शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Kolhapur-पोलिसांचा अजब कारभार; गुन्हा दाखल घरफोडीचा; तपास केला दुचाकी चोरीचा

By उद्धव गोडसे | Updated: July 5, 2023 11:44 IST

चोरटे सापडत नसल्याचे सूचना पत्र फिर्यादींना पाठवले

उद्धव गोडसेकोल्हापूर : राजारामपुरीतील मंडलिक पार्क येथील घरफोडीचा गुन्हा दाखल होऊन जवळपास तीन महिने उलटत आले तरी राजारामपुरी पोलिसांना चोरटे सापडलेले नाहीत. १४ लाख रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा दाखल असताना पोलिसांनी मात्र दुचाकी चोरीचा तपास केला. चोरटे मिळाल्यास किंवा गुन्ह्याचा तपास पुढे चालू केल्यास कळवू, असे पत्र पोलिसांनी फिर्यादींना पाठवले आहे. त्यामुळे राजारामपुरी पोलिसांचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे पुष्कराज प्रदीप सोनार (वय ३७, रा. मंडलिक पार्क, राजारामपुरी, १३ वी गल्ली, कोल्हापूर) यांच्या घरात ९ एप्रिलच्या रात्री चोरी झाली. चोरट्यांनी हॉलचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. घरफोडी झाल्यानंतर सोनार यांनी तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकानेही चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तत्परतेमुळे चोरटे लवकरच सापडतील, असे फिर्यादी सोनार यांना वाटत होते. मात्र, काही दिवसातच घरफोडीचा तपास पोलिसांच्या फाईलमध्येच राहिला.सोनार यांनी पोलिस ठाण्यात वारंवार हेलपाटे मारून पाठपुरावा केला. पण, 'तपास सुरू आहे. नंतर या.' एवढेच उत्तर त्यांना मिळाले. गेल्याच आठवड्यात त्यांना पोस्टाने राजारामपुरी पोलिसांचे सूचना पत्र मिळाले. त्यात म्हंटले आहे की, 'आपली चोरीस गेलेली मोटारसायकल व चोरी करणाऱ्या चोरट्यांचा आजअखेर शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, कारचा अगर चोरट्यांचा शोध न लागल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आलेला नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून आल्यास व पुढे गुन्ह्याचा तपास चालू केलेस आपणास कळवले जाईल.' याचा अर्थ पोलिसांनी तपास थांबवला असाच होतो. त्यामुळे १४ लाखांच्या दागिन्यांची चोरी झालेले सोनार कुटुंब हवालदिल झाले आहे.न घडलेल्या गुन्ह्याचा तपासपोलिसांच्या सूचना पत्रानुसार त्यांनी दुचाकी आणि कार चोरीचा तपास केला. परंतु, सोनार यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची फिर्याद दिली होती. लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी झाली असताना, पोलिसांनी त्यांना दुचाकी आणि कार चोरीच्या तपासाचे पत्र पाठवल्याने यातून पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.पोलिसांची सारवासारवयाबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, 'कर्मचाऱ्यांनी नजरचुकीने फिर्यादींना पत्र पाठवले असावे. या गुन्ह्याच्या तपासासाठी कर्नाटकात निपाणीपर्यंत पथक गेले होते. लवकरच चोरट्यांचा शोध लागेल,' असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस