पाठपुरावा केला. पण, 'तपास सुरू आहे. नंतर या.' एवढेच उत्तर त्यांना मिळाले. गेल्याच आठवड्यात त्यांना पोस्टाने राजारामपुरी पोलिसांचे सूचना पत्र मिळाले. त्यात म्हंटले आहे की, 'आपली चोरीस गेलेली मोटारसायकल व चोरी करणाऱ्या चोरट्यांचा आजअखेर शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, कारचा अगर चोरट्यांचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आलेला नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून आल्यास व पुढे गुन्ह्याचा तपास चालू केलेस आपणास कळवले जाईल.' याचा अर्थ पोलिसांनी तपास थांबवला असाच होतो. त्यामुळे १४ लाखांच्या दागिन्यांची चोरी झालेले सोनार कुटुंब हवालदिल झाले आहे.न घडलेल्या गुन्ह्याचा तपासपोलिसांच्या सूचना पत्रानुसार त्यांनी दुचाकी आणि कार चोरीचा तपास केला. परंतु, सोनार यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची फिर्याद दिली होती. लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली असताना, पोलिसांनी त्यांना दुचाकी आणि कार चोरीच्या तपासाचे पत्र पाठवल्याने यातून पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.पोलिसांची सारवासारवयाबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, 'कर्मचाऱ्यांनी नजरचुकीने फिर्यादींना पत्र पाठवले असावे. या गुन्ह्याच्या तपासासाठी कर्नाटकात निपाणीपर्यंत पथक गेले होते. लवकरच चोरट्यांचा शोध लागेल,' असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस