शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दहा रिक्षाचालकांवर ‘आरटीओ’कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:33 IST

परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारीस यांच्या मार्गदर्शनखाली मोटारवाहन निरीक्षक सुभाष देसाई व त्यांच्या पथकाने मंगळवार सकाळपासूनच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रिक्षांची तपासणीस सुरूवात केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांच्या आदेशानूसार कारवाईस सुरुवात ; मनमानीला चाप

कोल्हापूर : मीटर प्रमाणे भाडे न घेणे, प्रवाशांना उद्धट वागणूक देणे, आदी तक्रारींवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मंगळवारी सकाळी रिक्षांची तपासणी केली. त्यात दहा रिक्षांच्या मीटरमध्ये दोष आढळल्यानतंर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईमुळे रिक्षाचालकांत खळबळ माजली.सोमवारी (दि.१८)रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यात सदस्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर शहरातील रिक्षाचालक प्रवाशांना उद्धट वागणूक देतात.

मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नाहीत. थांब्यावरून जवळचे अंतराचे भाडे नाकारणे, . ठोक पद्धतीने भाडे आकारणी करणे, ग्राहकांबरोबर अरेरावीची भाषा करणे,अशा विविध तक्रारींचा पाढा वाचला. याबाबत तात्काळ जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रादेशिक परिवहन व शहर वाहतुक पोलीसांना रिक्षाचालकांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानूसार प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारीस यांच्या मार्गदर्शनखाली मोटारवाहन निरीक्षक सुभाष देसाई व त्यांच्या पथकाने मंगळवार सकाळपासूनच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रिक्षांची तपासणीस सुरूवात केली. त्यात मीटर सुरू नसलेल्या व सील नसलेल्या, गाडीचा फिटनेस नाही, परमीट नाही, पीयुसी नाही, गाडीचा विमा नाही, वाहन चालविण्याचा परवाना नाही, असा दोष आढळला. त्यानूसार अमित बाटुंगे, अशिष कांबळे, अस्लम बारगीर, सतीश कोरवी, सचिन कडुस्कर, अविनाश देसाई, सागर गावडे, दगडू गोडेकर, प्रशांत माने, आत्माराम देशमुख या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ही कारवाई शहरात यापुढेही सुरू ठेवली जाणार आहे. नागरीकांनी अशा रिक्षाचालकांबाबत प्रादेशिक परिवहन कडे तक्रार करावी. असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक देसाई यांनी केले आहे. 

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसPoliceपोलिस